शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

जिल्ह्यात सहा हजारांवर अधिक गरिबांना मोफत आरोग्यसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

खासदार तडस म्हणाले, दिवाळी सुटीनिमित्ताने वर्धा जिल्ह्यातील आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना भेट देत संवाद साधला. या योजनेबद्दल नागरिक समाधानी असून वर्धा लोकसभा क्षेत्रात अत्यंत चांगले कार्य झाल्याने समाधान आहे. पंतप्रधान मोदी यांनी आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबाला सुरक्षा कवच दिले असून लाभार्थी आयुष्यमान भारत योजनेविषयी समाधान व्यक्त करताना दिसतात, असेही ते यावेळी म्हणाले.

ठळक मुद्देरामदास तडस : आयुष्यमान योजनेच्या लाभार्थ्यांसोबत संवाद कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र सरकारची पंतप्रधान आयुष्यमान भारत-पंतप्रधान जनआरोग्य योजना ही जगातील सर्वांत मोठी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेमुळे समाजातील गरिबांना नि:शुल्क आरोग्यसेवेचा आधार मिळणार आहे.पंतप्रधान मोदी यांची महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा वर्धा लोकसभा क्षेत्रात २३ सप्टेंबर २०१८ पासून प्रारंभ झालेला आहे. वर्धा लोकसभा मतदार संघातील वर्धा, आर्वी, देवळी, हिंगणघाट, विधानसभा क्षेत्रात १ वर्षाच्या कालावधीमध्ये विविध आजाराकरिता समाजातील ६ हजार ५३८ पेक्षा अधिक गरिबांना नि:शुल्क आरोग्यसेवेचा आधार मिळालेला आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी आयुष्यमान भारत योजनेच्या संवाद कार्यक्रमात केले.विकास भवनात दीपावली निमित्त आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांसोबत संवादावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, अमित गोमासे, हरीश तांदळे उपस्थित होते. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या प्रत्येक कुंटुबातील सदस्यासोबत त्यांनी संवाद साधला. लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत योजनेचे अनुभव कथन केले.खासदार तडस म्हणाले, दिवाळी सुटीनिमित्ताने वर्धा जिल्ह्यातील आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना भेट देत संवाद साधला. या योजनेबद्दल नागरिक समाधानी असून वर्धा लोकसभा क्षेत्रात अत्यंत चांगले कार्य झाल्याने समाधान आहे. पंतप्रधान मोदी यांनी आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबाला सुरक्षा कवच दिले असून लाभार्थी आयुष्यमान भारत योजनेविषयी समाधान व्यक्त करताना दिसतात, असेही ते यावेळी म्हणाले.प्रास्ताविकातून जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी वर्धा जिल्ह्यात एकूण लाभार्थी १ लाख २९ हजार असून ग्रामीण भागातील १ लाख २ हजार व शहरी भागात २६ हजार लाभार्थी आहेत. प्रतीकुटुंब 5 लाख रुपयापंर्यत ४९२ रुग्णालयात उपचार होणार आहेत.वर्धा जिल्ह्यात पाच रुग्णालये यामध्ये सामान्य रुग्णालय, वर्धा, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट, कस्तुरबा हॉस्पीटल सेवाग्राम, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) राणे हॉस्पीटल आर्वी या रुग्णालयात रुग्णांना योजनेचा लाभ दिला जात आहे.वर्धा जिल्हयात आतापर्यंत १ लाख २० हजार ई-कार्डचे वाटप झालेले आहे. आयुष्यमान भारत योजनेतून १३०० विविध आजारांवर सरकारी रुग्णालयात व ८४० आजारावर खासगी रुग्णालयात उपचार होत आहे. लाभार्थ्यांना योग्य माहिती मिळावी याकरिता मोफत टोल फ्री क्रमांक १४५५५ कॉल करता येणार असल्याची माहिती दिली. यावेळी विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन जिल्हा समन्वयक डॉ. प्रफुल्ल मेश्राम यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा प्रमुख डॉ. रितेश गुजरकर यांनी मानले, कार्यक्रमाला डॉ. अमोल चाफले, डॉ. सुशील चैधरी तसेच सामान्य रुग्णालयाचे कर्मचारी व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी देवीदास मेघे, नारायण तलमले, राजू झामरे, रंजना झामरे, सुरेश फुले, शैलेंद्र मेंढे, अमोल भोंगाडे, नंदू उगले, सुखदेव राऊत, पंकज येरेकार, उत्तम पाटील, वैशाली कोवे, गणेश बोरा, अनिल नैताम, मंदा नागोसे, रमेश भेंडे, सुभाष अरबट, प्रशांत मुंजेवार, सुखदेव उगले व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्यRamdas Tadasरामदास तडस