शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
4
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
5
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
6
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
7
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
8
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
9
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
10
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
11
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
12
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
13
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...
14
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
15
दहावीतील गुणांवरून नातेवाईकांनी उडवली होती खिल्ली, आता तरुणाने बँकेचा SMS दाखवला; आकडा पाहून 'बोलती बंद'
16
कोल्हापूरकरांच्या विरोधाची धग अंबानीपर्यंत पोहोचली; वनताराचे पथक नांदणीत येणार
17
Video: खऱ्याखुऱ्या पोलिस काकांना पहिल्यांदाच पाहून चिमुकली भलतीच खुश, म्हणाली 'हाय फाईव्ह...'
18
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
19
कियारा अडवाणीसाठी आणण्यात आला स्पेशल केक, लेकीसोबत साजरा केला वाढदिवस; म्हणाली...
20
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच

शताब्दी वर्षातील मित्र मिलन सोहळ्याला आले महत्त्व

By admin | Updated: November 16, 2016 00:51 IST

आचार्य विनोबा भावे यांच्या ब्रह्मनिर्वाण तिथीनिमित्त १५, १६ व १७ नोव्हेंबर रोजी मित्र मिलन सोहळ्याचे

तीन दिवस कार्यक्रम : यंदा खुले चर्चासत्रपवनार : आचार्य विनोबा भावे यांच्या ब्रह्मनिर्वाण तिथीनिमित्त १५, १६ व १७ नोव्हेंबर रोजी मित्र मिलन सोहळ्याचे आयोजन ब्रह्मविद्या मंदिर परमधाम पवनार येथे करण्यात आले आहे. मंगळवारी कार्यक्रमांना प्रारंभ झाला. १९१६ मध्ये विनोबांनी घर सोडून गांधीजींची सोबत केली. याला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने शताब्दी वर्ष म्हणून या मित्र-मिलन सोहळ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.दरवर्षी आयोजित या सोहळ्यात संगोष्ठीचा विशिष्ट विषय ठेवण्यात येतो; पण यंदा खुले चर्चासत्र होणार असल्याचे दिसून येत आहे. सोहळ्याची सुरूवात करताना मिनू बहन यांनी उपस्थितांचे शब्द सुमनांनी स्वागत करून वर्षभरात दिवंगत झालेले सर्वोदयी कुसूमताई, नरेंद्र दुबे, कृष्णराज मेहता, नारायणदास जाजू, मुलचंद बडजाते, भवरलाल जैन, पूर्णिमा बेन (१०३वर्षे) बाबूराव चंदावार, लक्ष्मीफुलन, नामदेव झाडे, मुकूंदभाई धुळे, वसंत पळशीकर, आर्यभूषण भारदान, चंद्रशेखर शर्मा ऋषीकेश, हरिजन सेवक डी.एन. बॅनर्नी, शैलेश बंडोपाध्याय, मिराताई भट्ट, निकमभाई यांनी आदरांजली वाहण्यात आली. पाच मिनीट मौन पाळून आचार्य विनोबांना आदरांजली वाहण्यात आली. कांचन बहन यांनी प्रास्ताविकातून विनोबांच्या कार्याला उजाळा दिला. विनोबांबाबत गांधीजींचे विचार सांगताना, लोक आश्रमात काही घ्यायला येत असतात; पण विनोबा आश्रमला खुप काही द्यायला आला आहे. विनोबा हे असामान्य व्यक्तिमत्वाचे धनी आहे. १९७९ मध्ये विनोबांनी गोवंश हत्याबंदीसाठी उपोषण केले, तेव्हा दादा धर्माधिकारी यांनी विनोबांना हा ईश्वरीय संकेत असल्याचे सांगितले. १४ वर्षे पदयात्रा करीत विनोबांनी भूदान चळवळीला वेगळे महत्त्व प्रदान केले, असेही कांचन यांनी सांगितले. तीन दिवस मित्र मिलन सोहळ्यात अनेक सर्वोदयी विचार व्यक्त करतील. यासाठी देश-विदेशातून अनेक गांधी विचारांचे साधक आश्रमात हजर झाले आहेत.(वार्ताहर)