शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

सेवाग्राम आश्रमाला वारसास्थळाचा दर्जा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 9:52 PM

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने जागतिक आकर्षणाचे केंद्र ठरले. तसेच जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देणारे ऐतिहासिक स्थळ आहे. आज १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून जगभरात साजरा केला जात असून महात्म्य जपण्याकरिता सेवाग्राम आश्रमाचा समावेश जागतिक वारसास्थळात करण्यात यावा, अशी मागणी बहार नेचर फाऊंडेशनने केली आहे.

ठळक मुद्देजागतिक वारसादिन विशेष : बहार नेचर फाऊंडेशनची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने जागतिक आकर्षणाचे केंद्र ठरले. तसेच जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देणारे ऐतिहासिक स्थळ आहे. आज १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून जगभरात साजरा केला जात असून महात्म्य जपण्याकरिता सेवाग्राम आश्रमाचा समावेश जागतिक वारसास्थळात करण्यात यावा, अशी मागणी बहार नेचर फाऊंडेशनने केली आहे.महात्मा गांधींनी १९३४ मध्ये सेवाग्राम आश्रमाची स्थापना केली व त्यानंतर हा आश्रम भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे केंद्रस्थान झाले. भारतीय स्वातंत्र्य चळवळ व्यापक करणाऱ्या अनेक घडामोडी या आश्रमात घडल्या. पायाभूत शिक्षणासह पर्यावरणपूरक जीवनशैलीला अनुरूप अनेक विधायक उपक्रम महात्मा गांधींनी येथे राबविले. आज अवघे विश्व हिंसेच्या शक्यतेने भयग्रस्त झाले असून मानवी लालसेपायी निसर्गही धोक्यात आला आहे. अशा विपरित परिस्थितीत गांधींच्या विचारांची साºया जगाला आज नितांत गरज आहे. हा विचार अवघ्या जगाला आपल्या कृतीने आणि प्रयोगांनी समजावून सांगणारी सेवाग्राम आश्रम ही एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भूमी असून त्याचे शाश्वत मूल्य लक्षात घेऊन या स्थळाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा बहाल करण्यात यावा, यासाठी बहार नेचर फाउंडेशनच्यावतीने केंद्र सरकारशी पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. युनेस्कोकडून १९७२ मध्ये घेतलेल्या ठरावानुसार सांस्कृतिक अथवा नैसर्गिक वारसास्थळांचा समावेश या यादीत केल्या जातो. जागतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थानांतर्गत प्राचीन वास्तू, ऐतिहासिक ठिकाणे, जंगल, उद्यान, सरोवर आदींचा समावेश त्यात करण्यात येतो.भारतातील ३७ स्थळांचा समावेश आतापर्यंत या यादीत करण्यात आलेला आहे. वारसा स्थळाचे संरक्षण व संवर्धन करणे तसेच पुढील पिढ्यांपर्यंत हा अमूल्य वारसा सुपूर्द करणे हा उद्देश वारसास्थळ घोषित करण्यामागे आहे. सेवाग्राम आश्रमाचा समावेश जागतिक वारसा स्थळात करण्यासाठीची शिफारस भारत सरकारने युनेस्कोकडे करावी व तसा प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, सचिव दिलीप विरखडे, संजय इंगळे तिगावकर, अतुल शर्मा, राहुल तेलरांधे, जयंत सबाने, वैभव देशमुख, दीपक गुढेकर, राहुल वकारे, अविनाश भोळे, राजदीप राठोड, सुनंदा वानखडे यांनी केली आहे.

टॅग्स :Bapu Kutiबापू कुटीSewagramसेवाग्राम