शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
5
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
6
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
7
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
8
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
9
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
10
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
11
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
12
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
13
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
14
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
15
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
16
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
17
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
18
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
19
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
20
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"

अपंगांचा तहसीलवर मोर्चा

By admin | Updated: October 17, 2015 02:47 IST

शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे वंचित ठरलेल्या अपंगांनी शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.

दालनात अडीच तास ठिय्या : खुर्चीला घातला हार वर्धा: शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे वंचित ठरलेल्या अपंगांनी शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. कार्यालयात तहसीलदार उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या खुर्चीला हार घालून लक्ष वेधण्यात आले. तहसीलदारांच्या दालनात तब्बल अडीच तासांपर्यंत ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचे विरोधात नारेबाजी करण्यात आली.तालुक्यातील वाटखेडा येथील शासकीय काम आटोपून तहसीलदार तेजस्विनी जाधव कार्यालयात परत आल्यानंतर अपंगाचे निवेदन स्वीकारून मागण्यांची पूर्तता करण्याचे अभिवचन दिले. अपंगाची संजय गांधी निराधार योजनेची सर्व प्रकरणे निकाली काढण्यासोबतच अंत्योदय धान्य योजनेची शिधापत्रिका देण्याची कारवाई करण्यात येत असल्याचे शिष्टमंडळाला सांगण्यात आले.प्रहार अपंग बेरोजगार संघटनेच्यावतीने आयोजित मोर्चात तालुक्यातील अपंग मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा सर्वप्रथम खासदार रामदास तडस यांच्या निवासस्थानी गेला. यानंतर मोर्चाने न.प.कार्यालयावर धडक दिली. खासदार तडस, नगराध्यक्ष शोभा तडस व मुख्याधिकारी विजय देशमुख यांनी अपंगाचे निवेदन स्वीकारून येत्या १० दिवसांत मागण्या पूर्ण करण्याची हमी दिली. न.प. कोषातून करावयाच्या तीन टक्क्यांच्या खर्चातून अपंगाच्या रोजगार निर्मितीसाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी अपंग संघटनेच्या वतीने रेटण्यात आली. शहरातून निघालेल्या मोर्चात अपंग संघटनेचे प्रमोद कुऱ्हाटकर, हनुमंत झोटींग, शैलेश सहारे, सुनील मिश्रा, जयश्री कोरडे, पवन सुरकार, हरिभाऊ हिंगवे, मुरलीधर झाडे यांच्यासह अपंग बांधव उपस्थित होते.(प्रतिनिधी) अपंगांची शासनस्तरावर कुचंबणाअपंगासाठी शासनाच्या अनेक योजना कार्यान्वित असून याबाबतचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहे. यामध्ये तहसील कार्यालयांतर्गत अपंग व्यक्तींना संजय गांधी योजनेत सामावून घेणे, अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका उपलब्ध करून देणे, न.प. अंतर्गत उत्पन्नातील तीन टक्के निधी अपंगाच्या विकासासाठी खर्च करणे तसेच त्यांच्या अस्तित्वाची नियमित नोंद घेणे आदी योजना कार्यान्वित आहे. परंतु या सर्व योजना केवळ कागदापुरत्याच मर्यादित असून अपंगाची कुचंबणा केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात एक हजार अंतोदय धान्य योजनेचे धान्यपुरवठा कार्ड अपंगांना देण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामध्ये देवळीच्या वाट्याला १५० कार्ड आलेले आहे. परंतु या योजनेची स्थानिक तहसील कार्यालयाने मागील सहा महिन्यांपासून अंमलबजावणी न केल्यामुळे या योजनेपासून अपंग व्यक्ती वंचित ठरले आहे. तहसील कार्यालयात अपंगाची संजय गांधी निराधार योजनेची २०० प्रकरणे धूळखात पडली असल्याचेही सांगण्यात आले.