शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

बुद्ध विहाराला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा द्या

By admin | Updated: April 29, 2016 02:14 IST

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे या शहरात २५ एप्रिल १९५४ रोजी आगमन झाले होते.

जोगेंद्र कवाडे : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बसविल्या होत्या कोनशिलापुलगाव : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे या शहरात २५ एप्रिल १९५४ रोजी आगमन झाले होते. त्यावेळी त्यांनी स्थानिक बुद्ध विद्या विहाराची स्वत: कोनशिला ठेवली होती. या वास्तूचे बांधकाम लोकवर्गणीतून करण्यात आले व ते पूर्णही झाले. राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार या बुद्ध विहाराला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा देऊन विकास करावा, अशी मागणी पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी येथे केली.बुद्धविहार समितीद्वारे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या आगमन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. ते पूढे म्हणाले की, शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या-ज्या ठिकाणी गेले त्या-त्या ठिकाणांचा बाबासाहेबांचे स्मारक म्हणून विकास करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. या घोषणेनुसार येथील बुद्ध विद्याविहाराला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा द्यावा. पुलगाव नगरीत डॉ. आंबेडकरांचे २५ एप्रिल १९५४ ला आगमन झाले व बौद्ध धर्माची दिक्षा घेण्यापूर्वीच या विहाराचे भूमिपूजन केले. त्यामुळे खरी धर्मक्रांती पुलगाव नगरीपासून सुरू झाली. तेव्हापासून व्यवस्थापक मंडळ डॉ. बाबासाहेबांचा आगमन दिन म्हणून २५ एप्रिल या दिवसाचे स्मरण करतात. ते कौतुकास पात्र आहेत. या विहाराचा प्रश्न आपण शासन दरबारी नेटाने लावल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून आ. कवाडे यांनी अनेक राष्ट्रीय मुद्यांना हात घातला.अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड. प्रेम भिमटे यांनी तरूण पिढीला डॉ. आंबेडकरांचे संपूर्ण लिखान वाचून काढावे. युवकांनी त्यांच्या मार्गावर चालावे, असे आवाहन केले.कार्यक्र्रमाचे प्रास्ताविक समितीचे उपाध्यक्ष चंद्रकांत वाघमारे यांनी केले. अहवाल वाचन अध्यक्ष हरिष नितनवरे यांनी तर संचालन सचिव गोरखनाथ मेश्राम यांनी केले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. गायक प्रवीण कांबळे यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)बौद्ध धर्माची दिक्षा घेण्यापूर्वीच बुद्धविहाराचे भूमिपूजनपुलगाव नगरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे २५ एप्रिल १९५४ रोजी आगमन झाले. बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यापूर्वीच बाबासाहेबांनी येथील बुद्ध विद्या विहाराचे भूमिपूजन केले. यामुळे खरी धर्मक्रांती पुलगाव नगरीपासून झाली, असे म्हणणे वावगे ठरणार नसल्याचे मतही आ.प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. यामुळे पुलगावच्या बुद्ध विद्या विहाराला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा मिळणे गरजेचे आहे.