शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या उत्पन्नाला मालवाहतुकीचा दे धक्का!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 05:00 IST

जून ते ऑगस्ट या चार महिन्यांच्या कालावधीत वर्धा विभागाच्या रित्या झालेल्या तिजोरीत मालवाहतुकीपोटी ४२ लाख ८९ हजार ५८८ रुपयांची भर पडली आहे. या कालावधीत मालवाहतुकीकरिता एसटीच्या ८९९ फेऱ्या झाल्यात. तब्बल १ लाख १६ हजार ९७६ किलोमीटर राज्यांतर्गत मालवाहतूक करणाऱ्या एसटी धावल्या. परिवहन महामंडळाने पंधरवड्यापूर्वी पूर्ण क्षमतेने एसटीची वाहतूक सुरू केली आहे. मात्र कोरोनाचे संकट कायम असल्याने प्रवाशांचा अद्याप प्रतिसाद नाही. परिणामी, एसटीला तोटा सहन करतच वाटचाल सुरू ठेवावी लागत आहे.

ठळक मुद्देमिळाले ४३ लाखांचे उत्पन्न : चार महिन्यांत १ लाख १६ हजार ९७६ किलोमीटर धावली एसटी

सुहास घनोकारलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आल्याने परिवहन महामंडळाच्या एसटीचीही चाके जागीच थांबली होती. त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे वाहतूक उत्पन्न बुडाले. एसटीपासून उत्पन्न सुरू ठेवण्यासाठी एसटीतून मालवाहतूक करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. त्यानुसार सुरुवातीला वर्धा आगाराने पाच आणि नंतर बसेस मालवाहतुकीसाठी सुरू केल्या होत्या. यातून महामंडळाच्या उत्पन्नाला बऱ्यापैकी हातभार लागला आहे.जून ते ऑगस्ट या चार महिन्यांच्या कालावधीत वर्धा विभागाच्या रित्या झालेल्या तिजोरीत मालवाहतुकीपोटी ४२ लाख ८९ हजार ५८८ रुपयांची भर पडली आहे. या कालावधीत मालवाहतुकीकरिता एसटीच्या ८९९ फेऱ्या झाल्यात. तब्बल १ लाख १६ हजार ९७६ किलोमीटर राज्यांतर्गत मालवाहतूक करणाऱ्या एसटी धावल्या. परिवहन महामंडळाने पंधरवड्यापूर्वी पूर्ण क्षमतेने एसटीची वाहतूक सुरू केली आहे. मात्र कोरोनाचे संकट कायम असल्याने प्रवाशांचा अद्याप प्रतिसाद नाही. परिणामी, एसटीला तोटा सहन करतच वाटचाल सुरू ठेवावी लागत आहे.कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने एसटीही बंद ठेवण्यात आली होती. दरम्मान महामंडळाला कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. त्यामुळे महामंडळाने एसटीची मालवाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचे संकट अजून किती दिवस असणार, हे सांगता येणे अवघड असले तरी कायमस्वरूपी हे संकट राहणार आहे. पर्यायाने प्रवाशांना एसटीची गरज भासणारच आहे. महामंडळाला एसटी बंद ठेवून चालणार नाही. यामुळेच एसटी सुरू राहण्यासाठी रेल्वेप्रमाणे एसटीमधून मालवाहतूक सुरू करण्यात आली आहे. वर्धा विभागांतर्गत वर्धा, आर्वी, पुलगाव, हिंगणघाट, तळेगाव (श्या.पंत) हे पाच आगार आहेत. या पाचही आगारांतर्गत सद्यस्थितीत २० मालवाहतूक एसटी धावत आहेत. मालवाहतुकीला जिल्ह्यातील कारखानदार, व्यावसायिक आणि शेतकरी वर्गाकडून प्रतिसाद मिळत आहे. विभागाला वाढत असलेला प्रतिसाद लक्षात घेता महामंडळाने आणखी १० मालवाहतूक एसटी मंजूर केल्या आहेत.वर्धा विभागात १५०० कर्मचारीवर्धा विभागांतर्गत वर्धा, आर्वी, पुलगाव, हिंगणघाट, तळेगाव (श्या.पंत) हे पाच आगार असून १५०० च्या जवळपास कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना काळात एसटीची सेवा बंद होती. वेतनावरही परिणाम झाला होता. यामुळे या कर्मचाऱ्यांचाही जीव टांगणीला लागला होता. एसटीचा गाडा आता पूर्वपदावर येत मालवाहतुकीमुळे हातभार लागला असल्याने कर्मचारी वर्गात काही प्रमाणात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.वेतनावर २ कोटी २५ लाखांचा खर्चवर्धा विभागांतर्गत असलेल्या पाचही आगारात १५०० च्या जवळपास अधिकारी, कर्मचारी, चालक आणि वाहक कार्यरत असून या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर महामंडळाकडून महिन्याकाठी २ कोटी २५ लाखांवर खर्च होतो.एसटीचे कर्मचारी दोन महिन्यांपासून वेतनाविना; आर्थिक ओढाताणकोरोना विषाण संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे एसटीची चाके जागीच थांबली होती. परिणामी, महामंडळाचे कोट्यवधींचे वाहतूक उत्पन्न बुडाले. पंधरवड्यापूर्वी एसटीची प्रवासी वाहतूक पूर्णक्षमतेने सुरू झाली. मात्र, अद्याप प्रवाशांचा प्रतिसाद अल्प असाच आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम झाला असून ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची प्रचं आर्थिक ओढाताण होत आहे. वेतनाचा प्रश्नही आता सुरळीत करावा, अशी मागणी कर्मचारीवर्गातून होत आहे.

टॅग्स :state transportएसटी