शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

शताब्दी वर्षातील मित्र मिलन सोहळ्याला आले महत्त्व

By admin | Updated: November 16, 2016 00:51 IST

आचार्य विनोबा भावे यांच्या ब्रह्मनिर्वाण तिथीनिमित्त १५, १६ व १७ नोव्हेंबर रोजी मित्र मिलन सोहळ्याचे

तीन दिवस कार्यक्रम : यंदा खुले चर्चासत्रपवनार : आचार्य विनोबा भावे यांच्या ब्रह्मनिर्वाण तिथीनिमित्त १५, १६ व १७ नोव्हेंबर रोजी मित्र मिलन सोहळ्याचे आयोजन ब्रह्मविद्या मंदिर परमधाम पवनार येथे करण्यात आले आहे. मंगळवारी कार्यक्रमांना प्रारंभ झाला. १९१६ मध्ये विनोबांनी घर सोडून गांधीजींची सोबत केली. याला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने शताब्दी वर्ष म्हणून या मित्र-मिलन सोहळ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.दरवर्षी आयोजित या सोहळ्यात संगोष्ठीचा विशिष्ट विषय ठेवण्यात येतो; पण यंदा खुले चर्चासत्र होणार असल्याचे दिसून येत आहे. सोहळ्याची सुरूवात करताना मिनू बहन यांनी उपस्थितांचे शब्द सुमनांनी स्वागत करून वर्षभरात दिवंगत झालेले सर्वोदयी कुसूमताई, नरेंद्र दुबे, कृष्णराज मेहता, नारायणदास जाजू, मुलचंद बडजाते, भवरलाल जैन, पूर्णिमा बेन (१०३वर्षे) बाबूराव चंदावार, लक्ष्मीफुलन, नामदेव झाडे, मुकूंदभाई धुळे, वसंत पळशीकर, आर्यभूषण भारदान, चंद्रशेखर शर्मा ऋषीकेश, हरिजन सेवक डी.एन. बॅनर्नी, शैलेश बंडोपाध्याय, मिराताई भट्ट, निकमभाई यांनी आदरांजली वाहण्यात आली. पाच मिनीट मौन पाळून आचार्य विनोबांना आदरांजली वाहण्यात आली. कांचन बहन यांनी प्रास्ताविकातून विनोबांच्या कार्याला उजाळा दिला. विनोबांबाबत गांधीजींचे विचार सांगताना, लोक आश्रमात काही घ्यायला येत असतात; पण विनोबा आश्रमला खुप काही द्यायला आला आहे. विनोबा हे असामान्य व्यक्तिमत्वाचे धनी आहे. १९७९ मध्ये विनोबांनी गोवंश हत्याबंदीसाठी उपोषण केले, तेव्हा दादा धर्माधिकारी यांनी विनोबांना हा ईश्वरीय संकेत असल्याचे सांगितले. १४ वर्षे पदयात्रा करीत विनोबांनी भूदान चळवळीला वेगळे महत्त्व प्रदान केले, असेही कांचन यांनी सांगितले. तीन दिवस मित्र मिलन सोहळ्यात अनेक सर्वोदयी विचार व्यक्त करतील. यासाठी देश-विदेशातून अनेक गांधी विचारांचे साधक आश्रमात हजर झाले आहेत.(वार्ताहर)