शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
5
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
6
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
7
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
8
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
9
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
10
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
11
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
12
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
13
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
14
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
15
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
16
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
17
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
18
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
19
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
20
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...

सोयाबीनला साडेचार तर कापसाला सात हजार भाव द्या

By admin | Updated: November 19, 2014 22:46 IST

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची यावर्षी दैनावस्था आहे. बाजारपेठेत कापसाचे दर ३५०० ते ४००० प्रति क्विंटल तर सोयाबीन ३५०० प्रती क्विंटल आहे. या दरात कापूस व सोयाबीन विकून

वर्धा : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची यावर्षी दैनावस्था आहे. बाजारपेठेत कापसाचे दर ३५०० ते ४००० प्रति क्विंटल तर सोयाबीन ३५०० प्रती क्विंटल आहे. या दरात कापूस व सोयाबीन विकून शेतीला लावलेला खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे कापसाला सात हजार तर सोयाबीनला साडेचार हजार भाव देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने करण्यात आली. सभेच्या विदर्भातील प्रमुख कार्यकर्त्यांची सभा कार्यालयात यशवंत झाडे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. सभेकरिता राज्य सचिव किसन गुजर राज्य अध्यक्ष दादा रायपुरे प्रामुख्याने उपस्थित होते. शेतकरी वर्षभर कुटुंब कसे चालविणार हा प्रश्न आहे. स्वामिनाथन कमीशनच्या अहवालाप्रमाणे उत्पादन खर्च व ५० टक्के नफा जोडून सर्व शेतमालाचे उत्पादन दर केंद्र सरकारने जाहीर करावे व त्या दरात शेतमालाची सरकारी खरेदीची व्यवस्था शासनाने करावी यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे कापसाला ७००० रूपये व सोयाबीनला ४५०० रूपये भाव मिळावा, रासायनिक खते व बियाणे शेतकऱ्यांना ४५०० रूपये प्रती शंभर किलोचे दरात मिळावे, रासायनिक खते व बियाणे शेतकऱ्यांना सवलतीचे दरात मिळावे, ग्रामीण भागात मजुरांना शेतीत मजुरी नसल्याने रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी, आदी मागण्या बैठकीत करण्यात आल्या. याप्रसंगी यशवंत झाडे म्हणाले, मागील दहा वर्षात शेतीला लागणारे सर्व प्रकारचे बि-बियाणे, रासायनिक खते, फवारणी, औषधे, मजुरांची मजुरी, जनावरांचा चारा, प्रवास खर्च, वीज बिल पाच ते दहा पटीने वाढले. मात्र उत्पादित शेतमालाचे हमी दर मिळणे अपेक्षित आहे. प्रत्येकच पक्ष एकमेकांवर कुरघोडी करीत असतो. मात्र या भांडणात शेतकरी आत्महत्या, भारनियमन, शेतमालाचा दरवाढीचा प्रश्न कायम आहे. अशा स्थितीत सर्व शेतकरी बांधवांनी संघटित होण्याचे आवाहन त्यांनी केले. १ डिसेंबर रोजी सर्व जिल्ह्यात जिल्हा कचेरी समोर धरणे, मोर्चे, करण्याचा व १६ डिसेंबर २०१४ रोजी नागपूर हिवाळी अधिवशेनावर शेतकरी शेतमजुरांचा मोर्चा काढण्याचा ठराव शंकरराव दानव यांनी मांडला. यावेळी गोपाळ गाळकर, गणेश खिरोडकर, ज्ञानेदेव तायडे, देविदास राऊत, सुभाष खांडेकर, चंद्रभान नाखले, गणपत मेंढे, मारोतराव तलमले, जानराव नागमोते, अरूण बारई, संध्या संभे, कैलास डोंगरे, शिनगारे, ज्ञानेश्वर वैरागडे, पुष्पा धुर्वे, भोयर, सुरेश कुकडे उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)