शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

सणाच्या दिवसात देवळीत गॅस सिलिंडरचा तुटवडा; नागरिक त्रस्त

By admin | Updated: October 18, 2014 23:42 IST

येथील आर. इंडियन गॅस कंपनीच्या ग्राहकांनी गत आठ ते १० दिवसांआधी सिलिंडरचे पैसे भरून सुद्धा गॅसचे सिलिंडर मिळत नसल्यामुळे गावात गोंधळ माजला आहे. गॅस सिलिंडरच्या गाड्यांचे बील

देवळी : येथील आर. इंडियन गॅस कंपनीच्या ग्राहकांनी गत आठ ते १० दिवसांआधी सिलिंडरचे पैसे भरून सुद्धा गॅसचे सिलिंडर मिळत नसल्यामुळे गावात गोंधळ माजला आहे. गॅस सिलिंडरच्या गाड्यांचे बील फाडून सुद्धा वेळेवर मालाचा पुरवठा होत नसल्यामुळे हा तुटवडा निर्माण होवून, ग्राहकांना गॅस सिलिंडर देणे शक्य होत नसल्याचे एजन्सीच्यावतीने सांगण्यात येत आहे. यामुळे सणांच्या दिवसात ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा तुटवडा एजन्सीच्या चुकीमुळे ही जिल्हा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे याचा शोध जिल्हाधिकारी यांनी घेवून ग्राहकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. याठिकाणी आर. इंण्डेन नावाची एकच गॅस एजन्सी कार्यरत असून त्यांच्याकडे शहरी व ग्रामीण भागातील सात हजार ५०० गॅस जोडण्या आहेत. तसेच सर्व ग्राहकांना सेवा देणे कंपनीच्या आवाक्याबाहेर ठरत असल्यामुळे हा गोंधळ माजल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे देवळी शहरासाठी या गॅस एजन्सीच्या व्यतिरिक्त दुसरी एजन्सी देण्यात यावी. त्याचप्रमाणे आंजी (अंदोरी) येथील नवनिर्मात इंण्डेन गॅस एजन्सीला कार्यरत करून ग्रामीण भागातील गॅस सिलिंडरचा भार कमी करण्यात यावा अशी मागणी होत आहे.या एजन्सीवर सिलिंडरचा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांना तसेच लहान उद्योजकांना या एजन्सीच्यावतीने जास्तीच्या दरात सिलिंडरचा पुरवठा करून नियमीत ग्राहकांना डावलल्या जात असल्याचे सांगितले जात आहे. या आधी २१ दिवसानंतर सिलिंडर मिळत असल्यामुळे ग्राहकांची गर्दी होत नव्हती; परंतु आता वर्षभरात केव्हाही सिलिंडर नेण्याची मुभा असल्यामुळे गर्दी वाढत आहे. कधी-कधी सुट्या असल्यामुळे तसेच बँकेची लींक फेल राहत असल्यामुळे गाड्यांचे बील फाडण्यात उशीर होत असल्याचेएजन्सीच्या वतीने सांगण्यात येत आहे.(प्रतिनिधी)