शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील पिकांसाठी एकतरी पाणी द्या हो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 22:19 IST

दरवर्षी रब्बीसाठी महाकाळी धरणाचे पाणी नदी व कालव्याद्वारे सिंचनासाठी सोडल्या जाते. परंतु या वर्षी अल्पवृष्टीमुळे धरणासाठी फक्त ३७ टक्के पाणीसाठा असल्यामुळे कालव्याला पाणी सोडणार नसल्याचे परिपत्रक पाटबंधारे विभागाने ११ नोव्हेंबरला काढले असल्याने कालवा क्षेत्रातील शेतकऱ्यांवर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकालव्यावर अंवलबून असणाऱ्याची आर्त हाक : उद्योगासाठी मात्र भरमसाट पाण्याचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : दरवर्षी रब्बीसाठी महाकाळी धरणाचे पाणी नदी व कालव्याद्वारे सिंचनासाठी सोडल्या जाते. परंतु या वर्षी अल्पवृष्टीमुळे धरणासाठी फक्त ३७ टक्के पाणीसाठा असल्यामुळे कालव्याला पाणी सोडणार नसल्याचे परिपत्रक पाटबंधारे विभागाने ११ नोव्हेंबरला काढले असल्याने कालवा क्षेत्रातील शेतकऱ्यांवर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. दुष्काळी परिस्थितीमुळे कोरडवाहू क्षेत्रातील कपाशीची उलंगवाडी होण्याची स्थिती आहे. पाण्याअभावी तुरही कोमजू लागली आहे. तुरीला पाणी जरी मिळाले तरी उत्पन्नात भर पडू शकते. बोर धरणातही अत्यल्प साठा आहे. परंतु त्या धरणाचे दोन पाणी कालव्याद्वारे देण्यात येत आहे. धामचे पाणी पिण्यासाठी संरक्षीत असले तरी त्यातून औद्योगिकरणासाठी धाम नदीद्वारे पाणी सोडण्यात येते. त्यामुळे रेल्वे व सेवाग्राम एमआयडीसी उत्तम गालवा याला नियमित पाणीपुरवठा केला जातो. धरणाचा उद्देश हा पिण्याचे पाणी व सिंचन याला प्राथमिकतेने पाणी देण्यासाठी होता. येथे मात्र सिंचनाला पूर्णत: बगल दिली जात आहे. येळाकेळी ते तरोडा या क्षेत्रातील हजारो हेक्टर रब्बीचे क्षेत्र हे कालव्यावर अवलंबून आहे. परंतु काढलेल्या परिपत्रकामध्ये कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार नसल्याचा स्पष्ट उल्लेख असून ३१ डिसेबरनंतर नदीवर लिफ्ट इरीगेशनला सुध्दा मनाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीवरील पाणी घेणाºयांची ऊस, केळीची पिकेही धोक्यात आली आहे. एक तरी पाणी द्या अशी विनवणी शेतकरी करीत आहे.नदीचे गाव अडचणीतधाम नदीच्या काठावरील पवनार गावात बाराही महिने पाणी राहत होते. शिवाय शेतीलाही कॅनलदारे पाणी दिले जात होते. यंदा मात्र परिस्थिती विपरीत आहे. खरीपात एका पाण्यासाठी शेतकरी प्रशासनाला अर्ज विनंती करीत आहे. मात्र पाणी देण्याबाबत निर्णय झालेला नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई