शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांपासून अनुदानाची वाट

By admin | Updated: December 20, 2014 01:54 IST

जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची घटती संख्या व ग्रामीण भागात असलेले कुपोषण यावर मात करण्याकरिता या शाळांत मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली होती.

रूपेश खैरी वर्धाजिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची घटती संख्या व ग्रामीण भागात असलेले कुपोषण यावर मात करण्याकरिता या शाळांत मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना सुरू झाली, त्या काळापासूनच ती वादात सापडली आहे. यात गत तीन महिन्यांपासून जिल्ह्यात योजनेचे अनुदानच आले नसल्याने ही योजना अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. योजनेत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत असलेले साहित्य आले नाही. विद्यार्थ्यांना पौष्टीक आहाराऐवजी पिवळा भात दिल्या जात असल्याची ओरड आहे.शाळेत मिळणाऱ्या पोषण आहारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर देण्यात आली; मात्र जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापन समित्याही या योजनेबाबत उदासिन असल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषदेसह व नगर परिषदेच्या शाळांना पोषण आहार पुरविण्यात येत आहे. या आहाराकरिता जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यापर्यंतचे अनुदान पोहोचले आहे. सप्टेंबर ते आतापर्यंतचे अनुदान जिल्ह्याला पोहोचले नसल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अहारापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागातील शाळेत केवळ पिवळा भात देत या विद्यार्थ्यांचे पोषण करण्याचा अजब प्रकार जिल्ह्यात सुरू आहे. याबाबत संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून सर्वच ठिक असल्याचे सांगण्यात येत आहे. पण अनुदान आले नाही हे सत्य असल्याचेही ते सांगतात. अनुदान नसताना योजना सुरळीत सुरू कशी, असा नवा प्रश्न समोर येत आहे. जुने अनुदान ज्या कालावधीपर्यंत होते, तो कालवधी संपून तीन महिने अधिक झाले आहेत. मग तेवढ्याच अनुदानात उर्वरीत महिन्याचा आहार कसा होईल हे न उलगडणारे कोडे आहे. शाळेच्या पोषण आहाराची जबाबदारी त्या केंद्राच्या प्रमुखांकडे दिली आहे, असे शिक्षण विभाग सांगत आहे. केंद्र प्रमुख त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ पिवळा भातच देवू शेत असल्याचे चित्र ग्रामीण भागातील शाळेचे आहे.कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता ही योजना अंमलात आणली. विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून पालेभाज्या, कडधान्य, बिस्किट, केळी व अंडी द्यावयाची होती. या वस्तू पोषण आहारात देण्याचे शासनाचे आदेश असताना त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचे वास्तव आहे. शालेय पोषण आहार योजनेचे अनुदान गत तीन महिन्यापासून आले नाही. हे खरे आहे; मात्र जिल्ह्यात योजना सुरळीत सुरू आहे. ही योजना राबविताना काही शिक्षकांच्या जीवावर येत असल्याने ते ओरड करीत असतात. येत्या आठवड्यात उर्वरीत अनुदान येईल, अशी अपेक्षा आहे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे.- रवींद्र काटोलकर, शिक्षणाधिकारी(प्राथमिक) जि.प. वर्धा.