शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये मदत द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 16:02 IST

कृषी विभागाला सूचना : ई-पीक पाहणी अट रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : राज्यातील खरीप हंगाम २०२३ मध्ये सोयाबीन व कापूस पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पाच हजारांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. मात्र, ई-पीक पाहणीची अट टाकल्याने शेतकरी योजनेतून वंचित राहत असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आमदार दादाराव केचे यांनी सरसकट मदत देण्याची मागणी केली. आता सरकारने अट रद्द करून सरसकट अर्थसहाय्य देण्याचा शासन निर्णय निर्गमित केला.

कापूस व सोयाबीन पिकांमध्ये विदर्भाचा मोठा वाटा आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे सोयाबीन व कापसाच्या कमी भावामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. त्यांना दिलासा देण्यासाठी आमदार केचे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होती. मात्र, मदतीसाठी ई पीक नोंदणीची अट घालण्यात आली होती. आता २०२३ मधील शेतकऱ्यांना पाच हजारांचे अर्थसहाय्य देण्यासाठी ई- पीक नोंदणीची अट रद्द करण्यात आली आहे. तसे आदेश राज्य सरकारने काढले. त्यामुळे आर्वी मतदारसंघातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आमदारांनी सरसकट पाच हजारांचे अर्थसहाय्य शेतकऱ्यांना देण्याची सूचना केली. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी सुप्रिया वायवाळ, मंडळ अधिकारी रवींद्र उघाडे, मंडळ अधिकारी दिनेश सावळे, कारंजा तालुका कृषी अधिकारी रमेश वाघमारे यांच्यासह आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील कृषी अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :farmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र