शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

‘टीईटी’चे भूत पुन्हा मानगुटीवर

By admin | Updated: November 15, 2014 22:51 IST

मागील वर्षी शिक्षक पात्रता परीक्षेच्या माध्यमातून शासनाने कोट्यवधीची कमाई केली़ आता पुन्हा टीईटी परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये होऊ घातली आहे़ यामुळे डीएड, बीएड अर्हता धारक बेरोजगारांना भुर्दंड

प्रभाकर गायकवाड ल्ल पिंपळखुटामागील वर्षी शिक्षक पात्रता परीक्षेच्या माध्यमातून शासनाने कोट्यवधीची कमाई केली़ आता पुन्हा टीईटी परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये होऊ घातली आहे़ यामुळे डीएड, बीएड अर्हता धारक बेरोजगारांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे़ डीएड, बीएड झाल्यानंतरही पात्रता सिद्ध करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली ही परीक्षा म्हणजे बेरोजगारांना लुटण्याचा घाट असल्याच्या प्रतिक्रीया आता बेरोजगारांतून उमटत आहेत़मागील वर्षी केवळ पाच टक्के विद्यार्थ्यांनाच उत्तीर्ण करता आलेली टीईटी परीक्षा अनेक घोळांमुळे गाजली होती़ या परीक्षेच्या माध्यमातून मागील वर्षी शासनाने ३० कोटी रुपयांचा भुर्दंड बेरोजगार भावी शिक्षकांवर लादला होता़ यंदाही मागील वर्षीप्रमाणे डिसेंबर २०१४ मध्ये पुन्हा टीईटी परीक्षेचा घाट शासनाने घातला आहे़ शिक्षण अधिकार कायद्यानुसार ५-३-२ चा फॉर्म्यूला अंमलात आणला असून पहिल्या स्तरात इयत्ता बारावी डीएड तर दुसऱ्या स्तरात पदवीधर शिक्षकांची नियुक्ती अनिवार्य आहे़ शासनाने यासाठी प्राथमिक शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी अनिवार्य केली आहे़एका स्तरासाठी परीक्षा शुल्क ५०० रुपये तर दोन्ही परीक्षांसाठी ८०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे़ मागील परीक्षेतही असेच शुल्क आकारण्यात आले होते़ त्यावेळी लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली़ या परीक्षेत अनेक त्रुट्या राहिल्याने केवळ पाच टक्केच निकाल लागला होता़ शासनाची मात्र कोट्यवधीची कमाई झाली़ टीईटी पास होणे म्हणजे नोकरी नव्हे ती केवळ प्रमाणपत्र मिळविण्याची परीक्षा आहे़ गतवेळी उत्तीर्ण झालेले हजारो बेरोजगार आजही नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत़ दरम्यान, शिक्षण अधिकार कायद्यानुसार नव्याने करण्यात आलेल्या संच मान्यतेत हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत़ या शिक्षकांचे समायोजन हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे़ समायोजन प्रक्रिया पूर्ण होऊनही शिक्षक अतिरिक्त राहण्याची शक्यता आहे़ अशी अवस्था असताना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे़ १४ डिसेंबर २०१४ रोजी ही परीक्षा होत आहे़ यंदाही पूर्वीप्रमाणेच शुल्क आकारण्यात आले आहे़ नोकरीची कुठलीही हमी नसताना परीक्षा पास झाल्यानंतर केवळ प्रमाणपत्र हातात घेऊन फिरणाऱ्या तरूणांकडून परीक्षा शुल्कापोटी कोट्यवधींची कमाई करण्याचा घाट शासनाने घातला असल्याचा संताप बेरोजगारांकडून व्यक्त होत आहे़