शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, पोलीस तपासात संतापजनक प्रकार उघड
5
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
6
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
7
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
8
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
9
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
10
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
11
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
12
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
13
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
14
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
15
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
16
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
17
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
18
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
19
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
20
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी

शताब्दी वर्षातील मित्र मिलन सोहळ्याला आले महत्त्व

By admin | Updated: November 16, 2016 00:51 IST

आचार्य विनोबा भावे यांच्या ब्रह्मनिर्वाण तिथीनिमित्त १५, १६ व १७ नोव्हेंबर रोजी मित्र मिलन सोहळ्याचे

तीन दिवस कार्यक्रम : यंदा खुले चर्चासत्रपवनार : आचार्य विनोबा भावे यांच्या ब्रह्मनिर्वाण तिथीनिमित्त १५, १६ व १७ नोव्हेंबर रोजी मित्र मिलन सोहळ्याचे आयोजन ब्रह्मविद्या मंदिर परमधाम पवनार येथे करण्यात आले आहे. मंगळवारी कार्यक्रमांना प्रारंभ झाला. १९१६ मध्ये विनोबांनी घर सोडून गांधीजींची सोबत केली. याला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने शताब्दी वर्ष म्हणून या मित्र-मिलन सोहळ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.दरवर्षी आयोजित या सोहळ्यात संगोष्ठीचा विशिष्ट विषय ठेवण्यात येतो; पण यंदा खुले चर्चासत्र होणार असल्याचे दिसून येत आहे. सोहळ्याची सुरूवात करताना मिनू बहन यांनी उपस्थितांचे शब्द सुमनांनी स्वागत करून वर्षभरात दिवंगत झालेले सर्वोदयी कुसूमताई, नरेंद्र दुबे, कृष्णराज मेहता, नारायणदास जाजू, मुलचंद बडजाते, भवरलाल जैन, पूर्णिमा बेन (१०३वर्षे) बाबूराव चंदावार, लक्ष्मीफुलन, नामदेव झाडे, मुकूंदभाई धुळे, वसंत पळशीकर, आर्यभूषण भारदान, चंद्रशेखर शर्मा ऋषीकेश, हरिजन सेवक डी.एन. बॅनर्नी, शैलेश बंडोपाध्याय, मिराताई भट्ट, निकमभाई यांनी आदरांजली वाहण्यात आली. पाच मिनीट मौन पाळून आचार्य विनोबांना आदरांजली वाहण्यात आली. कांचन बहन यांनी प्रास्ताविकातून विनोबांच्या कार्याला उजाळा दिला. विनोबांबाबत गांधीजींचे विचार सांगताना, लोक आश्रमात काही घ्यायला येत असतात; पण विनोबा आश्रमला खुप काही द्यायला आला आहे. विनोबा हे असामान्य व्यक्तिमत्वाचे धनी आहे. १९७९ मध्ये विनोबांनी गोवंश हत्याबंदीसाठी उपोषण केले, तेव्हा दादा धर्माधिकारी यांनी विनोबांना हा ईश्वरीय संकेत असल्याचे सांगितले. १४ वर्षे पदयात्रा करीत विनोबांनी भूदान चळवळीला वेगळे महत्त्व प्रदान केले, असेही कांचन यांनी सांगितले. तीन दिवस मित्र मिलन सोहळ्यात अनेक सर्वोदयी विचार व्यक्त करतील. यासाठी देश-विदेशातून अनेक गांधी विचारांचे साधक आश्रमात हजर झाले आहेत.(वार्ताहर)