शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

वाघांच्या संरक्षणाकरिता गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 22:41 IST

गत काही दिवसांपासून शेताला विजेचे कुंपण लावून वाघाची शिकार करण्याच्या घटना घडत आहेत.

ठळक मुद्देशेत कुपंणातील वीज प्रवाह : वनविभागासह महावितरणची संयुक्त मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत काही दिवसांपासून शेताला विजेचे कुंपण लावून वाघाची शिकार करण्याच्या घटना घडत आहेत. यावर आळा घालण्याकरिता आणि वाघांच्या संरक्षणाकरिता महावितरणने पुढाकार घेतला आहे. महावितरण वन विभागाच्या सहकार्याने रात्रीच्या वेळी ग्रामीण भागात गस्त घालून अशा प्रकारांना आळा घालणार आहे. वर्धा आणि चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात गत दोन महिन्याच्या कालावधीत ३ वाघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.शेतातील कुंपणात वीज प्रवाह सोडल्याने या वाघांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले होते. शेतातील कुंपणात वीज प्रवाह सोडल्याने केवळ प्राण्यांचीच नाही तर मनुष्यांचेही जीव गेले आहे. हा प्रकार बेकायदेशीर असतानाही सुरूच आहे. वाघाशिवाय अन्य जंगलीजनावरांच्या शिकारीसाठी कधी कधी शेतातील कुंपणातवीज प्रवाह सोडल्या जातो. जंगली जनावरांची शिकार केल्यावर याचा फारसा गवगवा होत नाही.जनतेमध्ये जागृती करण्यासाठी महावितरणकडून वाघाची शिकार करणे हा दंडनीय अपराध आहे या साठी कायद्यात शिक्षेची तरतूदही केली आहे. असा संदेश लिहलेले पोस्टर्स ग्रामीण भागात लावण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. सोबतच रात्रीच्या वेळी कोणी शेतातील कुंपणात वीजप्रवाह सोडला आहे याची तपासणी महावितरण आणि वनविभागाचे पथक ग्रामीण भागात करीत आहे.नागपूर जिल्ह्यातील बडेगाव, वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका गुरुवारी गस्त घालण्यात आली. वरोरा येथील खेमजीगावात महावितरण आणि वन विभागाच्या गस्ती पथकास एका शेतातीळ कुंपणात वीज तर जोडलेली आढळून आली; पण ती प्रवाहित नसल्याचे निदर्शनास आले. यापुढे असे प्रकार आढळून आले तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.पिकांच्या संरक्षणाचे शेतकऱ्यासमोर नवे संकटजंगलव्याप्त भागात रात्रीच्या सुमारास वन्य प्राण्यांच्या हैदोसाने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्याकरिता शेतकऱ्यांकडून हा प्रकार करणे सुरू झाले. या प्रकारामुळे जंगली श्वापदांच्या त्रासापासून शेतकऱ्यांची सुटका झाली. मात्र गत महिन्यात वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील सिंदी विहिरी येथे शेताच्या कुंपनाला असलेल्या विज प्रवाहातून ही घटना घडली. आता असा प्रकार करणाºया शेतकºयांवर दंडात्म कार्यवाही करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.