शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शेतातील पिकांसाठी एकतरी पाणी द्या हो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 22:19 IST

दरवर्षी रब्बीसाठी महाकाळी धरणाचे पाणी नदी व कालव्याद्वारे सिंचनासाठी सोडल्या जाते. परंतु या वर्षी अल्पवृष्टीमुळे धरणासाठी फक्त ३७ टक्के पाणीसाठा असल्यामुळे कालव्याला पाणी सोडणार नसल्याचे परिपत्रक पाटबंधारे विभागाने ११ नोव्हेंबरला काढले असल्याने कालवा क्षेत्रातील शेतकऱ्यांवर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकालव्यावर अंवलबून असणाऱ्याची आर्त हाक : उद्योगासाठी मात्र भरमसाट पाण्याचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : दरवर्षी रब्बीसाठी महाकाळी धरणाचे पाणी नदी व कालव्याद्वारे सिंचनासाठी सोडल्या जाते. परंतु या वर्षी अल्पवृष्टीमुळे धरणासाठी फक्त ३७ टक्के पाणीसाठा असल्यामुळे कालव्याला पाणी सोडणार नसल्याचे परिपत्रक पाटबंधारे विभागाने ११ नोव्हेंबरला काढले असल्याने कालवा क्षेत्रातील शेतकऱ्यांवर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. दुष्काळी परिस्थितीमुळे कोरडवाहू क्षेत्रातील कपाशीची उलंगवाडी होण्याची स्थिती आहे. पाण्याअभावी तुरही कोमजू लागली आहे. तुरीला पाणी जरी मिळाले तरी उत्पन्नात भर पडू शकते. बोर धरणातही अत्यल्प साठा आहे. परंतु त्या धरणाचे दोन पाणी कालव्याद्वारे देण्यात येत आहे. धामचे पाणी पिण्यासाठी संरक्षीत असले तरी त्यातून औद्योगिकरणासाठी धाम नदीद्वारे पाणी सोडण्यात येते. त्यामुळे रेल्वे व सेवाग्राम एमआयडीसी उत्तम गालवा याला नियमित पाणीपुरवठा केला जातो. धरणाचा उद्देश हा पिण्याचे पाणी व सिंचन याला प्राथमिकतेने पाणी देण्यासाठी होता. येथे मात्र सिंचनाला पूर्णत: बगल दिली जात आहे. येळाकेळी ते तरोडा या क्षेत्रातील हजारो हेक्टर रब्बीचे क्षेत्र हे कालव्यावर अवलंबून आहे. परंतु काढलेल्या परिपत्रकामध्ये कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार नसल्याचा स्पष्ट उल्लेख असून ३१ डिसेबरनंतर नदीवर लिफ्ट इरीगेशनला सुध्दा मनाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीवरील पाणी घेणाºयांची ऊस, केळीची पिकेही धोक्यात आली आहे. एक तरी पाणी द्या अशी विनवणी शेतकरी करीत आहे.नदीचे गाव अडचणीतधाम नदीच्या काठावरील पवनार गावात बाराही महिने पाणी राहत होते. शिवाय शेतीलाही कॅनलदारे पाणी दिले जात होते. यंदा मात्र परिस्थिती विपरीत आहे. खरीपात एका पाण्यासाठी शेतकरी प्रशासनाला अर्ज विनंती करीत आहे. मात्र पाणी देण्याबाबत निर्णय झालेला नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई