शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
5
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
6
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
7
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
8
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
9
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
10
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
11
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
12
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
13
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
14
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
16
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
17
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
18
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
19
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
20
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली

भूगर्भाची चाळण; महिनाभरात ५४५ बोअरवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:28 IST

पाण्याची टंचाई लक्षात घेता संधीच सोनं करण्यासाठी काहींनी ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याची अफवा उडविली. यामुळे पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी बोअरवेल खोदण्याचा सपाटा सुरू केला.

ठळक मुद्देखोट्या अफवेचे बळी : पाण्यासाठी वायगाव (नि.) येथे कोट्यवधींची उलाढाल

गौरव देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : पाण्याची टंचाई लक्षात घेता संधीच सोनं करण्यासाठी काहींनी ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याची अफवा उडविली. यामुळे पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी बोअरवेल खोदण्याचा सपाटा सुरू केला. त्यासाठी बोअरवेल व्यावसायिकांनी दुसऱ्या राज्यातून मशीन आणून रात्रंदिवस जमीन पोखरली. एकट्या वायगावातच महिनाभरात तब्बल ५४५ बोअरवेल खोदण्यात आल्या असून यातून कोट्यवधींची उलाढाल झाली. हीच अवस्था जिल्ह्यात इतरही ठिकाणची असल्याने या अफवेचे किती बळी पडले असावेत, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.वर्धा तालुक्यात मागील दोन वर्षापासून पाण्याच्या टंचाईचा सामना करावाल लागत आहे. याहीवर्षी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलपासुनच पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहे. गावात पाणी पुरवठा करण्याकरिता जीवन प्राधिकरणची पाणी पुरवठा योजना आहेत. पण, पाणी टंचाईमुळे गावाला दहा ते पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यामुळे गावात पाणीबाणी निर्माण झाली असून येत्या दिवसात हे पाणी संकट आणखीच तीव्र होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी भूगर्भातील पाण्याचा शोध सुरु केला. याचाच फायदा घेत ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याच्या वावड्या उठविण्यात आल्या. या नागरिकांनी चांगल्याच मनावर घेतल्याने सर्वांनीच ३१ डिसेंबरच्या आता बोअरवेल करण्याचा सपाटा सुरु केला. बोअरवेल व्यावसायिकांनीही बोअरवेल करण्याचे व केसींगचे दर वाढवून आपले उखळ पांढरे केले. सुरुवातीला ८० ते ८५ रुपये प्रति फुट असलेला दर १०० रुपयांवर नेला तर केसींगचा १५० ते १६० रुपये प्रति फुट असलेला दर हा दोनशे रुपये करुन नागरिकांचा खिसा खाली केला. पाण्याच्या काळजीपोटी चिंतेत असलेल्या नारिकांनी बोअरवेल करण्याची मागणी केल्याने ही मागणी पुर्ण करण्यासाठी वर्ध्यातील मशीनी कमी पडू लागल्याने बाहेर राज्यातून दहा ते पंधरा मशीन बोलाविण्यात आल्या होत्या. दिवस-रात्र मशीन चालवून वायगावात १ डिसेंबर ते २ जानेवारी या एका महिन्याच्या कालावधीत ५४५ बोअरवेल करण्यात आल्या. एका बोअरवेलकरिता ४० ते ५० हजार रुपये खर्च असल्याने एकाच महिन्यात कोट्यवधीची उलाढाल झाल्याने; एका अफवेमुळे पाण्यासाठी वायगावकरांनी पाण्यासारखा पैसा खर्च केल्याचे दिसून येत आहे.पाण्याच्या शोधात एकाच घरी खोदल्या दोन ते तीन बोअरवेलवायगावातील नागरिकांनी पाणी मिळविण्यासाठी चालविलेल्या या स्पर्धेमुळे भूगर्भातील पाणीही संपुष्टात येत आहे. एका घरी बोअरवेल केल्यानंतर पाणी लागले नाही तर लागलीच दुसºया ठिकाणी बोअरवेल करुन पाण्याचा शोध घेण्यासाठी जमीन पोखरण्यात आली. इतकेच नाही तर कमी पाणी लागले असता जास्त पाण्याच्या शोधातही जमीन पोखरुन एकाच घरी दोन ते तीन बोअरवेल केल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाण्यासाठी जिकडेतिकडे भूगर्भाची चाळणी सुरु असल्याने आता बोअरवेलला लागलेले पाणीही फार काळपर्यंत टिकण्याची शक्यता नसल्याचेही नागरिकांकडूनच बोलले जात आहे.उसणवारी पैशातून केली पाण्याची सोयबोअरवेलवर बंदी असल्याने गावात बोअरवेल करण्याचा सपाटा सुरु झाला. नागरिकांनी १०० ते २०० फुटापर्यंत पाण्याचा शोध घेतला. एका पाठोपाठ एक असा बोअरवेलचा सपाटा सुरु झाल्याने नागरिकांनी पाण्याची भविष्यकालीन तरतूद करण्यासाठी बोअरवेलला पसंती दिली. यावर्षी उत्पादनातही कमालीची घट झाल्याने हातात पैसा नसतानाही पाणी जीवानावश्यक असल्यामुळे उसणवारी व व्याजाने पैसे घेऊन बोअरवेल केल्याचेही उदाहरण पहावयास मिळत आहे. या एका अफवेने भूगर्भही पोखरला असून नागरिकांनाही कर्जबाजारी केले आहे.पाणी उपसले, आता जिरवायलाही शिकावेदुष्काळी परिस्थितीमुळे भूगर्भातही पाणी खोलवर गेले आहे. आपण आहे तेवढे पाणी उपसण्यासाठी सदैव तत्पर असतो. पण, बोअरवेलचे प्रमाण दुप्पट-तिप्पट वाढल्याने भूगर्भातील पाणीही फार काळ टिकणार नाही. त्यामुळे आपण जसे पाणी उपसतो तसेच जमिनीत पाणी मुरविण्यासाठी तत्पर असले पाहिजे. त्याकरिता जलपुनर्भरणावर भर द्यावी. घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी हे जमिनीत मुरवावे, पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन जलतज्ज्ञांकडून केले जात आहे.

टॅग्स :Waterपाणी