शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

आशा वर्करला योग्य मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 22:06 IST

आशा वर्कर जिल्हाभर ग्रामीण व शहरी भागात आरोग्य विभागांतर्गत कार्यत आहे. त्यांच्या यादीत ४२ प्रकारची कामे आहे; पण केंद्र व राज्य शासनाने आयुष्यमान भारत योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांवर सोपविली आहे.

ठळक मुद्देसीआयटीयूची मागणी : जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आशा वर्कर जिल्हाभर ग्रामीण व शहरी भागात आरोग्य विभागांतर्गत कार्यत आहे. त्यांच्या यादीत ४२ प्रकारची कामे आहे; पण केंद्र व राज्य शासनाने आयुष्यमान भारत योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांवर सोपविली आहे. यासाठी प्रती कुटूंब ५ रुपये एवढा अल्प मोबदला आशा वर्करला जाहीर केला आहे. हा मोबदला अत्यंत कमी व अपमानजनक आहे. एका कुटुंबाच्या सर्वेक्षणास अर्धा ते एक तास लागतो. यामुळे हा मोबदला वाढवून प्रती कुटूंब ५० रुपये करावा, अशी मागणी वर्धा जिल्हा वर्कर कर्मचारी संघटना सिटूद्वारे करण्यात आली आहे.याबाबत सिटू संघटनेच्या आशा वर्कर महिलांच्यावतीने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देताना आशा वर्कर कर्मचारी संघटनेच्या जिल्हा सेक्रेटरी अर्चना घुगरे, जिल्हाध्यक्ष अलका जराते, रमा ढोले, सदस्य सुनीता मून, सिटूचे सुनील घिमे, भैय्या देशकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी अरुणा हजारे, सुनीला थूल, संगीता ढोले, गीता घुगरे, माया जुनगडे, संध्या नागपुरे, अनीता वांदिले, वंदना ढाले, ममता खैरकार, जयमाला झाडे प्रमिला झाडे आदीही उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, वित्तमंत्री, प्रधान सचिव आरोग्य विभाग, संचालक संजीव कुमार व आमदार, खासदार यांना देण्यात आल्या आहेत.आशा वर्करला आधीच कुठलेही मानधन दिले जात नाही. रोगी आणले त्याप्रमाणात अल्प मोबदला दिला जातो. आठ-आठ तास काम करूनही महिन्याकाठी दोन ते तीन हजार रुपये मिळतात; पण नव्याने दारिद्र्य रेषेखालील आरोग्य सर्वेक्षणाचे काम आणि तेही प्रती कुटूंब पाच रुपये या दराने देऊन आर्थिक शोषण करू नये. श्रम अधिक आणि मोबदला कमी, ही स्थिती असून कुटूंब सर्वेक्षणाकरिता प्रती कुटूंब ५० रुपये मोबदला आशांना तर गटप्रवर्तकांना किमान २ हजार रुपये द्यावेत, अशी मागणी जिल्हा सचिव अर्चना घुगरे व अध्यक्ष प्रमिला जराते यांनी प्रशासनाकडे केली आहे. यावर प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.सर्वेक्षणाचे काम आशा वर्कर व गटप्रवर्तक महिलांनी शासनाचा आदेश व आपले कर्तव्य म्हणून सुरूही केले आहे. आमच्या कामाचा न्याय्य व योग्य आर्थिक मोबदला द्यावा, अशी मागणी सिटूचे सुनील घिमे यांनी केली आहे.