शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
4
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
5
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
6
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
7
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
8
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
9
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
10
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
11
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
12
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
13
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
14
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
15
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
16
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
17
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
18
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
19
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
20
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

पीक विमा काढला असताना लाभ मिळेना

By admin | Updated: April 9, 2017 00:27 IST

शेतकऱ्यांना नापिकीने चांगलेच जेरीस आणले आहे. यापासून दिलासा मिळावा म्हणून पीक विमा योजना अंमलात आणली.

कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न : खर्च ४२ हजार ३५०, तर उत्पन्न १० हजार ३०० रूपये वायगाव (नि.) : शेतकऱ्यांना नापिकीने चांगलेच जेरीस आणले आहे. यापासून दिलासा मिळावा म्हणून पीक विमा योजना अंमलात आणली. मात्र या योजनेचा लाभ वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. वायगाव येथील शेतकऱ्याच्या असा बाबतीत घडला. विम्याची रक्कम भरुनही शेतकऱ्याला अद्याप लाभ मिळालेला नाही. तक्रार करुनही कृषी विभाकडून याची साधी चौकशी करण्यात आली नाही. वायगाव येथील एका शेतकऱ्याने त्यांच्याकडे असलेल्या ४ एकरात सोयाबीन व तुरीचा पेरा केला. याकरिता ४२ हजार ३५० रूपये खर्च आला. मात्र चार एकरात त्यांना केवळ दोन पोते सोयाबीन तर दीड पोते तुरीचे पीक झाले. केवळ १० हजार ३०० रूपयाचे उत्पन्न झाले. यातून शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, मुलांचे शिक्षण कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. पीक विमा केल्यानंतर त्याचा लाभ मिळत नसल्याने तालुका कृषी अधिकारी, वर्धा व भारतीय स्टेट बँक यांच्याकडे वारंवार निवेदन देण्यात आले. यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्याने याची साधी चौकशी केली नाही. बँकेने काढलेल्या पीक विम्याची रक्कम त्यांना देण्यात आली नाही. वायगाव (नि.) येथील भूजंग कृष्णाजी तितरे यांनी शेतीच्या मशागतीपासून तर उत्पादन घरात येईपर्यंत ४२ हजार ३५० रूपये खर्च केला. शेतातील तूर पावसाने पूर्ण जळली. त्यात पुन्हा पेरा केला. सोयाबीनची सवंगणी केल्यावर केवळ दोन पोते उत्पन्न झाले. तुरीचे अल्प उत्पन्न आले. यानंतर शेतकऱ्याने प्रस्ताव सादर केला. मात्र लाभ मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांची संख्या भरपूर आहे. ज्या शेतकऱ्यांनी बँकेमार्फत पीक विमा काढाला त्यांना प्रस्ताव सादर करुन पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. भूजंग तितरे यांनी संबंधित अधिकारी यांना वारंवार पत्र दिले. अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संबंधित विभागाने अशा शेतकऱ्यांची यादी तयार करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्याने काढलेल्या विम्याचा लाभ वेळेवर मिळत नसेल तर या योजनेला काय अर्थ, अशी ओरड शेतकऱ्यांतून होत आहे.(वार्ताहर) तक्रारीकडे डोळेझाक कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. मात्र निसर्गाच्या अवकृपेने परिस्थिती यंदाही उलट झाली. शेतकऱ्यांनी काढलेला पीक विमा योजनेचा मात्र त्यांना लाभ मिळत नाही. कृषी विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. प्रस्ताव सादर केल्यावर विमा कंपनी रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे प्रकार वाढीस लागले असून याची दखल घेण्याची मागणी आहे. शेतीसाठी कर्ज काढले होते. त्यात सोयाबीन पिकाच्या पेरणीपासून उत्पन्न घरात येईपर्यंत ४२ हजार ३५० रूपये खर्च झाला. उत्पन्न मात्र १० हजार ३०० रूपयाचे झाले. यामुळे आता कर्ज कसे फेडावे, कुटुंब कसे चालवावे, हा प्रश्न आहे. येत्या हंगामाची तयारी कशी करावी याची चिंता आहे. पीक विमा काढला, कागदपत्र सादर केले मात्र याचा फायदा झाला नाही. - भूजंग तितरे, शेतकरी, वायगाव(नि.)