शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

पीक विमा काढला असताना लाभ मिळेना

By admin | Updated: April 9, 2017 00:27 IST

शेतकऱ्यांना नापिकीने चांगलेच जेरीस आणले आहे. यापासून दिलासा मिळावा म्हणून पीक विमा योजना अंमलात आणली.

कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न : खर्च ४२ हजार ३५०, तर उत्पन्न १० हजार ३०० रूपये वायगाव (नि.) : शेतकऱ्यांना नापिकीने चांगलेच जेरीस आणले आहे. यापासून दिलासा मिळावा म्हणून पीक विमा योजना अंमलात आणली. मात्र या योजनेचा लाभ वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. वायगाव येथील शेतकऱ्याच्या असा बाबतीत घडला. विम्याची रक्कम भरुनही शेतकऱ्याला अद्याप लाभ मिळालेला नाही. तक्रार करुनही कृषी विभाकडून याची साधी चौकशी करण्यात आली नाही. वायगाव येथील एका शेतकऱ्याने त्यांच्याकडे असलेल्या ४ एकरात सोयाबीन व तुरीचा पेरा केला. याकरिता ४२ हजार ३५० रूपये खर्च आला. मात्र चार एकरात त्यांना केवळ दोन पोते सोयाबीन तर दीड पोते तुरीचे पीक झाले. केवळ १० हजार ३०० रूपयाचे उत्पन्न झाले. यातून शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, मुलांचे शिक्षण कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. पीक विमा केल्यानंतर त्याचा लाभ मिळत नसल्याने तालुका कृषी अधिकारी, वर्धा व भारतीय स्टेट बँक यांच्याकडे वारंवार निवेदन देण्यात आले. यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्याने याची साधी चौकशी केली नाही. बँकेने काढलेल्या पीक विम्याची रक्कम त्यांना देण्यात आली नाही. वायगाव (नि.) येथील भूजंग कृष्णाजी तितरे यांनी शेतीच्या मशागतीपासून तर उत्पादन घरात येईपर्यंत ४२ हजार ३५० रूपये खर्च केला. शेतातील तूर पावसाने पूर्ण जळली. त्यात पुन्हा पेरा केला. सोयाबीनची सवंगणी केल्यावर केवळ दोन पोते उत्पन्न झाले. तुरीचे अल्प उत्पन्न आले. यानंतर शेतकऱ्याने प्रस्ताव सादर केला. मात्र लाभ मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांची संख्या भरपूर आहे. ज्या शेतकऱ्यांनी बँकेमार्फत पीक विमा काढाला त्यांना प्रस्ताव सादर करुन पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. भूजंग तितरे यांनी संबंधित अधिकारी यांना वारंवार पत्र दिले. अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संबंधित विभागाने अशा शेतकऱ्यांची यादी तयार करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्याने काढलेल्या विम्याचा लाभ वेळेवर मिळत नसेल तर या योजनेला काय अर्थ, अशी ओरड शेतकऱ्यांतून होत आहे.(वार्ताहर) तक्रारीकडे डोळेझाक कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. मात्र निसर्गाच्या अवकृपेने परिस्थिती यंदाही उलट झाली. शेतकऱ्यांनी काढलेला पीक विमा योजनेचा मात्र त्यांना लाभ मिळत नाही. कृषी विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. प्रस्ताव सादर केल्यावर विमा कंपनी रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे प्रकार वाढीस लागले असून याची दखल घेण्याची मागणी आहे. शेतीसाठी कर्ज काढले होते. त्यात सोयाबीन पिकाच्या पेरणीपासून उत्पन्न घरात येईपर्यंत ४२ हजार ३५० रूपये खर्च झाला. उत्पन्न मात्र १० हजार ३०० रूपयाचे झाले. यामुळे आता कर्ज कसे फेडावे, कुटुंब कसे चालवावे, हा प्रश्न आहे. येत्या हंगामाची तयारी कशी करावी याची चिंता आहे. पीक विमा काढला, कागदपत्र सादर केले मात्र याचा फायदा झाला नाही. - भूजंग तितरे, शेतकरी, वायगाव(नि.)