शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

समाजातील नकारात्मकतेला गांधीविचार हेच उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 21:36 IST

महात्मा गांधींनी विदेशात वकिली करतानाही सत्याचेच प्रयोग केले. त्यांची वकिली ही नैतिक आणि सामाजिक न्यायासाठी होती. या देशातही त्यांनी निर्भयपणे अखेरच्या श्वासापर्यंत समाजाची आणि देशवासीयांची वकिली केली.

ठळक मुद्देअसीम सरोदे : ‘गांधी समजून घेताना’ मासिक व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधींनी विदेशात वकिली करतानाही सत्याचेच प्रयोग केले. त्यांची वकिली ही नैतिक आणि सामाजिक न्यायासाठी होती. या देशातही त्यांनी निर्भयपणे अखेरच्या श्वासापर्यंत समाजाची आणि देशवासीयांची वकिली केली. आज सामाजिक न्यायाचा आवाज क्षीण होत असताना विरोधी आणि नकारात्मक विचारांना उत्तर देण्यासाठी गांधी पुरून उरतो, असे उद्गार अ‍ॅड. असीम सरोदे, पुणे यांनी गांधी फॉर फ्युचर समितीद्वारे आयोजित व्याख्यानमालेचे सातवे पुष्प गुंफताना काढले.स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित गांधी समजून घेताना व्याख्यानमालेत असीम सरोदे यांनी 'नैतिक न्यायाचा पुरस्कर्ता गांधी' या विषयाची मांडणी केली. गांधींचा लढा हा सुरुवातीपासूनच परिवर्तनासाठी होता आणि त्याच उद्देशाने प्रेरित होऊन त्यांनी न्यायालयातही विवेकनिष्ठ सत्याचा विचार मांडला. अन्यायाविरोधात लढणाऱ्या बॅरिस्टर गांधींनी अर्थार्जनासाठी नव्हे, तर दोन पक्षकारांमधील प्रश्न आपसी सहमतीने, तडजोडीने सुटावेत, या विचारांतून दक्षिण आफ्रिकेत वकिली केली. विचारांची प्रक्रिया ही सतत प्रवाही असते, ती कुणीच थांबवू नये, असे म्हणणारे गांधी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचीच मांडणी करीत असतात. गांधींनी हिंदू धर्मात प्रथमत: सामूहिक प्रार्थना, सर्वधर्म समभाव प्रार्थना आणली, तो सामाजिक न्यायाचाच प्रयोग होता. गांधींचा सर्वोदयाचा विचारही सामाजिक न्यायाचा विचार आहे. गांधींना या देशाच्या नेतृत्वासाठी चेहराविरहित यंत्रणा अपेक्षित होती. मात्र, आज देशात लोकशाही चालविणारी सुव्यवस्था विकसित होण्याऐवजी यंत्रणेत हस्तक्षेप करणारा चेहराच अधिक प्रभावी ठरतो आहे. या देशात संवैधानिक मूल्यांचा, नैतिक आणि सामाजिक न्यायाचा विचार रुजवायचा असेल तर आता इथल्या अव्यवस्थेवर धडका माराव्या लागतील, असेही सरोदे म्हणाले.आपल्या सामाजिक व पर्यावरणीय न्यायालयीन लढ्यात गांधींच्या नैतिक न्यायाचे बळ लाभले आहे, हे सांगताना अ‍ॅड. सरोदे यांनी अनेक दाखले दिले आणि गांधी आजही समाजासाठी दिशादर्शकच असल्याची जाणीव त्यांनी आपल्या व्याख्यानातून अधोरेखित केली.