शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे.सी. कुमारप्पा यांच्या समग्र माहितीसाठी ‘गांधीकुमारप्पा’ वेबपोर्टल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 13:50 IST

गांधींजींनी सांगितलेला अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कृतीशील अर्थशास्त्राची मांडणी करणारे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे.सी. कुमारप्पा यांचे विचार, त्यांचे अर्थशास्त्र जगाला माहिती व्हावे म्हणून ‘गांधीकुमारप्पा’ वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे दोन पुस्तके वाचायला मिळतील मधुमख्खी अर्थशास्त्र हेच जगाला तारू शकते

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गांधींजींनी सांगितलेला अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कृतीशील अर्थशास्त्राची मांडणी करणारे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे.सी. कुमारप्पा यांचे विचार, त्यांचे अर्थशास्त्र जगाला माहिती व्हावे म्हणून ‘गांधीकुमारप्पा’ वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. गुरूवारी त्यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त या पोर्टलचे लोकार्पण करण्यात आले. यावर कुमारप्पा यांचे साहित्य उपलब्ध केले असून यात सध्या दोन पुस्तके वाचायला मिळतील, अशी माहिती मगनसंग्रहालय समिती अध्यक्ष डॉ. विभा गुप्ता यांनी पत्रपरिषदेत दिली.सध्या जगभर महात्मा गांधी व दे. सी. कुमारप्पा यांचे ग्रामीण भागाला महत्त्व देणारे अर्थशास्त्र पुन्हा अभ्यासले जात आहे. सध्या जग प्रगत झाले आहे; पण गरीबी, निरक्षरतेची खाई भीषण झाली आहे. प्रगतीने मानव चांगला होईल, ही अपेक्षा होती; पण उलट होत आहे. मानव आणखी हिंसक होत आहे. यामुळेच गांधीजींनी गावांकडे चला असे का म्हटले, त्यांचे अर्थशास्त्र काय होते हे युरोप व अमेरिका येथे स्कूल आॅफ इकॉनॉमीद्वारे अभ्यासले जात आहे. सध्या आपली वाटचाल रसायनांचा वापर, प्रदूषण याकडे होत आहे. यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा धोका निर्माण झाला आहे. पृथ्वीची गती कमी होत आहे. चंद्र दूर जात आहे. सूर्य अधिक तळपत आहे. यामुळे जगाला सध्या गांधी व कुमारप्पांचे अर्थशास्त्र अभ्यासावे लागत आहे. गाव ते शहर हे सूत्र सर्वप्रथम अ.भा. ग्रामोद्योग संघ वर्धाने जगाला दिले होते. याबाबतचा प्रस्ताव प्लानिंग कमीशनपूढे मांडला होता; पण सध्या शहर ते गाव, असे अर्थकारण सुरू असून हे विनाशाकडे नेणारे आहे. ही बाब लक्षात घेत गांधी, कुमारप्पांच्या अर्थशास्त्राचा अभ्यास होत आहे. नैसर्गिक शेती का, युद्ध का नको, मी शाकाहारी का व्हावे आदी प्रश्न जग विचारत आहे. या प्रश्नांच्या उत्तरांसाठी कुमारप्पा यांचे अर्थशास्त्र जगाला कळणे गरजेचे आहे. त्यांनी तीन प्रकारचे अर्थशास्त्र सांगितले होते. बंदर अर्थशास्त्रात तोडणे, विद्ध्वंस करणे; मधुमख्खी अर्थशास्त्र म्हणजे जेवढे घेतो तेवढे परत करणे व बकेट इकॉनॉमी म्हणजे जेवढे आहे तेवढे सर्व वापरणे होय. मधुमख्खी अर्थशास्त्र हेच जगाला तारू शकते, असे कुमारप्पा सांगत. जगाला खादी व गावांचे दर्शन घडवू शकेल असा भारत हा एकमेव देश आहे. यामुळे आपल्या देशाने बी इकॉनॉमी अवलंबिणे गरजेचे आहे. गांधीजींना मीठाच्या सत्याग्रहाची संकल्पना कुमारप्पा यांनी दिली होती. त्यावेळी मीठ तयार करणारे एक लाख लोक कारागृहात टाकण्यात आले होते, असेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले.कुमारप्पा यांची ३० पुस्तके असून ग्रामोद्योग पत्रिका ते हिंदी व इंग्रजीतून चालवित असत. यंग इंडियामध्ये त्यांचे लेख प्रकाशित झालेत. या सर्व बाबी जगाला कळाव्या म्हणून कुमारप्पांचे वेबपोर्टल तयार केले आहे. यासाठी डॉ. गुप्ता, सचिव अजय कुमार, अ‍ॅड. अशोक अग्रवाल व आनंदकुमार यांनी श्रम घेतले, असे मनीषा पेंटे यांनी सांगितले. यावेळी मुकेश लुतडे उपस्थित होते.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी