शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे.सी. कुमारप्पा यांच्या समग्र माहितीसाठी ‘गांधीकुमारप्पा’ वेबपोर्टल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 13:50 IST

गांधींजींनी सांगितलेला अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कृतीशील अर्थशास्त्राची मांडणी करणारे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे.सी. कुमारप्पा यांचे विचार, त्यांचे अर्थशास्त्र जगाला माहिती व्हावे म्हणून ‘गांधीकुमारप्पा’ वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे दोन पुस्तके वाचायला मिळतील मधुमख्खी अर्थशास्त्र हेच जगाला तारू शकते

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गांधींजींनी सांगितलेला अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कृतीशील अर्थशास्त्राची मांडणी करणारे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे.सी. कुमारप्पा यांचे विचार, त्यांचे अर्थशास्त्र जगाला माहिती व्हावे म्हणून ‘गांधीकुमारप्पा’ वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. गुरूवारी त्यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त या पोर्टलचे लोकार्पण करण्यात आले. यावर कुमारप्पा यांचे साहित्य उपलब्ध केले असून यात सध्या दोन पुस्तके वाचायला मिळतील, अशी माहिती मगनसंग्रहालय समिती अध्यक्ष डॉ. विभा गुप्ता यांनी पत्रपरिषदेत दिली.सध्या जगभर महात्मा गांधी व दे. सी. कुमारप्पा यांचे ग्रामीण भागाला महत्त्व देणारे अर्थशास्त्र पुन्हा अभ्यासले जात आहे. सध्या जग प्रगत झाले आहे; पण गरीबी, निरक्षरतेची खाई भीषण झाली आहे. प्रगतीने मानव चांगला होईल, ही अपेक्षा होती; पण उलट होत आहे. मानव आणखी हिंसक होत आहे. यामुळेच गांधीजींनी गावांकडे चला असे का म्हटले, त्यांचे अर्थशास्त्र काय होते हे युरोप व अमेरिका येथे स्कूल आॅफ इकॉनॉमीद्वारे अभ्यासले जात आहे. सध्या आपली वाटचाल रसायनांचा वापर, प्रदूषण याकडे होत आहे. यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा धोका निर्माण झाला आहे. पृथ्वीची गती कमी होत आहे. चंद्र दूर जात आहे. सूर्य अधिक तळपत आहे. यामुळे जगाला सध्या गांधी व कुमारप्पांचे अर्थशास्त्र अभ्यासावे लागत आहे. गाव ते शहर हे सूत्र सर्वप्रथम अ.भा. ग्रामोद्योग संघ वर्धाने जगाला दिले होते. याबाबतचा प्रस्ताव प्लानिंग कमीशनपूढे मांडला होता; पण सध्या शहर ते गाव, असे अर्थकारण सुरू असून हे विनाशाकडे नेणारे आहे. ही बाब लक्षात घेत गांधी, कुमारप्पांच्या अर्थशास्त्राचा अभ्यास होत आहे. नैसर्गिक शेती का, युद्ध का नको, मी शाकाहारी का व्हावे आदी प्रश्न जग विचारत आहे. या प्रश्नांच्या उत्तरांसाठी कुमारप्पा यांचे अर्थशास्त्र जगाला कळणे गरजेचे आहे. त्यांनी तीन प्रकारचे अर्थशास्त्र सांगितले होते. बंदर अर्थशास्त्रात तोडणे, विद्ध्वंस करणे; मधुमख्खी अर्थशास्त्र म्हणजे जेवढे घेतो तेवढे परत करणे व बकेट इकॉनॉमी म्हणजे जेवढे आहे तेवढे सर्व वापरणे होय. मधुमख्खी अर्थशास्त्र हेच जगाला तारू शकते, असे कुमारप्पा सांगत. जगाला खादी व गावांचे दर्शन घडवू शकेल असा भारत हा एकमेव देश आहे. यामुळे आपल्या देशाने बी इकॉनॉमी अवलंबिणे गरजेचे आहे. गांधीजींना मीठाच्या सत्याग्रहाची संकल्पना कुमारप्पा यांनी दिली होती. त्यावेळी मीठ तयार करणारे एक लाख लोक कारागृहात टाकण्यात आले होते, असेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले.कुमारप्पा यांची ३० पुस्तके असून ग्रामोद्योग पत्रिका ते हिंदी व इंग्रजीतून चालवित असत. यंग इंडियामध्ये त्यांचे लेख प्रकाशित झालेत. या सर्व बाबी जगाला कळाव्या म्हणून कुमारप्पांचे वेबपोर्टल तयार केले आहे. यासाठी डॉ. गुप्ता, सचिव अजय कुमार, अ‍ॅड. अशोक अग्रवाल व आनंदकुमार यांनी श्रम घेतले, असे मनीषा पेंटे यांनी सांगितले. यावेळी मुकेश लुतडे उपस्थित होते.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी