शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

सोयाबीन उत्पादकांना बोनसची रक्कम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 23:52 IST

आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अत्यंत कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यावेळी सोयाबीन उत्पादकांना बोनस देण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली.

ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : उपनिबंधकांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अत्यंत कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यावेळी सोयाबीन उत्पादकांना बोनस देण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. त्याचा विचार करून सोयाबीन उत्पादकांना बोनस म्हणून रक्कम देण्याचे निश्चित करण्यात आले; पण अद्यापही सदर शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळालेली नाही. ती तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेची असून तसे निवेदन उपनिबंधकांना देण्यात आले आहे.शेतकºयांच्या सोयाबीनला हमीभाव वाढून देण्यासाठी आंदोलने करण्यात आले. त्यावर शासनाने हमीभाव न वाढवता प्रती क्विंटल २०० रूपयाचे बोनस जाहीर केला. परंतु, हे बोनस अद्यापही शेतकऱ्यापर्यंत पोहचलेच नाही. आर्वी, आष्टी, कारंजा या तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपैकी १ हजार २३६ शेतकऱ्यांची थकीत बोनसची रक्कम १७ लाखांच्या घरात आहे. तर जिल्ह्यातील थकबाकीदारांची रक्कम कोटींच्या घरात आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या व बॅँकांच्यावतीने पीक कर्ज देऊन व्याजासहीत वसूल केल्या जाते. त्याचप्रमाणे शेतकºयांचा हक्काचे लाखो रूपये शासनाकडे पडून आहेत. येत्या ८ ते १० दिवसाच्या आत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा त्यांच्या खात्यात जमा झाला नाही. तर पीक कर्जावर जेवढा व्याज दर बॅँकेकडून आकारला जातो तेवढाच व्याजदर लाऊन शेतकऱ्यांची थकीत बोनसची रक्कम त्यांना परत करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.येत्या काही दिवसात सदर मागणीवर विचार न झाल्यास जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेवून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. सदर निवेदन शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख निलेश देशमुख यांच्या नेतृत्त्वात उपनिबंधकांना देण्यात आले. उपनिबंधकांना निवेदन सादर करताना शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.आठ दिवसांचा दिला अल्टीमेटमजिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना थकित असलेल्या सोयाबीनच्या बोनसची रक्कम येत्या आठ दिवसात देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. येत्या आठ ते दहा दिवसात सोयाबीनच्या बोनसची रक्कम न मिळाल्यास शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या मदत क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना