शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सहा हजारांवर अधिक गरिबांना मोफत आरोग्यसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

खासदार तडस म्हणाले, दिवाळी सुटीनिमित्ताने वर्धा जिल्ह्यातील आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना भेट देत संवाद साधला. या योजनेबद्दल नागरिक समाधानी असून वर्धा लोकसभा क्षेत्रात अत्यंत चांगले कार्य झाल्याने समाधान आहे. पंतप्रधान मोदी यांनी आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबाला सुरक्षा कवच दिले असून लाभार्थी आयुष्यमान भारत योजनेविषयी समाधान व्यक्त करताना दिसतात, असेही ते यावेळी म्हणाले.

ठळक मुद्देरामदास तडस : आयुष्यमान योजनेच्या लाभार्थ्यांसोबत संवाद कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र सरकारची पंतप्रधान आयुष्यमान भारत-पंतप्रधान जनआरोग्य योजना ही जगातील सर्वांत मोठी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेमुळे समाजातील गरिबांना नि:शुल्क आरोग्यसेवेचा आधार मिळणार आहे.पंतप्रधान मोदी यांची महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा वर्धा लोकसभा क्षेत्रात २३ सप्टेंबर २०१८ पासून प्रारंभ झालेला आहे. वर्धा लोकसभा मतदार संघातील वर्धा, आर्वी, देवळी, हिंगणघाट, विधानसभा क्षेत्रात १ वर्षाच्या कालावधीमध्ये विविध आजाराकरिता समाजातील ६ हजार ५३८ पेक्षा अधिक गरिबांना नि:शुल्क आरोग्यसेवेचा आधार मिळालेला आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी आयुष्यमान भारत योजनेच्या संवाद कार्यक्रमात केले.विकास भवनात दीपावली निमित्त आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांसोबत संवादावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, अमित गोमासे, हरीश तांदळे उपस्थित होते. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या प्रत्येक कुंटुबातील सदस्यासोबत त्यांनी संवाद साधला. लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत योजनेचे अनुभव कथन केले.खासदार तडस म्हणाले, दिवाळी सुटीनिमित्ताने वर्धा जिल्ह्यातील आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना भेट देत संवाद साधला. या योजनेबद्दल नागरिक समाधानी असून वर्धा लोकसभा क्षेत्रात अत्यंत चांगले कार्य झाल्याने समाधान आहे. पंतप्रधान मोदी यांनी आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबाला सुरक्षा कवच दिले असून लाभार्थी आयुष्यमान भारत योजनेविषयी समाधान व्यक्त करताना दिसतात, असेही ते यावेळी म्हणाले.प्रास्ताविकातून जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी वर्धा जिल्ह्यात एकूण लाभार्थी १ लाख २९ हजार असून ग्रामीण भागातील १ लाख २ हजार व शहरी भागात २६ हजार लाभार्थी आहेत. प्रतीकुटुंब 5 लाख रुपयापंर्यत ४९२ रुग्णालयात उपचार होणार आहेत.वर्धा जिल्ह्यात पाच रुग्णालये यामध्ये सामान्य रुग्णालय, वर्धा, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट, कस्तुरबा हॉस्पीटल सेवाग्राम, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) राणे हॉस्पीटल आर्वी या रुग्णालयात रुग्णांना योजनेचा लाभ दिला जात आहे.वर्धा जिल्हयात आतापर्यंत १ लाख २० हजार ई-कार्डचे वाटप झालेले आहे. आयुष्यमान भारत योजनेतून १३०० विविध आजारांवर सरकारी रुग्णालयात व ८४० आजारावर खासगी रुग्णालयात उपचार होत आहे. लाभार्थ्यांना योग्य माहिती मिळावी याकरिता मोफत टोल फ्री क्रमांक १४५५५ कॉल करता येणार असल्याची माहिती दिली. यावेळी विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन जिल्हा समन्वयक डॉ. प्रफुल्ल मेश्राम यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा प्रमुख डॉ. रितेश गुजरकर यांनी मानले, कार्यक्रमाला डॉ. अमोल चाफले, डॉ. सुशील चैधरी तसेच सामान्य रुग्णालयाचे कर्मचारी व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी देवीदास मेघे, नारायण तलमले, राजू झामरे, रंजना झामरे, सुरेश फुले, शैलेंद्र मेंढे, अमोल भोंगाडे, नंदू उगले, सुखदेव राऊत, पंकज येरेकार, उत्तम पाटील, वैशाली कोवे, गणेश बोरा, अनिल नैताम, मंदा नागोसे, रमेश भेंडे, सुभाष अरबट, प्रशांत मुंजेवार, सुखदेव उगले व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्यRamdas Tadasरामदास तडस