शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

गवळी समाज मूलभूत विकासापासून वंचितच

By admin | Updated: December 13, 2015 02:14 IST

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात २५ लाखांच्या वर लोकसंख्या असलेला गवळी समाज आजही उपेक्षित जीवन जगत आहे.

अनेक मागण्या प्रलंबित : नागरिकांचा शासनावर रोषवर्धा : महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात २५ लाखांच्या वर लोकसंख्या असलेला गवळी समाज आजही उपेक्षित जीवन जगत आहे. समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागसलेपण दूर करण्याकरिता शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे समाजातील नागरिक शासनावर रोष व्यक्त करीत आहे. गवळी समाजाच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. यामध्ये प्रामुख्याने गवळी समाजाला केंद्राच्या तयार होणाऱ्या तिसऱ्या सुचिमध्ये समाविष्ट करण्याकरिता राज्य मंत्रीमंडळाने केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा. नॉन क्रिमिलियरची जाचक अट रद्द करण्यात यावी. दुग्ध उत्पादन महासंघावर गवळी समाजाचा प्रतिनिधी घेण्यात यावा, गवळी समाजाकरिता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ निर्माण करण्यात यावे. गवळी, गोपाल (गायी पाळणारे), अहिर, गवलान, लिंगायत गवळी, मुस्लिम गवळी इत्यादी एकच समजून जात पडताळणीतील अडथळा दूर करावा, गोपाल म्हणून नोकरीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना १९९५ प्रमाणे संरक्षण देण्यात यावे. गवळी समाजाला गायी, म्हशी खरेदी करण्याकरिता वीनव्याजी कर्ज देण्यात यावे. ज्या ठिकाणी गवळी समाजाची लोकसंख्या भरपूर प्रमाणात आहे. त्याठिकाणी गाई, म्हशी चारण्याकरिता जंगल आरक्षित करण्यात यावे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात गुरांच्या चाऱ्याकरिता चारा डेपो उभारण्यात यावे. गवळी समाजातील (एन.टी.बी.) विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी आदी मागण्याचा समावेश आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र गवळी समाज संघटना शाखा वर्धाच्या वतीने मंगळवारी धरणे दिले जाणार जाणार आहे. समाजबांधवांनी यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(शहर प्रतिनिधी)