शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
3
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
4
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
5
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
6
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
7
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
8
जातगणना : मॅजिक की मंडल?
9
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
10
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
11
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
12
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
13
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
14
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
15
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
16
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
17
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
18
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
19
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
20
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा

बुद्ध विहाराला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा द्या

By admin | Updated: April 29, 2016 02:14 IST

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे या शहरात २५ एप्रिल १९५४ रोजी आगमन झाले होते.

जोगेंद्र कवाडे : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बसविल्या होत्या कोनशिलापुलगाव : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे या शहरात २५ एप्रिल १९५४ रोजी आगमन झाले होते. त्यावेळी त्यांनी स्थानिक बुद्ध विद्या विहाराची स्वत: कोनशिला ठेवली होती. या वास्तूचे बांधकाम लोकवर्गणीतून करण्यात आले व ते पूर्णही झाले. राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार या बुद्ध विहाराला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा देऊन विकास करावा, अशी मागणी पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी येथे केली.बुद्धविहार समितीद्वारे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या आगमन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. ते पूढे म्हणाले की, शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या-ज्या ठिकाणी गेले त्या-त्या ठिकाणांचा बाबासाहेबांचे स्मारक म्हणून विकास करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. या घोषणेनुसार येथील बुद्ध विद्याविहाराला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा द्यावा. पुलगाव नगरीत डॉ. आंबेडकरांचे २५ एप्रिल १९५४ ला आगमन झाले व बौद्ध धर्माची दिक्षा घेण्यापूर्वीच या विहाराचे भूमिपूजन केले. त्यामुळे खरी धर्मक्रांती पुलगाव नगरीपासून सुरू झाली. तेव्हापासून व्यवस्थापक मंडळ डॉ. बाबासाहेबांचा आगमन दिन म्हणून २५ एप्रिल या दिवसाचे स्मरण करतात. ते कौतुकास पात्र आहेत. या विहाराचा प्रश्न आपण शासन दरबारी नेटाने लावल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून आ. कवाडे यांनी अनेक राष्ट्रीय मुद्यांना हात घातला.अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड. प्रेम भिमटे यांनी तरूण पिढीला डॉ. आंबेडकरांचे संपूर्ण लिखान वाचून काढावे. युवकांनी त्यांच्या मार्गावर चालावे, असे आवाहन केले.कार्यक्र्रमाचे प्रास्ताविक समितीचे उपाध्यक्ष चंद्रकांत वाघमारे यांनी केले. अहवाल वाचन अध्यक्ष हरिष नितनवरे यांनी तर संचालन सचिव गोरखनाथ मेश्राम यांनी केले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. गायक प्रवीण कांबळे यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)बौद्ध धर्माची दिक्षा घेण्यापूर्वीच बुद्धविहाराचे भूमिपूजनपुलगाव नगरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे २५ एप्रिल १९५४ रोजी आगमन झाले. बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यापूर्वीच बाबासाहेबांनी येथील बुद्ध विद्या विहाराचे भूमिपूजन केले. यामुळे खरी धर्मक्रांती पुलगाव नगरीपासून झाली, असे म्हणणे वावगे ठरणार नसल्याचे मतही आ.प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. यामुळे पुलगावच्या बुद्ध विद्या विहाराला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा मिळणे गरजेचे आहे.