शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांपासून जात प्रमाणपत्र मिळेणा!

By admin | Updated: February 5, 2015 23:14 IST

परिसरातील विद्यार्थी व गरजू नागरिकांना विविध प्रमाणपत्रांसाठी आर्वी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात जावे लागते़ येथे एसडीओ गरजूंना जातीचे प्रमाणपत्र देताना कागदपत्रांची

आदिवासी महिला योजनांच्या लाभापासून वंचितरोहणा : परिसरातील विद्यार्थी व गरजू नागरिकांना विविध प्रमाणपत्रांसाठी आर्वी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात जावे लागते़ येथे एसडीओ गरजूंना जातीचे प्रमाणपत्र देताना कागदपत्रांची पूर्तता करूनही त्रूटी काढून प्रमाणपत्र देत नसल्याचा आरोप होत आहे़ यामुळे नागरिक त्रस्त असून कारवाईची मागणी होत आहे़शशिकला जानबाजी मडावी या मांडवा येथील रहिवासी असून त्यांचे पारगोठाण हे माहेर आहे़ त्यांचे माहेरकडील आडनाव तलांजी असून त्यांनी जात प्रमाणपत्र मिळावे म्हणून २४ सप्टेंबर २०१४ रोजी उपविभागीय अधिकारी आर्वी यांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर केला़ त्या निरक्षर असून त्यांनी शाळेत कधीच प्रवेश घेतला नाही़ त्यांनी आपल्या प्रस्तावासोबत रहिवासी दाखला, जन्माचा दाखला, १९५० च्या आधीची कुटुंबातील वरिष्ठांची नोंद असल्याचा दाखला, कुटुंबातील तीन जवळच्या व्यक्तींच्या जात पडताळणी प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती व अन्य आवश्यक प्रमाणपत्रे सादर केली; पण त्यांना अद्याप जात प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही़ त्यांना प्रस्तावासोबत शाळेचा दाखला जोडा, असे फर्मान सोडण्यात आले़ त्या शाळेत शिकल्या नसल्याने त्यांना शाळा प्रवेशाचा वा शाळा सोडल्याचा दाखल कसा मिळणार, हा प्रश्नच आहे़ त्यांनी एसडीओ कार्यालयात बऱ्याच चकरा मारल्या; पण त्यांना जात प्रमाणपत्र मिळाले नाही़ लेखी स्वरूपात त्रूटी लावून त्यांचा प्रस्तावही परत करण्यात आला नाही़ त्यांनी माहिती अधिकारात याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना माहिती मागितली; पण यातही अपूर्ण माहिती देऊन वरिष्ठांकडे तक्रार करण्याच्या मार्गात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला़ त्या आदिवासी समाजाच्या असून त्यांना नियमाप्रमाणे ४५ दिवसांच्या आत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे किंवा प्रस्ताव त्रूटी लावून परत करणे आवश्यक आहे; पण नियमांची पूर्ण जाण असणारेच अडवणुकीचे धोरण स्वीकारून नियमांना डावलत असल्याचा प्रकार येथे दिसून आला़ या प्रकरणी आपण कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न शशिकला मडावी या निरक्षर महिलेसमोर उभा ठाकला आहे़ जात प्रमाणपत्र नसल्याने त्यांना शासनाच्या आदिवासी समाजासाठी असलेल्या अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे़ बोगस आदिवासींना सहज प्रमाणपत्र देणारे अधिकारी खऱ्या आदिवासींना त्रास देत आहेत़ याकडे लक्ष देत कारवाईची मागणी होत आहे़(वार्ताहर)