शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या

By admin | Updated: November 6, 2014 23:01 IST

देशात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातील विदर्भात होत आहेत़ त्यातही पॅकेजग्रस्त वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम या सहा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा वेग अधिक आहे.

मागणी : किसान मोर्चाचे मुख्यमंत्र्यांना निवेदनवर्धा : देशात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातील विदर्भात होत आहेत़ त्यातही पॅकेजग्रस्त वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम या सहा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा वेग अधिक आहे. दरवर्षी या जिल्ह्यात एक हजारपेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करतात़ यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी किसान मोर्चाने केली़ याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही देण्यात आले़निवेदनात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही विदर्भातील जाहीर सभांमध्ये देण्यात आली होती़ २००६ मध्ये या पॅकेजग्रस्त जिल्ह्यात तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंह यांनी शेतकऱ्यांना व्याज माफीचे पॅकेज दिले होते; पण मुद्दल तशीच कायम राहिली़ त्यावर गत आठ वर्षांत पुन्हा तेवढेच व्याज झाले आहे. राज्य व केंद्र सरकारांना वारंवार निवेदने देऊनही विदर्भातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली नाही. या पॅकेजग्रस्त जिल्ह्यातील वर्धा व बुलढाणा जिल्हा सरकारी बँका डबघाइस आल्यात़ शेतकऱ्यांकडे या बँकांची किमान १५०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. कर्ज वसुलीसाठी बँक शेतकऱ्यांकडे जात असल्याने शेतकरी आत्महत्या वाढत आहेत़ या आत्महत्यांना नापिकी, कर्जाचा डोंगर, शेतमालाला अत्यंत कमी भाव व चुकीचे कृषी धोरण कारणीभूत आहे. या जिल्ह्यात सिंचन ४ टक्के आहे. यासाठी १५०० कोटी रुपयांचे पॅकेज केंद्र सरकारने त्वरित मंजूर करावे व शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्या, अशी मागणी प्रशांत इंगळे तिगावकर यांनी केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)