शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

डुकरांचा मुक्तसंचार, शहरात अस्वच्छतेचा कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST

आर्वी शहरात अनेक वार्डात प्रभागात कच्या नाल्या आहे तर काही प्रभागात नाल्याचा पताच नाही. त्यामुळे अनेक घरातील सांडपाणी जागोजागी जमा होते या सांडपाण्यात डुकर बिनधास्तपणे वावरतात. त्यामुळे रोगराईला निमंत्रण मिळत आहे. शहरात साफसफाईचा बोजवारा उडाल्याने मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग लागलेले आहे. त्यामुळे त्याची दुर्गंधी सुटून नागरिकांच्या आरोग्यांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. या घाणीमुळे मच्छरांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र सर्वत्र आहे.

ठळक मुद्देखुल्या नाल्यांमुळे डास वाढले : नागरिकांच्या आरोग्याला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शहरातील मुख्य मार्गावर बसलेल्या मोकाट जनावरे सोबतच आता शहरात डुकरांच्या हैदोसाने नागरिक त्रस्त झाले आहे. आर्वीत जागोजागी डुकराचे बस्तान आहे याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांत रोष निर्माण झाला आहे.आर्वी शहरात अनेक वार्डात प्रभागात कच्या नाल्या आहे तर काही प्रभागात नाल्याचा पताच नाही. त्यामुळे अनेक घरातील सांडपाणी जागोजागी जमा होते या सांडपाण्यात डुकर बिनधास्तपणे वावरतात. त्यामुळे रोगराईला निमंत्रण मिळत आहे.शहरात साफसफाईचा बोजवारा उडाल्याने मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग लागलेले आहे. त्यामुळे त्याची दुर्गंधी सुटून नागरिकांच्या आरोग्यांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. या घाणीमुळे मच्छरांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र सर्वत्र आहे.या घाणीत डुकरे बिनधास्त लोळण घेतात आणि परिसरात रोगही पसरवितात एवढेच नव्हे तर अंगणात महिला भांडे घासणे, धुणे आदी कामे करीत असताना डुकरे येऊन भांड्याला तोंड लावतात त्यामुळे महिलाही त्रस्त झाल्या आहेत. शहरातील या डुकरांचा बंदोबस्त नगरपालिकेने करावा मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत पालिकेला निवेदन दिले आहे.मोकाट जनावरांचा ठिय्या कचऱ्यांच्या ढिगावरचआर्वी शहरात दररोज मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होतो. हा कचरा शहरातून कचरा गाड्या जमा करतात. मात्र अनेकदा नागरिक कुठेही कचरा टाकत असतात. त्यावर मोकाट जनावर, डुकर यांनी ठिय्या दिला आहे. कचºयांवर जनावर चरताना दिसून येतात. डुकरांची मोठी रांगच रांग शहरात अनेक भागात फिरत असल्याचे दिसून येते.यांचा कुणीही बंदोबस्त करीत नसल्याचे चित्र आहे.आर्वी शहरात डुकरांचे प्रमाण वाढले आहे हे माहीत आहेच त्याचा नागरिकांना त्रास होतो आहे. आम्ही दोन महिन्यापूर्वीच डुकरे पकडण्या संबंधाची जाहिरात वर्तमानपत्रात दिली आहे. पण अद्यापही कोणी कंत्राटदार हे काम घेण्यासाठी आलेले नाही.-सुनील आरेकर, आरोग्य अधिकारी नगरपालिका आर्वी.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान