शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

स्वातंत्र्य हे साध्य नव्हे तर भविष्याच्या उभारणीचे साधन होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

स्वांतत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते तर ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते, असे मौलिक विचार ‘जवाहरलाल नेहरु: स्वांतत्र्य लढ्याचे नेते आणि देशाचे पंतप्रधान’ या पुस्तकात सामावलेले आहे. या पुस्तकाचे लेखन लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी केले असून ते पुस्तक आज सेवाग्राम येथे महात्मा गांधी यांच्या चरणी अर्पण करण्यात आले.

ठळक मुद्देसुरेश द्वादशीवार लिखित ‘जवाहरलाल नेहरु : स्वातंत्र्य लढ्याचे नेते व पंतप्रधान’ पुस्तक बापूंना अर्पण

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : जवाहरलाल नेहरु यांच्यासाठी स्वातंत्र्य हा जुन्या मार्गाचा शेवट नव्हता, नव्या वाटेचा आरंभ होता. त्या आधीचा त्यांचा व देशाचा प्रवास एका प्रदीर्घ व अंधाऱ्या वाटेवरील कष्टाचा, वेदनांचा व विजयांचा होता. स्वांतत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते तर ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते, असे मौलिक विचार ‘जवाहरलाल नेहरु: स्वांतत्र्य लढ्याचे नेते आणि देशाचे पंतप्रधान’ या पुस्तकात सामावलेले आहे. या पुस्तकाचे लेखन लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी केले असून ते पुस्तक आज सेवाग्राम येथे महात्मा गांधी यांच्या चरणी अर्पण करण्यात आले.सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रमातील बापू कुटीला संपादक सुरेश द्वादशीवार यांनी भेट दिली. त्यांनी ‘जवाहरलाल नेहरु: स्वांतत्र्य लढ्याचे नेते आणि देशाचे पंतप्रधान’ हे पुस्तक बापू कुटीतील बापुंच्या गादीवर ठेऊन ते नतमस्तक झाले. यावेळी चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा मनपा नगरसेवक नंदू नागरकर, सेवाग्राम आश्रम कार्यालयाचे प्रमुख सिद्धेश्वर उंबरकर, आनंद निकेतन विद्यालयाच्या संचालिका सुषमा शर्मा व अतुल शर्मा यांची उपस्थिती होती. द्वादशीवार यांनी आश्रम परिसराची पाहणी करुन पुस्तक विक्री केंद्रालाही भेट दिली. त्यांच्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर दिवंगत पतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या आयुष्याच्या प्रवासाचे ओझरते वर्णन करताना त्यांनी २७ वर्षे स्वातंत्र्यलढ्याच्या धकाधकित गेली. त्यापैकी १० वर्षे तुरूंगात काढली होती. डिसेंबर १९२१ मध्ये ते प्रथम तुरूंगात गेले.त्यांचा अखेरचा तुरुंगवास ९ आॅगस्ट १९४२ रोजी सुरू झाला होता. तो १ हजार ४१ दिवसांचा होता. अखेरच्या कारावासानंतर दोन वर्षांनी ते देशाचे पंतप्रधान झाले आणि १६ वर्षे त्या पदावर राहिले.त्या काळात त्यांनी देशाच्या आधुनिकतेची, लोकशाही वाटचालीची व सर्वक्षेत्रिय प्रगतीची पायाभरणी केली. अशा या नेत्याचे चरित्र समजून घेतले पाहिजे, कारण एका मर्यादित अर्थाने ते देशाचेही चरित्र आहे, असेही या पुस्तकात नमुद आहे.

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू