शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तुरीसह चण्याचे चुकारे शेतकऱ्यांना त्वरित द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 23:50 IST

शेतकऱ्यांनी तूरीची व चण्याची विक्री नाफेडला केली. हा शेतमाल खरेदी-विक्रीचा व्यवहार होऊन बऱ्याच दिवसांचा कालावधीही लोटला. मात्र, या शेतकऱ्यांना अद्यापही त्यांच्या विकलेल्या शेतमालाचे चुकारे देण्यात आले नाही.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना साकडे : किसान अधिकार अभियानची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शेतकऱ्यांनी तूरीची व चण्याची विक्री नाफेडला केली. हा शेतमाल खरेदी-विक्रीचा व्यवहार होऊन बऱ्याच दिवसांचा कालावधीही लोटला. मात्र, या शेतकऱ्यांना अद्यापही त्यांच्या विकलेल्या शेतमालाचे चुकारे देण्यात आले नाही. त्यांना तुरीसह चण्याचे चुकारे तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी किसान अधिकार अभियानने केली आहे. तसे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.पूर्वीच जिल्ह्यातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदिल झाला आहे. इतकेच नव्हे तर गत वर्षी कपाशी उत्पादकांना गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांच्या अडचणींचा फायदा घेत त्यांच्या शेतमालाला अल्प दर देण्यात आला. थोडाफार समाधानकारक दर असल्याने अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याजवळील चणा व तूर नाफेड मार्फत शासनाला विकली. परंतु, नाफेडने शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या तूर व चण्याचे चुकारे दिले नाहीत. येत्या काही दिवसात जोरदार पाऊस झाल्यावर शेतकरी पेरणीच्या कामाला लागणार आहेत. ज्याच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे अशा काहींनी गत काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसादरम्यान विविध पिकांची पेरणी केली. परंतु, सध्या पावसाने दडी मारल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. अनेक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ सदर चुकारे देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना प्रविण उपासे, अभय वानखेडे, गजानन निम्रड, प्रशांत बोबडे, आशीष डंभारे, श्याम उईके, कार्तीक मोहदूरे, गोलू ठाकरे, बंडू अहेरकर, अनिल हाते आदींची उपस्थिती होती.कर्जमाफीचा लाभ देण्याची विनंतीकर्जमाफीच्या नावावर सरकारने शेतकऱ्यांची क्रुर थट्टाच केली आहे. अनेक शेतकºयांच्या बँक खात्यात रक्कमा जमा झाल्या नसुन बँकांकडून सऱ्हासपणे व्याजाची वसूली केली जात आहे. नवीन हंगामात बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असून योग्य सूचना देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी