शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
3
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
4
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
5
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
6
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
7
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
8
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
9
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
10
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
11
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
12
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
13
सावधान! फक्त एक फोन कॉल अन् गमावले तब्बल ३२ कोटी; महिलेसोबत नेमकं काय घडलं?
14
Gold Silver Price Today: लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
15
खऱ्या आयुष्यात खूपच हॉट दिसते 'लक्ष्मी निवास'मधली निलांबरी, बोल्ड फोटो पाहून विश्वासच बसणार नाही
16
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
17
Eye Infections: मुंबईत वाढताहेत संसर्गाचे रुग्ण; डोळ्यांत डोळे घालाल तर पस्तावाल, 'अशी' घ्या काळजी!
18
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
19
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
20
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी नाक्यावरील अतिक्रमणावर चालला गजराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पण, वर्धा जिल्हा ग्रीनझोनमध्ये असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत काही दुकानांसह भाजीपाला विक्री सुरू करण्यात आली. पण, जिल्ह्यातील हिवरा तांडा येथे मृत महिलेचा कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट आल्याने प्रशासन खडाडून जागे झाले आणि पुन्हा दोन दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला.

ठळक मुद्देफळविक्रेत्यांच्या हातगाड्या जप्त : सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा, नगरपालिका, पोलीस विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचे संकट लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी गर्दी होवू नये, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना राबविण्यात येत आहे. पण, आर्वी नाका परिसरात हातगाडीचालकांनी अतिक्रमण केल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाल्याने आर्वीनाका ते कारला रस्त्यावरील तसेच आयटीआय कॉलेजमार्गावर करण्यात आलेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले.कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पण, वर्धा जिल्हा ग्रीनझोनमध्ये असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत काही दुकानांसह भाजीपाला विक्री सुरू करण्यात आली. पण, जिल्ह्यातील हिवरा तांडा येथे मृत महिलेचा कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट आल्याने प्रशासन खडाडून जागे झाले आणि पुन्हा दोन दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. दोन दिवसांच्या लॉकडाऊनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिथिलता आणत पूर्वीप्रमाणे दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंतच उघडण्यास मुभा दिली. पण, शहरातील आर्वीनाका परिसरात भरणाऱ्या भाजीबाजारामुळे आणि रस्त्याकडेला लागणाऱ्या फळविक्रेत्यांच्या हातगाड्यांमुळे गर्दी उसळली होती. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजले होते.सार्वजनिक ठिकाणी गर्दी होवू नये, यासाठी प्रशासनाने अनेकदा नागरिकांना गर्दी न करण्याच्या सूचनाही दिल्या.पण, फळविक्रेते आणि भाजीविक्रेत्यांनी प्रशासनाचे आदेश धुडकवून टाकले. होणाऱ्या गर्दीमुळे विषाणू संसर्गाचा धोका होण्याची शक्यता असल्याने अखेर बुधवारी नगरपालिकेच्या वतीने पोलीस बंदोबस्तात आर्वी मार्गावरील हातगाड्यांचे अतिक्रमण काढण्यात आले.तसेच हातगाड्या जप्त करीत विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आयटीआय कॉलेजकडे जाणाऱ्या मार्गावरही अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. ही कारवाई नगर पालिकेचे कर्मचारी, पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी केली.पालिका कर्मचाऱ्यांची अरेरावीआर्वीनाका परिसरात अतिक्रमण काढत असताना रस्त्याने ये-जा करणाऱ्यांशी पालिकेचे कर्मचारी अरेरावी करीत होते. रस्त्याने एक शेतकरी जात असताना पालिकेच्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्याशी हुज्जत घातली. दोघांमध्ये वादावादीही झाली. त्यामुळे जनतेच्या हितार्थ कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जनतेलाच वेठीस धरू नये, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण