शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
5
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
6
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
7
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
8
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
9
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
10
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
11
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
12
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
13
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
14
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
16
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
17
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
18
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
19
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
20
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली

अर्थसंकल्पातील शेती तरतुदींवर गांधीवादी कृषी तज्ज्ञ नाखूष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 14:12 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थ संकल्पावर वर्धा जिल्ह्यातील गांधीवादी कृषी तज्ज्ञांनी शेतकी तरतुदीबाबत प्रचंड टीका केली आहे.

ठळक मुद्देशेतकी क्षेत्रातील अन्यायाची लुटारू योजना मागून पुढे सुरू असल्याचे टीका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थ संकल्पावर वर्धा जिल्ह्यातील गांधीवादी कृषी तज्ज्ञांनी शेतकी तरतुदीबाबत प्रचंड टीका केली असून अर्थ संकल्पातील कृषी क्षेत्राच्या तरतुदी म्हणजे शेतकी क्षेत्रावर अन्यायाची लुटारू योजना मागून पुढे चालू असल्याची टीका केली आहे.या संदर्भात माहिती देताना गांधीवादी कृषी शास्त्रज्ञ अशोक बंग म्हणाले की, वरवर भाषा सवलतींची पण मुळात प्रत्यक्ष धोरणे व निती प्रामुख्याने सावत्रपणाची हेच या अंदाजपत्रकातही दुर्दैवाने दिसते. पुढील निवडणुकांच्या आधीचे शेवटचे हे नियमित अंदाजपत्रक असूनही सरकारने शेतकी क्षेत्राचे मरण हेच सरकारचे धोरण या जुलुमी नितीला घट्ट केले आहे. वरवर काही शोभिवंत सजावटीची व लोभसपणाची अनुकूलता दिसली तरी खोलीवर जावून बघितले तर आधीच उद्ध्वस्त झालेल्या शेतकी क्षेत्राचे वस्त्रहरण करण्याची छुपी प्रमुख धोरणे कायम असल्यासारखीच आहेत.राष्ट्रीय किसान आयोग म्हणजेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी सरकारने स्वीकारल्या नाही. खराखुरा पूर्ण समावेशक असा उत्पादन खर्चचा हिशोब काढून तशा उत्पादन खर्चाच्या १५० टक्के शेतमालाला भाव मिळण्याची हमी प्रत्यक्षात येण्याचे धोरण नाही. १३० कोटीच्या अन्नदात्याला हक्काचा न्याय सन्मानाने मिळावे, असे अर्थ संकल्पात कुठेही दिसत नाही. राष्ट्रीय नियोजनात शेती क्षेत्राला वाटा १९७० च्या दशकात जवळपास १५ टक्के होता, तो घसरत २०१० च्या दशकात ३ ते ५ टक्के इतका कोसळवला. सध्या काय सुधारणा त्या बाबतीत आहे, हे याचा हिशोब लावला पाहिजे. देशाचे ५८ टक्के लोक शेतकी क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) वाटा १३ ते १५ टक्के इतका अन्यायकारक आहे. त्यात काय सुधारणा घडवून आणणार? शेती क्षेत्राचा वृद्धी दर (ग्रोथ रेट) हा नेहमी राष्ट्रीय वाढ दराच्या अर्धा किंवा पाव एवढाच राहत आला. आता काय सुधारणा ? देशातल्या १ टक्के लोकांना ७३ टक्के संपत्ती वाढीचा वाटा मिळाला. यात काय फरक या धोरणांमधून घडणार ? हे सारे प्रश्न कृषी क्षेत्राकरिता मुलभूत आहेत, असे बंग म्हणाले.

टॅग्स :agricultureशेती