शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

वर्ध्यातील गांधी विचार परिषद होणार कायमची बंद ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 11:38 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे मानसपुत्र जमनालाल बजाज यांच्या नावाने असलेल्या फाऊंडेशनच्या गांधी विचार परिषद कायम लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देमाजी विद्यार्थ्यांसह समर्थक आंदोलनाच्या पवित्र्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे मानसपुत्र जमनालाल बजाज यांच्या नावाने असलेल्या फाऊंडेशनच्या गांधी विचार परिषद कायम लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या परिषदेतून देश-विदेशातील असंख्य युवकांना गांधी विचारांचे धडे दिले जातात. पण, गेल्या काही महिन्यांपासून कामकाज ठप्प आहे. तसेच तेथील कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचा हालचाली सुरू झाल्याची चर्चा दूरवर पोहोचली आहे.

देशातच नव्हे, तर देशाबाहेरही गांधीजींचे जीवन व त्यांचे विचार यावर अध्ययन आणि संशोधन करण्यासंदर्भात गांधी विचार परिषदेची वेगळी ओळख आहे. येथे भारतासह विविध देशातील विद्यार्थी अध्ययनाकरिता येतात. येथून बाहेर पडणारा विद्यार्थी हा गुणवत्तापूर्ण ठरतो. पण, सध्या या विचार परिषदेला ग्रहण लागल्याचे बोलले जात आहे. विचार परिषद बंद होणार असल्याची माहिती मिळताच येथील माजी विद्यार्थ्यांसह गांधी विचारकांनी या संस्थेसंदर्भातील भूत-भविष्यकाळ आणि वर्तमानावर मंथन सुरू केले आहे. मात्र, अद्याप या संस्थेने बंद करण्यासंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नसली तरीही गांधी विचारांचा प्रसार करणारी ही संस्था बंद न करता आणखी चांगल्या पद्धतीने चालविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी माजी विद्यार्थ्यांसह समर्थक जमनालाल बजाज फाऊंडेशनच्या विश्वस्तांना पत्र आणि ई-मेलद्वारे करीत असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली नाही तर सत्याग्रह करण्याचाही विचार करीत आहेत.

१ जुलैपासून नव्या सत्राला सुरुवात होते पण; यावर्षी कोरोना प्रकोपामुळे सुरुवात करता आली नाही. संस्थाच बंद असल्याने काम ठप्प पडले आहे. पण, कोरोना संकटकाळानंतर पुन्हा सुरुवात होईल. गांधी विचार परिषद बंद होणार ही काहींकडून जाणीवपूर्वक पसरविलेली अफवा आहे.भरत महोदय,संचालक, गांधी विचार परिषद, वर्धा

विचार परिषदेची वैशिष्ट्येगांधी विचार परिषदेतील अभ्यासक्रम आणि दिनचर्या आगवेगळी आहे. येथे परीक्षा घेतली जात नाही तर विद्यार्थ्यांना गांधीजींचे तत्त्व दर्शन, विचार, जीवन व संदेशाच्या अध्ययनासह गांधीजींच्या दिनचर्येसोबत जगावे लागते. दररोज सकाळ-सायंकाळी सर्वधर्म प्रार्थना, चरखा चालविणे, श्रमदान, स्वयंपाक घरातील कर्मचाऱ्यांना मदत करणे, परिसर स्वच्छता यासोबतच अध्ययन सत्रात सामूहिक चिंतन करणे आदी कामे करावी लागतात. येथे स्वाध्यायाला महत्त्व दिले जाते. शिक्षक म्हणून देशातील समाजसेवक, गांधीवादी, चिंतक, लेखक, कलाकार, पर्यावरणवादी आदींना निमंत्रित केले जाते. गांधी विचार परिषद कायम राहावी, यासाठी धडपडही सुरू झाली आहे.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम