शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

बुद्ध विहाराला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा द्या

By admin | Updated: April 29, 2016 02:14 IST

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे या शहरात २५ एप्रिल १९५४ रोजी आगमन झाले होते.

जोगेंद्र कवाडे : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बसविल्या होत्या कोनशिलापुलगाव : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे या शहरात २५ एप्रिल १९५४ रोजी आगमन झाले होते. त्यावेळी त्यांनी स्थानिक बुद्ध विद्या विहाराची स्वत: कोनशिला ठेवली होती. या वास्तूचे बांधकाम लोकवर्गणीतून करण्यात आले व ते पूर्णही झाले. राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार या बुद्ध विहाराला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा देऊन विकास करावा, अशी मागणी पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी येथे केली.बुद्धविहार समितीद्वारे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या आगमन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. ते पूढे म्हणाले की, शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या-ज्या ठिकाणी गेले त्या-त्या ठिकाणांचा बाबासाहेबांचे स्मारक म्हणून विकास करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. या घोषणेनुसार येथील बुद्ध विद्याविहाराला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा द्यावा. पुलगाव नगरीत डॉ. आंबेडकरांचे २५ एप्रिल १९५४ ला आगमन झाले व बौद्ध धर्माची दिक्षा घेण्यापूर्वीच या विहाराचे भूमिपूजन केले. त्यामुळे खरी धर्मक्रांती पुलगाव नगरीपासून सुरू झाली. तेव्हापासून व्यवस्थापक मंडळ डॉ. बाबासाहेबांचा आगमन दिन म्हणून २५ एप्रिल या दिवसाचे स्मरण करतात. ते कौतुकास पात्र आहेत. या विहाराचा प्रश्न आपण शासन दरबारी नेटाने लावल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून आ. कवाडे यांनी अनेक राष्ट्रीय मुद्यांना हात घातला.अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड. प्रेम भिमटे यांनी तरूण पिढीला डॉ. आंबेडकरांचे संपूर्ण लिखान वाचून काढावे. युवकांनी त्यांच्या मार्गावर चालावे, असे आवाहन केले.कार्यक्र्रमाचे प्रास्ताविक समितीचे उपाध्यक्ष चंद्रकांत वाघमारे यांनी केले. अहवाल वाचन अध्यक्ष हरिष नितनवरे यांनी तर संचालन सचिव गोरखनाथ मेश्राम यांनी केले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. गायक प्रवीण कांबळे यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)बौद्ध धर्माची दिक्षा घेण्यापूर्वीच बुद्धविहाराचे भूमिपूजनपुलगाव नगरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे २५ एप्रिल १९५४ रोजी आगमन झाले. बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यापूर्वीच बाबासाहेबांनी येथील बुद्ध विद्या विहाराचे भूमिपूजन केले. यामुळे खरी धर्मक्रांती पुलगाव नगरीपासून झाली, असे म्हणणे वावगे ठरणार नसल्याचे मतही आ.प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. यामुळे पुलगावच्या बुद्ध विद्या विहाराला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा मिळणे गरजेचे आहे.