शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

गावातील निराधार वृद्ध स्त्री-पुरूषांना मोफत जेवणाचे डबे; वर्ध्यात १३ वर्षांपासून वार्धक्याला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 09:42 IST

उत्कर्ष ग्रामविकास संस्थेने ‘अन्नछत्र’ उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमाची तपपूर्ती झाली असून दररोज न चुकता या वृद्धांना जेवणाचा डबा पोहोचविण्याचे अविरत कार्य केले जात आहे.

ठळक मुद्देउत्कर्ष ग्रामविकास संस्थेचा उपक्रम

आॅनलाईन लोकमतवर्धा : वार्धक्यात शरीर थकायला लागते. मनु्ष्य परावलंबी होतो. सांभाळ करायला कुणी नसलेल्या वृद्ध जीवांची फरफट होते. कुटुंब, समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या निराधार वृद्धांना अखरेचा काळ सुसह्य व्हावा म्हणून उत्कर्ष ग्रामविकास संस्थेने ‘अन्नछत्र’ उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमाची तपपूर्ती झाली असून दररोज न चुकता या वृद्धांना जेवणाचा डबा पोहोचविण्याचे अविरत कार्य केले जात आहे. हे पूण्यकर्म शासनाकडून मात्र अद्याप दुर्लक्षित असल्याचेच दिसते.उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष संजय गांडोळे व सहकाऱ्यांनी या सामाजिक समस्येवर आपण काम करायला पाहिजे, असे ठरविले. वृद्धापकाळात आप्तस्वकियांच्या आधारापासून वंचित झालेल्या, काळाच्या ओघात एकाकी पडलेल्या वृद्धांना मायेची वागणूक व अन्न पुरविण्याचा उपक्रम सुरू झाला. मागील १३ वर्षांपासून हा उपक्रम अविरत सुरू आहे. गावातील दहा निराधार वृद्ध महिला-पुरूषांना दररोज डबा पोहोचविण्याचा दिनक्रम झाला आहे. या वृद्धांपैकी एका वृद्ध व्यक्तीला मृत्यू झाला. यामुळे आणखी एका गरजू वृद्धाला या उपक्रमात सहभागी करून घेत अन्नदानाचे हे कार्य संस्थेने सुरूच ठेवले आहे. हे सेवाकार्य अव्याहात सुरू ठेवण्याकरिता संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व काही दानदाते सहकार्य करतात. पाऊस, वादळवारा, असो वा कडाक्याची थंडी कधीही वृद्धांना भोजनाचा डबा पोहोचविण्यात खंड पडत नाही. या आपुलकीच्या छत्राने वृद्धांचे दु:ख, एकाकीपणाला आधार दिला आहे. या वृद्धांना घरी शिजविलेले अन्नच दिले जाते. सण उत्सवात गोडधोड करून वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा प्रयत्न केला जातो. वृद्धांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला आहे. संस्था या वृद्धांच्या वार्षिक भोजनासाठी एक लाखावर रकमेची तरतूद करते. महागाईनुसार भोजन खर्चाच्या रकमेत वाढ होत आहे. हे महत्कार्य अनेकांच्या एकत्रित प्रयत्नातून होत आहे, हे विशेष!संस्था उपाध्यक्ष डॉ. वंदना वैद्य, कोषाध्यक्ष विक्रांत जिंदे, संजय ठाकरे, राजू डगवार, अजय गांडोळे, सुरेश मुडे, शालू काळे यांचे अध्यक्ष संजय गांडोळे यांना सहकार्य लाभते. काही दानदाते या सेवाकार्याला मदत करतात, असे गांडोळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. समाजाला दिशा, वृद्धांना सन्मान व आधार देणाऱ्या संस्थेच्या सेवाकार्याची शासनाने कधीच दखल घेतली नाही. कधी कुण्या अधिकाऱ्याने येऊनही पाहिले नाही!

गरजू, पालकांचे छत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांनाही दिला मदतीचा हातगरजू, पालकांचे छत्र हरविलेल्या मुला-मुलींचा शैक्षणिक खर्च उचलण्याचे कामही उत्कर्ष संस्था करीत आहे. सध्या गावातील अकरा विद्यार्थ्यांचा सर्व शैक्षणिक खर्च या संस्थेतर्फे केला जात आहे. हे विद्यार्थी परिस्थितीसमोर हतबल होऊन शिक्षण सोडू नये, किमान दहावीपर्यंत तरी शिकावे यासाठी उत्कर्ष संस्थेकडून २००७ पासून विद्यार्थी दत्तक योजना राबविली जात आहे. शालेय साहित्य, गणवेश, शिक्षणाच्या इतर खर्चाची तरतूद संस्था करीत असल्याने या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

निराधार वृद्ध व्यक्तींच्या सेवेतून मिळणारे समाधान मोठे आहे. आमच्या संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांना हे सेवाकार्य आपल्या हातून घडत असल्याचा आनंद आहे. सुरूवातीला पाच वृद्धांच्या भोजनाची सोय आम्ही केली. १३ वर्षांच्या वाटचालीत आम्ही पवनार गावातील दहा निराधार वृद्ध व्यक्तींना अन्नछत्र देऊ शकलो असून विद्यार्थ्यांनाही आधार दिला आहे.- संजय गांडोळे, अध्यक्ष, उत्कर्ष ग्रामविकास संस्था, पवनार.

घरचा माणूस १५ वर्षांपूर्वी मृत पावला. मुलबाळ काहीच नाही. शरीर थकेपर्यंत मिळते ते काम केले. आता म्हातारपणाने शक्य होत नाही. या अखेरच्या काळात उत्कर्ष संस्था आमची मायबाप आहे. या संस्थेने कुटुंबातील ज्येष्ठासम धीर दिला.- लक्ष्मीबाई सरोदे, वृद्ध महिला.

टॅग्स :foodअन्न