शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

भूगर्भाची चाळण; महिनाभरात ५४५ बोअरवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:28 IST

पाण्याची टंचाई लक्षात घेता संधीच सोनं करण्यासाठी काहींनी ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याची अफवा उडविली. यामुळे पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी बोअरवेल खोदण्याचा सपाटा सुरू केला.

ठळक मुद्देखोट्या अफवेचे बळी : पाण्यासाठी वायगाव (नि.) येथे कोट्यवधींची उलाढाल

गौरव देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : पाण्याची टंचाई लक्षात घेता संधीच सोनं करण्यासाठी काहींनी ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याची अफवा उडविली. यामुळे पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी बोअरवेल खोदण्याचा सपाटा सुरू केला. त्यासाठी बोअरवेल व्यावसायिकांनी दुसऱ्या राज्यातून मशीन आणून रात्रंदिवस जमीन पोखरली. एकट्या वायगावातच महिनाभरात तब्बल ५४५ बोअरवेल खोदण्यात आल्या असून यातून कोट्यवधींची उलाढाल झाली. हीच अवस्था जिल्ह्यात इतरही ठिकाणची असल्याने या अफवेचे किती बळी पडले असावेत, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.वर्धा तालुक्यात मागील दोन वर्षापासून पाण्याच्या टंचाईचा सामना करावाल लागत आहे. याहीवर्षी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलपासुनच पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहे. गावात पाणी पुरवठा करण्याकरिता जीवन प्राधिकरणची पाणी पुरवठा योजना आहेत. पण, पाणी टंचाईमुळे गावाला दहा ते पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यामुळे गावात पाणीबाणी निर्माण झाली असून येत्या दिवसात हे पाणी संकट आणखीच तीव्र होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी भूगर्भातील पाण्याचा शोध सुरु केला. याचाच फायदा घेत ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याच्या वावड्या उठविण्यात आल्या. या नागरिकांनी चांगल्याच मनावर घेतल्याने सर्वांनीच ३१ डिसेंबरच्या आता बोअरवेल करण्याचा सपाटा सुरु केला. बोअरवेल व्यावसायिकांनीही बोअरवेल करण्याचे व केसींगचे दर वाढवून आपले उखळ पांढरे केले. सुरुवातीला ८० ते ८५ रुपये प्रति फुट असलेला दर १०० रुपयांवर नेला तर केसींगचा १५० ते १६० रुपये प्रति फुट असलेला दर हा दोनशे रुपये करुन नागरिकांचा खिसा खाली केला. पाण्याच्या काळजीपोटी चिंतेत असलेल्या नारिकांनी बोअरवेल करण्याची मागणी केल्याने ही मागणी पुर्ण करण्यासाठी वर्ध्यातील मशीनी कमी पडू लागल्याने बाहेर राज्यातून दहा ते पंधरा मशीन बोलाविण्यात आल्या होत्या. दिवस-रात्र मशीन चालवून वायगावात १ डिसेंबर ते २ जानेवारी या एका महिन्याच्या कालावधीत ५४५ बोअरवेल करण्यात आल्या. एका बोअरवेलकरिता ४० ते ५० हजार रुपये खर्च असल्याने एकाच महिन्यात कोट्यवधीची उलाढाल झाल्याने; एका अफवेमुळे पाण्यासाठी वायगावकरांनी पाण्यासारखा पैसा खर्च केल्याचे दिसून येत आहे.पाण्याच्या शोधात एकाच घरी खोदल्या दोन ते तीन बोअरवेलवायगावातील नागरिकांनी पाणी मिळविण्यासाठी चालविलेल्या या स्पर्धेमुळे भूगर्भातील पाणीही संपुष्टात येत आहे. एका घरी बोअरवेल केल्यानंतर पाणी लागले नाही तर लागलीच दुसºया ठिकाणी बोअरवेल करुन पाण्याचा शोध घेण्यासाठी जमीन पोखरण्यात आली. इतकेच नाही तर कमी पाणी लागले असता जास्त पाण्याच्या शोधातही जमीन पोखरुन एकाच घरी दोन ते तीन बोअरवेल केल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाण्यासाठी जिकडेतिकडे भूगर्भाची चाळणी सुरु असल्याने आता बोअरवेलला लागलेले पाणीही फार काळपर्यंत टिकण्याची शक्यता नसल्याचेही नागरिकांकडूनच बोलले जात आहे.उसणवारी पैशातून केली पाण्याची सोयबोअरवेलवर बंदी असल्याने गावात बोअरवेल करण्याचा सपाटा सुरु झाला. नागरिकांनी १०० ते २०० फुटापर्यंत पाण्याचा शोध घेतला. एका पाठोपाठ एक असा बोअरवेलचा सपाटा सुरु झाल्याने नागरिकांनी पाण्याची भविष्यकालीन तरतूद करण्यासाठी बोअरवेलला पसंती दिली. यावर्षी उत्पादनातही कमालीची घट झाल्याने हातात पैसा नसतानाही पाणी जीवानावश्यक असल्यामुळे उसणवारी व व्याजाने पैसे घेऊन बोअरवेल केल्याचेही उदाहरण पहावयास मिळत आहे. या एका अफवेने भूगर्भही पोखरला असून नागरिकांनाही कर्जबाजारी केले आहे.पाणी उपसले, आता जिरवायलाही शिकावेदुष्काळी परिस्थितीमुळे भूगर्भातही पाणी खोलवर गेले आहे. आपण आहे तेवढे पाणी उपसण्यासाठी सदैव तत्पर असतो. पण, बोअरवेलचे प्रमाण दुप्पट-तिप्पट वाढल्याने भूगर्भातील पाणीही फार काळ टिकणार नाही. त्यामुळे आपण जसे पाणी उपसतो तसेच जमिनीत पाणी मुरविण्यासाठी तत्पर असले पाहिजे. त्याकरिता जलपुनर्भरणावर भर द्यावी. घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी हे जमिनीत मुरवावे, पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन जलतज्ज्ञांकडून केले जात आहे.

टॅग्स :Waterपाणी