शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

भाजपला सद्बुद्धी द्या, वीज दर निम्मे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 06:00 IST

विजेचे दर निम्मे झाले पाहिजेत याशिवाय बिलावरील अन्यायकारक कर, स्थिर आकार, वीज वहन कर आदी देणार नसल्याचा इशारा यावेळी आनदोलनकर्त्यांनी दिला. विजेचे दर निम्मे होत नाही, तसेच स्वतंत्र विदर्भाची निर्मिती होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र व केंद्र सरकारशी आर्थिक असहकार आंदोलन करीत कर, कर्जा नहीं देंगे, बिजली का बिल भी नहीं देंगे असा निर्धारही यावेळी करण्यात आला.

ठळक मुद्देवेगळ्या विदर्भासाठी बापूंना साकडे : विदर्भ राज्य समितीचा आत्मक्लेष, वर्ध्यातून आंदोलनाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भाजपला सद्बुद्धी द्यावी, विदर्भ राज्याची त्वरित निर्मिती करावी, असे विदर्भ राज्य आंदोलन समितीने सोमवारी सेवाग्रामात बापूंना साकडे घातले. यानंतर पदाधिकाऱ्यांनी महात्मा गांधी पुतळा परिसरात आत्मक्लेष करीत आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याला वर्ध्यातून प्रारंभ केला.विजेचे दर निम्मे झाले पाहिजेत याशिवाय बिलावरील अन्यायकारक कर, स्थिर आकार, वीज वहन कर आदी देणार नसल्याचा इशारा यावेळी आनदोलनकर्त्यांनी दिला. विजेचे दर निम्मे होत नाही, तसेच स्वतंत्र विदर्भाची निर्मिती होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र व केंद्र सरकारशी आर्थिक असहकार आंदोलन करीत कर, कर्जा नहीं देंगे, बिजली का बिल भी नहीं देंगे असा निर्धारही यावेळी करण्यात आला. प्रारंभी सेवाग्राम येथे प्रार्थना करण्यात आली.आंदोलनात माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, समितीचे मुख्य संयोजक राम नेवले, महिला आघाडीच्या विदर्भ प्रदेश अध्यक्ष रंजना मामर्डे, मधुसूदन हरणे, शैला देशपांडे, देवीदास लांजेवार, अरुण केदार, केशरवानी, रितेश मासुरकर, अशोक कोल्हे, गणेश शर्मा, पांडुरंग भालशंकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता. आंदोलनस्थळी हैदराबाद येथील अत्याचार आणि हत्याकांडातील तरुणीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. सायंकाळी निंबू पाणी घेऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली.शिवसेनेच्या धाकाने मुद्याला बगलआंदोलस्थळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राम नेवले म्हणाले, आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याला सेवाग्राम येथून सुरुवात करण्यात आली. यावेळी गांधींना साकडे घालत भाजपने दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आणि या सरकारला सद्बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना केली. वेगळ्या विदर्भासाठी खुद्द भाजपनेच आमगाव ते खामगाव असे यात्रेद्वारे आंदोलन केले. मात्र, सत्तारुढ होताच भाजपने केवळ शिवसेनेच्या धाकाने वेगळ्या विदर्भाच्या मुद्याला बाजूला सारले. या सरकारने जनतेचा विश्वासघात केला, असा आरोपही त्यांनी केला. विदर्भ राज्य आंदोलन समितीने २०२३ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य कसग मिळवून घेता येईल याकरिता सरकारला आर्थिक असहयोग, रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन व वेगळ्या विदर्भाविषयी अखेरच्या गावापर्यंत जागर अशी आंदोलनाची आखणी केली असल्याचे सांगितले. आता युती तुटल्याने स्वतंत्र विदर्भाचा मार्ग सुकर झाल्याचेही ते म्हणाले.अ‍ॅड. चटप यांनी वेगळ्या विदर्भाविषयी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे दाखले दिले. विदर्भ राज्य सक्षम असून उत्पन्न १३ हजार कोटींनी वाढल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे वेगळ्या विदर्भाला विरोध करणाऱ्यांची तोंडे बंद झाल्याचेही ते म्हणाले. सरकारला स्वतंत्र विदर्भ देण्यासाठी भाग पाडू, प्रसंगी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू, असाही इशारा दिला.सात टप्प्यात आंदोलनआंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात स्वतंत्र विदर्भ राज्य होईपर्यंत कर, कर्जा नहीं देंगे, बिजली का बिल भी नहीं देंगे, कर, कर्ज, वीजबिल वसुली व वीज तोडणाऱ्या अधिकाऱ्यांना गावात, मोहल्ल्यात येण्यास मनाई अस फलक जिल्हा, तालुकास्तरावर लावण्यात येणार आहेत.तिसऱ्या टप्प्यात वीज महावितरणच्या मुख्य अभियंत्याच्या कार्यालयासमोर धरणे व निदर्शने, १० फेब्रुवारीला जिल्हा व तालुकास्तरावर रास्ता रोको, जेल भरो आंदोलन, २५ ला नागपूर येथे रेल रोको आंदोलन, चौथ्या टप्प्यात कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, पाचव्या टप्प्यात तेलंगणा राज्यात अभ्यास सहल, सहाव्या टप्प्यात सभा, संमेलने, युवक-महिला मेळावे, जनजागृती आणि सातव्या टप्प्यात १ मे २०२० महाराष्ट्र दिन काळा दिवस पाळून संपूर्ण विदर्भ बंद आंदोलन करण्यात येणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना