शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या

By admin | Updated: November 6, 2014 23:01 IST

देशात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातील विदर्भात होत आहेत़ त्यातही पॅकेजग्रस्त वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम या सहा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा वेग अधिक आहे.

मागणी : किसान मोर्चाचे मुख्यमंत्र्यांना निवेदनवर्धा : देशात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातील विदर्भात होत आहेत़ त्यातही पॅकेजग्रस्त वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम या सहा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा वेग अधिक आहे. दरवर्षी या जिल्ह्यात एक हजारपेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करतात़ यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी किसान मोर्चाने केली़ याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही देण्यात आले़निवेदनात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही विदर्भातील जाहीर सभांमध्ये देण्यात आली होती़ २००६ मध्ये या पॅकेजग्रस्त जिल्ह्यात तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंह यांनी शेतकऱ्यांना व्याज माफीचे पॅकेज दिले होते; पण मुद्दल तशीच कायम राहिली़ त्यावर गत आठ वर्षांत पुन्हा तेवढेच व्याज झाले आहे. राज्य व केंद्र सरकारांना वारंवार निवेदने देऊनही विदर्भातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली नाही. या पॅकेजग्रस्त जिल्ह्यातील वर्धा व बुलढाणा जिल्हा सरकारी बँका डबघाइस आल्यात़ शेतकऱ्यांकडे या बँकांची किमान १५०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. कर्ज वसुलीसाठी बँक शेतकऱ्यांकडे जात असल्याने शेतकरी आत्महत्या वाढत आहेत़ या आत्महत्यांना नापिकी, कर्जाचा डोंगर, शेतमालाला अत्यंत कमी भाव व चुकीचे कृषी धोरण कारणीभूत आहे. या जिल्ह्यात सिंचन ४ टक्के आहे. यासाठी १५०० कोटी रुपयांचे पॅकेज केंद्र सरकारने त्वरित मंजूर करावे व शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्या, अशी मागणी प्रशांत इंगळे तिगावकर यांनी केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)