शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

सैनिकांचे शौर्य भावी पिढीला प्रेरणादायी, चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 21:59 IST

शौर्याच्या जोरावर जगात आपल्या सैन्याने ओळख निर्माण केली आहे.  आपले सैनिक देशाच्या अखंडतेतासाठी कायम शीर हातावर घेऊन लढत असतात. 

वर्धा  -  शौर्याच्या जोरावर जगात आपल्या सैन्याने ओळख निर्माण केली आहे.  आपले सैनिक देशाच्या अखंडतेतासाठी कायम शीर हातावर घेऊन लढत असतात. आतंकवाद, नक्षलवाद , पूर, नैसर्गिक आपत्ती अशा सर्व परिस्थितीत देशातील जनतेचे रक्षण करतात. अशा सैनिकांचे शौर्य भावी पिढीला प्रेरणा देते असे प्रतीपादन उर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने विकास भवन येथे वर्धा जिल्ह्यातील माजी सैनिकांचा मेळावा व  सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.  यावेळी  मार्गदर्शन करताना ते बोलत होते या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, नगराध्यक्ष अतुल तराळे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी मेजर डॉ. शिल्पा खरपकर, माजी सैनिक आघाडीचे राम कोरके, राजेश बकाने उपस्थित होते.

यावेळी शहीद सैनिकांच्या वीर माता, वीर पत्नी  यांचा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या जवळ जाऊन त्यांचा सत्कार केला. यामध्ये शिताबाई लाखे, नलीनी  टिपले, शातांबाई वरहारे, सविता समरित, जयश्री चौधरी, मंदा कोल्हो, हर्षदा मेढे, शकंर गोडे, नंदकिशोर खडसे, केशव घोडखांदे, माधव मोहिते, श्याम पडसोदकर,राजेश सावरकर, बिपीन मोघे, विवेक ठाकरे, पुडंलिक बकाने, कर्नल चितरंजन चावडे, अरुणा सावरकर, रत्नमाला मेघे, शारदा कश्यप , भारती ठाकरे, अभिमन्यु पवार, पारणु भगत, यांचा समावेश आहे. 

यावेळी बोलताना त्यांनी शहीद सैनिकांचा गौरवपूर्ण उल्लेख करीत त्यांना नमन केले.जगातील सर्व देश आपल्या देशाला मान देतात त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे आपल्या सैन्याचा मजबूत कणा आहे. सैनिकांच्या अनुभवाचा आपल्या  समाजाने गावाच्या, देशाच्या विकासासाठी उपयोग करून घेतला पाहिजे. त्यांच्या शौर्य गाथांचे प्रेरणादायी चित्रफिती तयार करून भावी पिढीला योग्य दिशा व प्रेरणा देण्यासाठी दाखवाव्यात. निवृत्त झालेल्या सैनिकांना आणि  त्याच्या परिवाराला  चांगले जीवन जगता यावे यासाठी सर्व सैनिकांना एकाच ठिकाणी शेत जमीन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शंभर एकर जागा निवडून पाच  एकर  जमीन  सैनिकांना उपलब्ध करून द्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार पंकज भोयर यांनी माजी सैनिकांचा मेळावा आणि सत्कार कार्यक्रम घेणारे पहिलेच पालकमंत्री आहेत असे गौरवोद्गार काढून सैनिकांना 5 एकर शेत जमीन  उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तर जिल्हाधिकारी यांनी माजी सैनिकांच्या घरासाठी त्यांच्या पसंतीची जागा उपलब्ध करून देण्यात येईल असे यावेळी बोलताना सांगितले. यावेळी खासदार रामदास तडस यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी पुलगाव कॉटन मिल च्या कामगारांना  कॉटन मिल च्या जागेचे सातबारा वाटप करण्यात आले. 1982 पासून रखडलेला हा विषय मार्गी  लागला असून 114 कामगारांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यावेळी देवळी तहसील मधील  गुंजखेडा  येथील राही रामचंद्र अंबादे , शंकर  मेश्राम, मारोती निंबाळकर ,हिरामण  साखरे, मोतीराम नांदेकर, अरुण राऊत यांना सातबारा वाटप करण्यात आले.तसेच महात्मा गांधींच्या दिडशेव्या जयंती निमित्त जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत स्वयंसेवी कार्यकर्त्यांना किटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ शिल्पा खरपकर यांनी केले. संचालन यशवंत देशमुख तर आभार सतोष सामुद्रे यांनी  मानले.  यावेळी मोठ्या प्रमाणात माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे