शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

वाघांच्या संरक्षणाकरिता गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 22:41 IST

गत काही दिवसांपासून शेताला विजेचे कुंपण लावून वाघाची शिकार करण्याच्या घटना घडत आहेत.

ठळक मुद्देशेत कुपंणातील वीज प्रवाह : वनविभागासह महावितरणची संयुक्त मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत काही दिवसांपासून शेताला विजेचे कुंपण लावून वाघाची शिकार करण्याच्या घटना घडत आहेत. यावर आळा घालण्याकरिता आणि वाघांच्या संरक्षणाकरिता महावितरणने पुढाकार घेतला आहे. महावितरण वन विभागाच्या सहकार्याने रात्रीच्या वेळी ग्रामीण भागात गस्त घालून अशा प्रकारांना आळा घालणार आहे. वर्धा आणि चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात गत दोन महिन्याच्या कालावधीत ३ वाघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.शेतातील कुंपणात वीज प्रवाह सोडल्याने या वाघांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले होते. शेतातील कुंपणात वीज प्रवाह सोडल्याने केवळ प्राण्यांचीच नाही तर मनुष्यांचेही जीव गेले आहे. हा प्रकार बेकायदेशीर असतानाही सुरूच आहे. वाघाशिवाय अन्य जंगलीजनावरांच्या शिकारीसाठी कधी कधी शेतातील कुंपणातवीज प्रवाह सोडल्या जातो. जंगली जनावरांची शिकार केल्यावर याचा फारसा गवगवा होत नाही.जनतेमध्ये जागृती करण्यासाठी महावितरणकडून वाघाची शिकार करणे हा दंडनीय अपराध आहे या साठी कायद्यात शिक्षेची तरतूदही केली आहे. असा संदेश लिहलेले पोस्टर्स ग्रामीण भागात लावण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. सोबतच रात्रीच्या वेळी कोणी शेतातील कुंपणात वीजप्रवाह सोडला आहे याची तपासणी महावितरण आणि वनविभागाचे पथक ग्रामीण भागात करीत आहे.नागपूर जिल्ह्यातील बडेगाव, वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका गुरुवारी गस्त घालण्यात आली. वरोरा येथील खेमजीगावात महावितरण आणि वन विभागाच्या गस्ती पथकास एका शेतातीळ कुंपणात वीज तर जोडलेली आढळून आली; पण ती प्रवाहित नसल्याचे निदर्शनास आले. यापुढे असे प्रकार आढळून आले तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.पिकांच्या संरक्षणाचे शेतकऱ्यासमोर नवे संकटजंगलव्याप्त भागात रात्रीच्या सुमारास वन्य प्राण्यांच्या हैदोसाने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्याकरिता शेतकऱ्यांकडून हा प्रकार करणे सुरू झाले. या प्रकारामुळे जंगली श्वापदांच्या त्रासापासून शेतकऱ्यांची सुटका झाली. मात्र गत महिन्यात वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील सिंदी विहिरी येथे शेताच्या कुंपनाला असलेल्या विज प्रवाहातून ही घटना घडली. आता असा प्रकार करणाºया शेतकºयांवर दंडात्म कार्यवाही करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.