शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गांधीविरोधकांसाठी ‘गांधीविचार’ हाच प्रतिवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 21:07 IST

गांधी अजूनही मरत नाही म्हणून त्याला रोज मारलं जातेय. त्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जातो. वेगवेगळे खांदे वापरून चारित्र्यहनन केले जाते. तरीही गांधी मरत नाही. कारण महात्मा गांधींचे चाहते सर्व जातीधर्मात, संप्रदायात, सर्व प्रांतांत आणि देश-विदेशात आहे.

ठळक मुद्देअन्वर राजन : ‘सांप्रदायिक सद्भावना आणि महात्मा गांधी’ विषयावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गांधी अजूनही मरत नाही म्हणून त्याला रोज मारलं जातेय. त्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जातो. वेगवेगळे खांदे वापरून चारित्र्यहनन केले जाते. तरीही गांधी मरत नाही. कारण महात्मा गांधींचे चाहते सर्व जातीधर्मात, संप्रदायात, सर्व प्रांतांत आणि देश-विदेशात आहे. या देशात सांप्रदायिक सदभावना रुजवायची असेल तर गांधींबद्दल जी विषारी भाषा आज वापरली जाते, त्याचा गांधीविचारांनीच प्रतिवाद केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ गांधीवादी अन्वर राजन यांनी केले.गांधी फॉर फ्युचर आणि सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मासिक व्याख्यानमालेच्या या व्दितीय पुष्पात अन्वर राजन यांनी ‘सांप्रदायिक सदभावना आणि महात्मा गांधी’ या विषयाची मांडणी केली. वर्तमानातील घटनांचे संदर्भ देत अन्वर राजन यांनी गांधींच्या जीवनातील अनेक बाबींना सोदाहरण उजाळा दिला. तसेच धर्म व संप्रदायिकता या भिन्न बाबी असून या देशाची सामाजिक, सांस्कृतिक तसेच सांप्रदायिक जडणघडण कशी झाली, याची अभ्यासपूर्ण मांडणी केली. गांधी धार्मिक होते; पण त्यांच्या कोणत्याही आश्रमात कोणत्याही देवाचे अथवा धर्माचे मंदिर नाही. हरिजनांनाही मंदिराचे दरवाजे खुले असावेत असे म्हणणारे गांधी कधी कुठल्या मंदिरात गेले नाही. त्यांच्या आश्रमात सकाळ संध्याकाळ होणारी प्रार्थना सर्वधर्म समभाव रुजवते. सर्वच धर्म ईश्वरनिर्मित आहे; पण मानव कल्पित आहे, असे म्हणणारे गांधी ईश्वराचा कोणताही धर्म नसतो, हेही आवर्जून सांगत. धर्मांतर करणे गरजेचे नाही, ही भूमिका घेताना गांधी सर्व धर्मातील चांगला भाग स्विकारा हे सांगतात. धर्मातील कालबाह्य गोष्टी अप्रत्यक्षपणे नाकारतात. कृषी प्रधान संस्कृती जोपासताना गोरक्षा व गोसंवर्धनासाठी पुढाकार घेणारे महात्मा गांधी गोहत्या कायद्याच्या मात्र विरोधात असतात. गाय मेली तरी चालेल, पण माणूस मरता कामा नये, अशी भूमिका घेणारे गांधी. म्हणूनच आजही कट्टरवाद्यांना रुचत नाहीत.सोशल मीडियावरून गांधींबाबत हा कसला आमचा राष्ट्रपिता, हा तर पाकिस्तानचा राष्ट्रपिता आहे, अशी टीका करीत आजही गांधींना मारले जाते. गांधींना बदनाम करण्यासाठी कधी कस्तुरबा, हरिलाल तर कधी आंबेडकर, भगतसिंह, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा खांदा वापरला जातो. वस्तुत: ज्यावेळी बाबासाहेब दलितांमध्ये जागृती निर्माण करीत होते, त्याचवेळी गांधी दलितांना आपल्यात सामावून घ्या हे सांगत सवर्णांचे मतपरिवर्तन करण्यासाठी झटत होते. गांधी खिलाफत चळवळीत सहभागी झाले होते, यावर आजही टीका केली जाते. मुस्लिमांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात गांधींनी त्यावेळी घेतलेली भूमिका ही रास्तच होती. गांधींनी तर ख्रिश्चनांचा किंवा ब्रिटिशांचाही कधी राग केला नाही. मात्र आज विघटनाची प्रक्रिया नव्याने सुरु झाली आहे, असे राजन यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी प्रा. किशोर वानखडे यांच्या हस्ते अन्वर राजन यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक रितेश घोगरे यांनी केले. संचालन प्रा. सुचिता ठाकरे यांनी केले तर आभार आकाश जयस्वाल यांनी मानले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी