शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

सेवाग्राम आश्रमाला वारसास्थळाचा दर्जा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 21:52 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने जागतिक आकर्षणाचे केंद्र ठरले. तसेच जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देणारे ऐतिहासिक स्थळ आहे. आज १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून जगभरात साजरा केला जात असून महात्म्य जपण्याकरिता सेवाग्राम आश्रमाचा समावेश जागतिक वारसास्थळात करण्यात यावा, अशी मागणी बहार नेचर फाऊंडेशनने केली आहे.

ठळक मुद्देजागतिक वारसादिन विशेष : बहार नेचर फाऊंडेशनची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने जागतिक आकर्षणाचे केंद्र ठरले. तसेच जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देणारे ऐतिहासिक स्थळ आहे. आज १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून जगभरात साजरा केला जात असून महात्म्य जपण्याकरिता सेवाग्राम आश्रमाचा समावेश जागतिक वारसास्थळात करण्यात यावा, अशी मागणी बहार नेचर फाऊंडेशनने केली आहे.महात्मा गांधींनी १९३४ मध्ये सेवाग्राम आश्रमाची स्थापना केली व त्यानंतर हा आश्रम भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे केंद्रस्थान झाले. भारतीय स्वातंत्र्य चळवळ व्यापक करणाऱ्या अनेक घडामोडी या आश्रमात घडल्या. पायाभूत शिक्षणासह पर्यावरणपूरक जीवनशैलीला अनुरूप अनेक विधायक उपक्रम महात्मा गांधींनी येथे राबविले. आज अवघे विश्व हिंसेच्या शक्यतेने भयग्रस्त झाले असून मानवी लालसेपायी निसर्गही धोक्यात आला आहे. अशा विपरित परिस्थितीत गांधींच्या विचारांची साºया जगाला आज नितांत गरज आहे. हा विचार अवघ्या जगाला आपल्या कृतीने आणि प्रयोगांनी समजावून सांगणारी सेवाग्राम आश्रम ही एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भूमी असून त्याचे शाश्वत मूल्य लक्षात घेऊन या स्थळाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा बहाल करण्यात यावा, यासाठी बहार नेचर फाउंडेशनच्यावतीने केंद्र सरकारशी पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. युनेस्कोकडून १९७२ मध्ये घेतलेल्या ठरावानुसार सांस्कृतिक अथवा नैसर्गिक वारसास्थळांचा समावेश या यादीत केल्या जातो. जागतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थानांतर्गत प्राचीन वास्तू, ऐतिहासिक ठिकाणे, जंगल, उद्यान, सरोवर आदींचा समावेश त्यात करण्यात येतो.भारतातील ३७ स्थळांचा समावेश आतापर्यंत या यादीत करण्यात आलेला आहे. वारसा स्थळाचे संरक्षण व संवर्धन करणे तसेच पुढील पिढ्यांपर्यंत हा अमूल्य वारसा सुपूर्द करणे हा उद्देश वारसास्थळ घोषित करण्यामागे आहे. सेवाग्राम आश्रमाचा समावेश जागतिक वारसा स्थळात करण्यासाठीची शिफारस भारत सरकारने युनेस्कोकडे करावी व तसा प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, सचिव दिलीप विरखडे, संजय इंगळे तिगावकर, अतुल शर्मा, राहुल तेलरांधे, जयंत सबाने, वैभव देशमुख, दीपक गुढेकर, राहुल वकारे, अविनाश भोळे, राजदीप राठोड, सुनंदा वानखडे यांनी केली आहे.

टॅग्स :Bapu Kutiबापू कुटीSewagramसेवाग्राम