शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
3
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
4
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
5
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
6
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
7
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
8
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ
9
हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
10
Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 
11
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा
12
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
13
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
14
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
15
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
16
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
17
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
18
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
19
हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते केएफसीमध्ये घुसले, रेस्टॉरंटला ठोकले टाळे; म्हणाले, "श्रावणामध्ये नॉन व्हेज..."
20
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्

समाजातील नकारात्मकतेला गांधीविचार हेच उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 21:36 IST

महात्मा गांधींनी विदेशात वकिली करतानाही सत्याचेच प्रयोग केले. त्यांची वकिली ही नैतिक आणि सामाजिक न्यायासाठी होती. या देशातही त्यांनी निर्भयपणे अखेरच्या श्वासापर्यंत समाजाची आणि देशवासीयांची वकिली केली.

ठळक मुद्देअसीम सरोदे : ‘गांधी समजून घेताना’ मासिक व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधींनी विदेशात वकिली करतानाही सत्याचेच प्रयोग केले. त्यांची वकिली ही नैतिक आणि सामाजिक न्यायासाठी होती. या देशातही त्यांनी निर्भयपणे अखेरच्या श्वासापर्यंत समाजाची आणि देशवासीयांची वकिली केली. आज सामाजिक न्यायाचा आवाज क्षीण होत असताना विरोधी आणि नकारात्मक विचारांना उत्तर देण्यासाठी गांधी पुरून उरतो, असे उद्गार अ‍ॅड. असीम सरोदे, पुणे यांनी गांधी फॉर फ्युचर समितीद्वारे आयोजित व्याख्यानमालेचे सातवे पुष्प गुंफताना काढले.स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित गांधी समजून घेताना व्याख्यानमालेत असीम सरोदे यांनी 'नैतिक न्यायाचा पुरस्कर्ता गांधी' या विषयाची मांडणी केली. गांधींचा लढा हा सुरुवातीपासूनच परिवर्तनासाठी होता आणि त्याच उद्देशाने प्रेरित होऊन त्यांनी न्यायालयातही विवेकनिष्ठ सत्याचा विचार मांडला. अन्यायाविरोधात लढणाऱ्या बॅरिस्टर गांधींनी अर्थार्जनासाठी नव्हे, तर दोन पक्षकारांमधील प्रश्न आपसी सहमतीने, तडजोडीने सुटावेत, या विचारांतून दक्षिण आफ्रिकेत वकिली केली. विचारांची प्रक्रिया ही सतत प्रवाही असते, ती कुणीच थांबवू नये, असे म्हणणारे गांधी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचीच मांडणी करीत असतात. गांधींनी हिंदू धर्मात प्रथमत: सामूहिक प्रार्थना, सर्वधर्म समभाव प्रार्थना आणली, तो सामाजिक न्यायाचाच प्रयोग होता. गांधींचा सर्वोदयाचा विचारही सामाजिक न्यायाचा विचार आहे. गांधींना या देशाच्या नेतृत्वासाठी चेहराविरहित यंत्रणा अपेक्षित होती. मात्र, आज देशात लोकशाही चालविणारी सुव्यवस्था विकसित होण्याऐवजी यंत्रणेत हस्तक्षेप करणारा चेहराच अधिक प्रभावी ठरतो आहे. या देशात संवैधानिक मूल्यांचा, नैतिक आणि सामाजिक न्यायाचा विचार रुजवायचा असेल तर आता इथल्या अव्यवस्थेवर धडका माराव्या लागतील, असेही सरोदे म्हणाले.आपल्या सामाजिक व पर्यावरणीय न्यायालयीन लढ्यात गांधींच्या नैतिक न्यायाचे बळ लाभले आहे, हे सांगताना अ‍ॅड. सरोदे यांनी अनेक दाखले दिले आणि गांधी आजही समाजासाठी दिशादर्शकच असल्याची जाणीव त्यांनी आपल्या व्याख्यानातून अधोरेखित केली.