शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

भूगर्भाची चाळण; महिनाभरात ५४५ बोअरवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:28 IST

पाण्याची टंचाई लक्षात घेता संधीच सोनं करण्यासाठी काहींनी ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याची अफवा उडविली. यामुळे पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी बोअरवेल खोदण्याचा सपाटा सुरू केला.

ठळक मुद्देखोट्या अफवेचे बळी : पाण्यासाठी वायगाव (नि.) येथे कोट्यवधींची उलाढाल

गौरव देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : पाण्याची टंचाई लक्षात घेता संधीच सोनं करण्यासाठी काहींनी ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याची अफवा उडविली. यामुळे पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी बोअरवेल खोदण्याचा सपाटा सुरू केला. त्यासाठी बोअरवेल व्यावसायिकांनी दुसऱ्या राज्यातून मशीन आणून रात्रंदिवस जमीन पोखरली. एकट्या वायगावातच महिनाभरात तब्बल ५४५ बोअरवेल खोदण्यात आल्या असून यातून कोट्यवधींची उलाढाल झाली. हीच अवस्था जिल्ह्यात इतरही ठिकाणची असल्याने या अफवेचे किती बळी पडले असावेत, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.वर्धा तालुक्यात मागील दोन वर्षापासून पाण्याच्या टंचाईचा सामना करावाल लागत आहे. याहीवर्षी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलपासुनच पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहे. गावात पाणी पुरवठा करण्याकरिता जीवन प्राधिकरणची पाणी पुरवठा योजना आहेत. पण, पाणी टंचाईमुळे गावाला दहा ते पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यामुळे गावात पाणीबाणी निर्माण झाली असून येत्या दिवसात हे पाणी संकट आणखीच तीव्र होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी भूगर्भातील पाण्याचा शोध सुरु केला. याचाच फायदा घेत ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याच्या वावड्या उठविण्यात आल्या. या नागरिकांनी चांगल्याच मनावर घेतल्याने सर्वांनीच ३१ डिसेंबरच्या आता बोअरवेल करण्याचा सपाटा सुरु केला. बोअरवेल व्यावसायिकांनीही बोअरवेल करण्याचे व केसींगचे दर वाढवून आपले उखळ पांढरे केले. सुरुवातीला ८० ते ८५ रुपये प्रति फुट असलेला दर १०० रुपयांवर नेला तर केसींगचा १५० ते १६० रुपये प्रति फुट असलेला दर हा दोनशे रुपये करुन नागरिकांचा खिसा खाली केला. पाण्याच्या काळजीपोटी चिंतेत असलेल्या नारिकांनी बोअरवेल करण्याची मागणी केल्याने ही मागणी पुर्ण करण्यासाठी वर्ध्यातील मशीनी कमी पडू लागल्याने बाहेर राज्यातून दहा ते पंधरा मशीन बोलाविण्यात आल्या होत्या. दिवस-रात्र मशीन चालवून वायगावात १ डिसेंबर ते २ जानेवारी या एका महिन्याच्या कालावधीत ५४५ बोअरवेल करण्यात आल्या. एका बोअरवेलकरिता ४० ते ५० हजार रुपये खर्च असल्याने एकाच महिन्यात कोट्यवधीची उलाढाल झाल्याने; एका अफवेमुळे पाण्यासाठी वायगावकरांनी पाण्यासारखा पैसा खर्च केल्याचे दिसून येत आहे.पाण्याच्या शोधात एकाच घरी खोदल्या दोन ते तीन बोअरवेलवायगावातील नागरिकांनी पाणी मिळविण्यासाठी चालविलेल्या या स्पर्धेमुळे भूगर्भातील पाणीही संपुष्टात येत आहे. एका घरी बोअरवेल केल्यानंतर पाणी लागले नाही तर लागलीच दुसºया ठिकाणी बोअरवेल करुन पाण्याचा शोध घेण्यासाठी जमीन पोखरण्यात आली. इतकेच नाही तर कमी पाणी लागले असता जास्त पाण्याच्या शोधातही जमीन पोखरुन एकाच घरी दोन ते तीन बोअरवेल केल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाण्यासाठी जिकडेतिकडे भूगर्भाची चाळणी सुरु असल्याने आता बोअरवेलला लागलेले पाणीही फार काळपर्यंत टिकण्याची शक्यता नसल्याचेही नागरिकांकडूनच बोलले जात आहे.उसणवारी पैशातून केली पाण्याची सोयबोअरवेलवर बंदी असल्याने गावात बोअरवेल करण्याचा सपाटा सुरु झाला. नागरिकांनी १०० ते २०० फुटापर्यंत पाण्याचा शोध घेतला. एका पाठोपाठ एक असा बोअरवेलचा सपाटा सुरु झाल्याने नागरिकांनी पाण्याची भविष्यकालीन तरतूद करण्यासाठी बोअरवेलला पसंती दिली. यावर्षी उत्पादनातही कमालीची घट झाल्याने हातात पैसा नसतानाही पाणी जीवानावश्यक असल्यामुळे उसणवारी व व्याजाने पैसे घेऊन बोअरवेल केल्याचेही उदाहरण पहावयास मिळत आहे. या एका अफवेने भूगर्भही पोखरला असून नागरिकांनाही कर्जबाजारी केले आहे.पाणी उपसले, आता जिरवायलाही शिकावेदुष्काळी परिस्थितीमुळे भूगर्भातही पाणी खोलवर गेले आहे. आपण आहे तेवढे पाणी उपसण्यासाठी सदैव तत्पर असतो. पण, बोअरवेलचे प्रमाण दुप्पट-तिप्पट वाढल्याने भूगर्भातील पाणीही फार काळ टिकणार नाही. त्यामुळे आपण जसे पाणी उपसतो तसेच जमिनीत पाणी मुरविण्यासाठी तत्पर असले पाहिजे. त्याकरिता जलपुनर्भरणावर भर द्यावी. घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी हे जमिनीत मुरवावे, पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन जलतज्ज्ञांकडून केले जात आहे.

टॅग्स :Waterपाणी