शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

शताब्दी वर्षातील मित्र मिलन सोहळ्याला आले महत्त्व

By admin | Updated: November 16, 2016 00:51 IST

आचार्य विनोबा भावे यांच्या ब्रह्मनिर्वाण तिथीनिमित्त १५, १६ व १७ नोव्हेंबर रोजी मित्र मिलन सोहळ्याचे

तीन दिवस कार्यक्रम : यंदा खुले चर्चासत्रपवनार : आचार्य विनोबा भावे यांच्या ब्रह्मनिर्वाण तिथीनिमित्त १५, १६ व १७ नोव्हेंबर रोजी मित्र मिलन सोहळ्याचे आयोजन ब्रह्मविद्या मंदिर परमधाम पवनार येथे करण्यात आले आहे. मंगळवारी कार्यक्रमांना प्रारंभ झाला. १९१६ मध्ये विनोबांनी घर सोडून गांधीजींची सोबत केली. याला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने शताब्दी वर्ष म्हणून या मित्र-मिलन सोहळ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.दरवर्षी आयोजित या सोहळ्यात संगोष्ठीचा विशिष्ट विषय ठेवण्यात येतो; पण यंदा खुले चर्चासत्र होणार असल्याचे दिसून येत आहे. सोहळ्याची सुरूवात करताना मिनू बहन यांनी उपस्थितांचे शब्द सुमनांनी स्वागत करून वर्षभरात दिवंगत झालेले सर्वोदयी कुसूमताई, नरेंद्र दुबे, कृष्णराज मेहता, नारायणदास जाजू, मुलचंद बडजाते, भवरलाल जैन, पूर्णिमा बेन (१०३वर्षे) बाबूराव चंदावार, लक्ष्मीफुलन, नामदेव झाडे, मुकूंदभाई धुळे, वसंत पळशीकर, आर्यभूषण भारदान, चंद्रशेखर शर्मा ऋषीकेश, हरिजन सेवक डी.एन. बॅनर्नी, शैलेश बंडोपाध्याय, मिराताई भट्ट, निकमभाई यांनी आदरांजली वाहण्यात आली. पाच मिनीट मौन पाळून आचार्य विनोबांना आदरांजली वाहण्यात आली. कांचन बहन यांनी प्रास्ताविकातून विनोबांच्या कार्याला उजाळा दिला. विनोबांबाबत गांधीजींचे विचार सांगताना, लोक आश्रमात काही घ्यायला येत असतात; पण विनोबा आश्रमला खुप काही द्यायला आला आहे. विनोबा हे असामान्य व्यक्तिमत्वाचे धनी आहे. १९७९ मध्ये विनोबांनी गोवंश हत्याबंदीसाठी उपोषण केले, तेव्हा दादा धर्माधिकारी यांनी विनोबांना हा ईश्वरीय संकेत असल्याचे सांगितले. १४ वर्षे पदयात्रा करीत विनोबांनी भूदान चळवळीला वेगळे महत्त्व प्रदान केले, असेही कांचन यांनी सांगितले. तीन दिवस मित्र मिलन सोहळ्यात अनेक सर्वोदयी विचार व्यक्त करतील. यासाठी देश-विदेशातून अनेक गांधी विचारांचे साधक आश्रमात हजर झाले आहेत.(वार्ताहर)