शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

गवळी समाज मूलभूत विकासापासून वंचितच

By admin | Updated: December 13, 2015 02:14 IST

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात २५ लाखांच्या वर लोकसंख्या असलेला गवळी समाज आजही उपेक्षित जीवन जगत आहे.

अनेक मागण्या प्रलंबित : नागरिकांचा शासनावर रोषवर्धा : महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात २५ लाखांच्या वर लोकसंख्या असलेला गवळी समाज आजही उपेक्षित जीवन जगत आहे. समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागसलेपण दूर करण्याकरिता शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे समाजातील नागरिक शासनावर रोष व्यक्त करीत आहे. गवळी समाजाच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. यामध्ये प्रामुख्याने गवळी समाजाला केंद्राच्या तयार होणाऱ्या तिसऱ्या सुचिमध्ये समाविष्ट करण्याकरिता राज्य मंत्रीमंडळाने केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा. नॉन क्रिमिलियरची जाचक अट रद्द करण्यात यावी. दुग्ध उत्पादन महासंघावर गवळी समाजाचा प्रतिनिधी घेण्यात यावा, गवळी समाजाकरिता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ निर्माण करण्यात यावे. गवळी, गोपाल (गायी पाळणारे), अहिर, गवलान, लिंगायत गवळी, मुस्लिम गवळी इत्यादी एकच समजून जात पडताळणीतील अडथळा दूर करावा, गोपाल म्हणून नोकरीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना १९९५ प्रमाणे संरक्षण देण्यात यावे. गवळी समाजाला गायी, म्हशी खरेदी करण्याकरिता वीनव्याजी कर्ज देण्यात यावे. ज्या ठिकाणी गवळी समाजाची लोकसंख्या भरपूर प्रमाणात आहे. त्याठिकाणी गाई, म्हशी चारण्याकरिता जंगल आरक्षित करण्यात यावे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात गुरांच्या चाऱ्याकरिता चारा डेपो उभारण्यात यावे. गवळी समाजातील (एन.टी.बी.) विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी आदी मागण्याचा समावेश आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र गवळी समाज संघटना शाखा वर्धाच्या वतीने मंगळवारी धरणे दिले जाणार जाणार आहे. समाजबांधवांनी यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(शहर प्रतिनिधी)