शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
2
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
3
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
4
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
5
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
6
सोनम रघुवंशीनेच राजाला दरीत ढकललं, आरोपींचा नवा धक्कादायक खुलासा!
7
सुख कळले! जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा, रितेशचं नाव घेत म्हणाली...
8
SIP मध्ये गुंतवणूक करुन १० लाख रुपये जमवायचेत? महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक, 'या' गोष्टींचीही घ्या काळजी
9
Raj Kushwaha : Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?
10
चौथीच्या वर्गात झालं होतं भांडण; ५० वर्षांनी मित्रांनी घेतला बदला, समोरच्याचे २ दात तोडले
11
RCB च्या चाहत्यांना 'धक्का'? विराट कोहलीच्या 'या' संघाची होणार विक्री? मालक का करतायेत विकण्याचा विचार?
12
आरारा खतरनाक! 'मुळशी पॅटर्न'मधील 'चहावाली' इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून झाली पदवीधर
13
२ वर्षात ११४१% ची तेजी, आज कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट; संरक्षण क्षेत्रात काम करते कंपनी
14
धक्कादायक! हातपाय पिरगळले, मान मोडली, नाका-तोंडातून रक्त; सुटकेसमधल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ
15
“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन
16
राजाच्या विधवेशी लग्न...सोनम दीदीचा 'हा' प्लॅन चालला असता तर प्रियकर राज बनला असता 'हिरो'
17
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
18
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
19
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
20
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’

वर्ध्यातील गांधी विचार परिषद होणार कायमची बंद ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 11:38 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे मानसपुत्र जमनालाल बजाज यांच्या नावाने असलेल्या फाऊंडेशनच्या गांधी विचार परिषद कायम लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देमाजी विद्यार्थ्यांसह समर्थक आंदोलनाच्या पवित्र्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे मानसपुत्र जमनालाल बजाज यांच्या नावाने असलेल्या फाऊंडेशनच्या गांधी विचार परिषद कायम लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या परिषदेतून देश-विदेशातील असंख्य युवकांना गांधी विचारांचे धडे दिले जातात. पण, गेल्या काही महिन्यांपासून कामकाज ठप्प आहे. तसेच तेथील कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचा हालचाली सुरू झाल्याची चर्चा दूरवर पोहोचली आहे.

देशातच नव्हे, तर देशाबाहेरही गांधीजींचे जीवन व त्यांचे विचार यावर अध्ययन आणि संशोधन करण्यासंदर्भात गांधी विचार परिषदेची वेगळी ओळख आहे. येथे भारतासह विविध देशातील विद्यार्थी अध्ययनाकरिता येतात. येथून बाहेर पडणारा विद्यार्थी हा गुणवत्तापूर्ण ठरतो. पण, सध्या या विचार परिषदेला ग्रहण लागल्याचे बोलले जात आहे. विचार परिषद बंद होणार असल्याची माहिती मिळताच येथील माजी विद्यार्थ्यांसह गांधी विचारकांनी या संस्थेसंदर्भातील भूत-भविष्यकाळ आणि वर्तमानावर मंथन सुरू केले आहे. मात्र, अद्याप या संस्थेने बंद करण्यासंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नसली तरीही गांधी विचारांचा प्रसार करणारी ही संस्था बंद न करता आणखी चांगल्या पद्धतीने चालविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी माजी विद्यार्थ्यांसह समर्थक जमनालाल बजाज फाऊंडेशनच्या विश्वस्तांना पत्र आणि ई-मेलद्वारे करीत असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली नाही तर सत्याग्रह करण्याचाही विचार करीत आहेत.

१ जुलैपासून नव्या सत्राला सुरुवात होते पण; यावर्षी कोरोना प्रकोपामुळे सुरुवात करता आली नाही. संस्थाच बंद असल्याने काम ठप्प पडले आहे. पण, कोरोना संकटकाळानंतर पुन्हा सुरुवात होईल. गांधी विचार परिषद बंद होणार ही काहींकडून जाणीवपूर्वक पसरविलेली अफवा आहे.भरत महोदय,संचालक, गांधी विचार परिषद, वर्धा

विचार परिषदेची वैशिष्ट्येगांधी विचार परिषदेतील अभ्यासक्रम आणि दिनचर्या आगवेगळी आहे. येथे परीक्षा घेतली जात नाही तर विद्यार्थ्यांना गांधीजींचे तत्त्व दर्शन, विचार, जीवन व संदेशाच्या अध्ययनासह गांधीजींच्या दिनचर्येसोबत जगावे लागते. दररोज सकाळ-सायंकाळी सर्वधर्म प्रार्थना, चरखा चालविणे, श्रमदान, स्वयंपाक घरातील कर्मचाऱ्यांना मदत करणे, परिसर स्वच्छता यासोबतच अध्ययन सत्रात सामूहिक चिंतन करणे आदी कामे करावी लागतात. येथे स्वाध्यायाला महत्त्व दिले जाते. शिक्षक म्हणून देशातील समाजसेवक, गांधीवादी, चिंतक, लेखक, कलाकार, पर्यावरणवादी आदींना निमंत्रित केले जाते. गांधी विचार परिषद कायम राहावी, यासाठी धडपडही सुरू झाली आहे.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम