शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

गवळी समाज मूलभूत विकासापासून वंचितच

By admin | Updated: December 13, 2015 02:14 IST

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात २५ लाखांच्या वर लोकसंख्या असलेला गवळी समाज आजही उपेक्षित जीवन जगत आहे.

अनेक मागण्या प्रलंबित : नागरिकांचा शासनावर रोषवर्धा : महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात २५ लाखांच्या वर लोकसंख्या असलेला गवळी समाज आजही उपेक्षित जीवन जगत आहे. समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागसलेपण दूर करण्याकरिता शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे समाजातील नागरिक शासनावर रोष व्यक्त करीत आहे. गवळी समाजाच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. यामध्ये प्रामुख्याने गवळी समाजाला केंद्राच्या तयार होणाऱ्या तिसऱ्या सुचिमध्ये समाविष्ट करण्याकरिता राज्य मंत्रीमंडळाने केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा. नॉन क्रिमिलियरची जाचक अट रद्द करण्यात यावी. दुग्ध उत्पादन महासंघावर गवळी समाजाचा प्रतिनिधी घेण्यात यावा, गवळी समाजाकरिता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ निर्माण करण्यात यावे. गवळी, गोपाल (गायी पाळणारे), अहिर, गवलान, लिंगायत गवळी, मुस्लिम गवळी इत्यादी एकच समजून जात पडताळणीतील अडथळा दूर करावा, गोपाल म्हणून नोकरीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना १९९५ प्रमाणे संरक्षण देण्यात यावे. गवळी समाजाला गायी, म्हशी खरेदी करण्याकरिता वीनव्याजी कर्ज देण्यात यावे. ज्या ठिकाणी गवळी समाजाची लोकसंख्या भरपूर प्रमाणात आहे. त्याठिकाणी गाई, म्हशी चारण्याकरिता जंगल आरक्षित करण्यात यावे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात गुरांच्या चाऱ्याकरिता चारा डेपो उभारण्यात यावे. गवळी समाजातील (एन.टी.बी.) विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी आदी मागण्याचा समावेश आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र गवळी समाज संघटना शाखा वर्धाच्या वतीने मंगळवारी धरणे दिले जाणार जाणार आहे. समाजबांधवांनी यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(शहर प्रतिनिधी)