शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनला साडेचार तर कापसाला सात हजार भाव द्या

By admin | Updated: November 19, 2014 22:46 IST

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची यावर्षी दैनावस्था आहे. बाजारपेठेत कापसाचे दर ३५०० ते ४००० प्रति क्विंटल तर सोयाबीन ३५०० प्रती क्विंटल आहे. या दरात कापूस व सोयाबीन विकून

वर्धा : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची यावर्षी दैनावस्था आहे. बाजारपेठेत कापसाचे दर ३५०० ते ४००० प्रति क्विंटल तर सोयाबीन ३५०० प्रती क्विंटल आहे. या दरात कापूस व सोयाबीन विकून शेतीला लावलेला खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे कापसाला सात हजार तर सोयाबीनला साडेचार हजार भाव देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने करण्यात आली. सभेच्या विदर्भातील प्रमुख कार्यकर्त्यांची सभा कार्यालयात यशवंत झाडे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. सभेकरिता राज्य सचिव किसन गुजर राज्य अध्यक्ष दादा रायपुरे प्रामुख्याने उपस्थित होते. शेतकरी वर्षभर कुटुंब कसे चालविणार हा प्रश्न आहे. स्वामिनाथन कमीशनच्या अहवालाप्रमाणे उत्पादन खर्च व ५० टक्के नफा जोडून सर्व शेतमालाचे उत्पादन दर केंद्र सरकारने जाहीर करावे व त्या दरात शेतमालाची सरकारी खरेदीची व्यवस्था शासनाने करावी यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे कापसाला ७००० रूपये व सोयाबीनला ४५०० रूपये भाव मिळावा, रासायनिक खते व बियाणे शेतकऱ्यांना ४५०० रूपये प्रती शंभर किलोचे दरात मिळावे, रासायनिक खते व बियाणे शेतकऱ्यांना सवलतीचे दरात मिळावे, ग्रामीण भागात मजुरांना शेतीत मजुरी नसल्याने रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी, आदी मागण्या बैठकीत करण्यात आल्या. याप्रसंगी यशवंत झाडे म्हणाले, मागील दहा वर्षात शेतीला लागणारे सर्व प्रकारचे बि-बियाणे, रासायनिक खते, फवारणी, औषधे, मजुरांची मजुरी, जनावरांचा चारा, प्रवास खर्च, वीज बिल पाच ते दहा पटीने वाढले. मात्र उत्पादित शेतमालाचे हमी दर मिळणे अपेक्षित आहे. प्रत्येकच पक्ष एकमेकांवर कुरघोडी करीत असतो. मात्र या भांडणात शेतकरी आत्महत्या, भारनियमन, शेतमालाचा दरवाढीचा प्रश्न कायम आहे. अशा स्थितीत सर्व शेतकरी बांधवांनी संघटित होण्याचे आवाहन त्यांनी केले. १ डिसेंबर रोजी सर्व जिल्ह्यात जिल्हा कचेरी समोर धरणे, मोर्चे, करण्याचा व १६ डिसेंबर २०१४ रोजी नागपूर हिवाळी अधिवशेनावर शेतकरी शेतमजुरांचा मोर्चा काढण्याचा ठराव शंकरराव दानव यांनी मांडला. यावेळी गोपाळ गाळकर, गणेश खिरोडकर, ज्ञानेदेव तायडे, देविदास राऊत, सुभाष खांडेकर, चंद्रभान नाखले, गणपत मेंढे, मारोतराव तलमले, जानराव नागमोते, अरूण बारई, संध्या संभे, कैलास डोंगरे, शिनगारे, ज्ञानेश्वर वैरागडे, पुष्पा धुर्वे, भोयर, सुरेश कुकडे उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)