शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

फलक वाटपाचे भूत ग्रामसेवकांच्या मानगुटीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 21:30 IST

ग्रामपंचायतींकडून मागणी नसतानाही मौखिक आदेशावरून ग्रामपंचायतींना सात हजार रुपये किमतीचे फलक थोपविण्यात आले. हा प्रकार अधिकाºयांच्या दबावात झाल्याचे खुद्द ग्रामसेवक नाव न छापण्याच्या अटीवर सांगत आहेत. पण, अधिकाऱ्यांनी या प्रकरणातून पद्धशीरपणे काढता पाय घेत या प्रकाराला ग्रामसेवकच दोषी असल्याचे सांगत आहे. त्यामुळे होणाºया कारवाईचे भूत ग्रामसेवकांच्याच मानगुटीवर बसण्याची दाट शक्यता आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे लक्ष : कंत्राटदाराच्या बचावासाठी अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायतीवर फोडले जातेय खापर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्रामपंचायतींकडून मागणी नसतानाही मौखिक आदेशावरून ग्रामपंचायतींना सात हजार रुपये किमतीचे फलक थोपविण्यात आले. हा प्रकार अधिकाऱ्यांच्या दबावात झाल्याचे खुद्द ग्रामसेवक नाव न छापण्याच्या अटीवर सांगत आहेत. पण, अधिकाऱ्यांनी या प्रकरणातून पद्धशीरपणे काढता पाय घेत या प्रकाराला ग्रामसेवकच दोषी असल्याचे सांगत आहे. त्यामुळे होणाºया कारवाईचे भूत ग्रामसेवकांच्याच मानगुटीवर बसण्याची दाट शक्यता आहे.केंद्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालयाने ‘सबकी योजना सबका विकास’ लोकसहभागातून लोकांचा ग्रामपंचायत विकास आराखडा ही मोहीम २ आॅक्टोबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत राबविण्याचे निश्चित केले होते. या मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायत क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या विकास योजनांचे अभिसरण करून सन २०१९-२० चा ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करायचा होता. याकरिता ग्रामपंचायतीने आदेशानुसार २० बाय १० चौरस फुटांच्या आकाराचे फलक लावायचे होते. याचाच फायदा उचलत झेडपीच्या पंचायत विभागाने पोसलेल्या कंत्राटदारासह आपले उखळ पांढरे करण्याकरिता पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांमार्फत ग्रामसेवकांना निरोप देऊन ‘विनय एंटरप्रायजेस’ नामक कंत्राटदाराकडूनच फलक घेण्यास सांगितले. त्यानुसारच जिल्ह्यातील ५१७ ग्रामपंचायतींपैकी ४७२ ग्रामपंचायतींना सात हजार रुपये किमतीचे फलक पुरविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदकडूनच प्राप्त झाली. या फलकाचे देयक देण्यास ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी विरोध केला. त्यांना कारवाईचा धाक दाखवत ठराव व निविदा प्रक्रिया राबवून सात हजारांचे देयक देण्यास भाग पाडल्याचे काही ग्रामसेवकांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे. अधिकाºयांच्या आदेशाने ग्रामसेवकच दिवसेंदिवस अडचणीत सापडत आहे. पूर्वी उपचार पेट्या, बायोमॅट्रिक्स आणि आता फलकामुळे ग्रामसेवक दडपणात जगत आहे. अधिकारी तोंडी आदेश व दबावतंत्राचा वापर करीत असल्याने ग्रामसेवक व गटविकास अधिकाऱ्यांची इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे. यापुढेही वजन काट्याचा अट्टहास कायम असल्याने पुन्हा ग्रामसेवकांच्या अडचणी वाढणार आहेत. फलक प्रकरणाची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करून चौकशीची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी जर चौकशीचे आदेश दिले, तर अधिकाºयांचे बोट ग्रामसेवकांकडेच राहणार असल्याने आता ग्रामसेवकांनी वारंवार दडपणात जगण्यापेक्षा एकदाचा कडेलोट करणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.आता अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्हग्रामपंचायतींना फलक वाटप करण्यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे व पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव यांचा हात असल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला. तसेच यांच्याच मौखिक आदेशाने कंत्राटदाराला देयक दिल्याचीही ओरड होत आहे. त्यावर अधिकाऱ्यांनी आमचा काही संबंध नसल्याचा खुलासा वारंवार केला आहे. पण, ग्रामसेवकांची सभा बोलावून कोणत्या कंत्राटदाराला कितीचे देयक दिले, फलक कुणी पुरविले याची विचारपूस करण्याचे सौजन्य दाखविले नाही. तशा हालचालीही अधिकाऱ्यांनी केल्या नसल्यामुळे अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.म्हणे, तक्रार नाही, कारवाई कशी करणार?फलक थोपवून ग्रामपंचायतींच्या निधीवर डल्ला मारण्याच्या प्रकाराची तक्रार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाळा नांदुरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या सभागृहात वारंवार मुद्दा उपस्थित केल्यानंतर अधिकाऱ्यांकडून तक्रार आल्यास कारवाई केली जाईल, असेच सांगण्यात आले. पण, ग्रामसेवकांसह ग्रामपंचायतींना कारवाईचा धाक दाखविला जात असल्याने तक्रार करण्यास कुणी पुढे येत नाही. मात्र, ग्रामपंचायतीच्या अधिकारावर हा घाला असल्याने यापुढेही असेच प्रकार चालू राहणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींचे अधिकार कायम ठेवण्यासाठी सरपंचांसह सदस्यांनी पुढे येत या फलक वाटपाचा पर्दाफाश करण्याची गरज व्यक्त होत आहे.