शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

‘टीईटी’चे भूत पुन्हा मानगुटीवर

By admin | Updated: November 15, 2014 22:51 IST

मागील वर्षी शिक्षक पात्रता परीक्षेच्या माध्यमातून शासनाने कोट्यवधीची कमाई केली़ आता पुन्हा टीईटी परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये होऊ घातली आहे़ यामुळे डीएड, बीएड अर्हता धारक बेरोजगारांना भुर्दंड

प्रभाकर गायकवाड ल्ल पिंपळखुटामागील वर्षी शिक्षक पात्रता परीक्षेच्या माध्यमातून शासनाने कोट्यवधीची कमाई केली़ आता पुन्हा टीईटी परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये होऊ घातली आहे़ यामुळे डीएड, बीएड अर्हता धारक बेरोजगारांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे़ डीएड, बीएड झाल्यानंतरही पात्रता सिद्ध करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली ही परीक्षा म्हणजे बेरोजगारांना लुटण्याचा घाट असल्याच्या प्रतिक्रीया आता बेरोजगारांतून उमटत आहेत़मागील वर्षी केवळ पाच टक्के विद्यार्थ्यांनाच उत्तीर्ण करता आलेली टीईटी परीक्षा अनेक घोळांमुळे गाजली होती़ या परीक्षेच्या माध्यमातून मागील वर्षी शासनाने ३० कोटी रुपयांचा भुर्दंड बेरोजगार भावी शिक्षकांवर लादला होता़ यंदाही मागील वर्षीप्रमाणे डिसेंबर २०१४ मध्ये पुन्हा टीईटी परीक्षेचा घाट शासनाने घातला आहे़ शिक्षण अधिकार कायद्यानुसार ५-३-२ चा फॉर्म्यूला अंमलात आणला असून पहिल्या स्तरात इयत्ता बारावी डीएड तर दुसऱ्या स्तरात पदवीधर शिक्षकांची नियुक्ती अनिवार्य आहे़ शासनाने यासाठी प्राथमिक शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी अनिवार्य केली आहे़एका स्तरासाठी परीक्षा शुल्क ५०० रुपये तर दोन्ही परीक्षांसाठी ८०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे़ मागील परीक्षेतही असेच शुल्क आकारण्यात आले होते़ त्यावेळी लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली़ या परीक्षेत अनेक त्रुट्या राहिल्याने केवळ पाच टक्केच निकाल लागला होता़ शासनाची मात्र कोट्यवधीची कमाई झाली़ टीईटी पास होणे म्हणजे नोकरी नव्हे ती केवळ प्रमाणपत्र मिळविण्याची परीक्षा आहे़ गतवेळी उत्तीर्ण झालेले हजारो बेरोजगार आजही नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत़ दरम्यान, शिक्षण अधिकार कायद्यानुसार नव्याने करण्यात आलेल्या संच मान्यतेत हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत़ या शिक्षकांचे समायोजन हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे़ समायोजन प्रक्रिया पूर्ण होऊनही शिक्षक अतिरिक्त राहण्याची शक्यता आहे़ अशी अवस्था असताना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे़ १४ डिसेंबर २०१४ रोजी ही परीक्षा होत आहे़ यंदाही पूर्वीप्रमाणेच शुल्क आकारण्यात आले आहे़ नोकरीची कुठलीही हमी नसताना परीक्षा पास झाल्यानंतर केवळ प्रमाणपत्र हातात घेऊन फिरणाऱ्या तरूणांकडून परीक्षा शुल्कापोटी कोट्यवधींची कमाई करण्याचा घाट शासनाने घातला असल्याचा संताप बेरोजगारांकडून व्यक्त होत आहे़