शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

८ हजार ५६६ विद्यार्थ्यांना मिळाला मोफत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST

जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित (अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त शाळा वगळता) शाळांमध्ये नर्सरी व पहिलीत वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २५ टक्के कोट्यांतर्गत दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यामध्ये आठही तालुक्यातील शाळांची नोंदणी झाल्यानंतर त्या शाळेत प्रवेश मिळविण्याकरिता ऑनलाईन नोंदणी करुन सोडत पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या जातो.

ठळक मुद्देआरटीई प्रवेश प्रक्रियेचा लाभ। आठही तालुक्यांची आठ वर्षांतील परिस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रि येतून गेल्या आठ वर्षामध्ये ८ हजार ५६६ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे. यावर्षीही ऑनलाईन अर्ज नोंदणी झाली असून आता पालकांना सोडतीची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित (अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त शाळा वगळता) शाळांमध्ये नर्सरी व पहिलीत वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २५ टक्के कोट्यांतर्गत दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यामध्ये आठही तालुक्यातील शाळांची नोंदणी झाल्यानंतर त्या शाळेत प्रवेश मिळविण्याकरिता ऑनलाईन नोंदणी करुन सोडत पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या जातो. गेल्या आठ वर्षाचा आढावा घेतला असता आरटीईअंतर्गत ८ हजार ५६६ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे. पहिलीत प्रवेश मिळाल्यानंतर तो विद्यार्थी त्याच शाळेमध्ये आठवीपर्यंतचे शिक्षण घेत असल्याने आठ वर्षातील पहिली ते आठवी पर्यंतची विद्यार्थ्यांची संख्या बघित्ली असता आतापर्यं जवळपास आरटीईअंतर्गत ३० हजार ५१८ विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे.यावर्षीही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून १२४ शाळा सहभागी झाल्या आहे. या शाळांमध्ये नर्सरीकरिता ४८ तर पहिलीकरिता १२९९ जागा रिक्त असून जवळपास ३ हजार १६ अर्ज प्राप्त झाले असून कोणाला प्रवेश मिळते हे सोडतीनंतरच कळणार आहे.२०१८-२०१९ मध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांनी घेतला लाभआरटीई प्रवेशाकरिता दरवर्षी शाळांची नोेंदणी केली जातात. त्यांनतर त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सोडतीनुसार प्रवेश दिल्या जातो. २०१२-२०१३ पासून तर २०१९-२० या आठ वर्षातील शैक्षणिक सत्राचा विचार केल्यास सर्वाधिक प्रवेश २०१८-१९ या सत्रात देण्यात आला. जवळपास १ हजार ४६७ विद्यार्थ्यांना यावर्षी प्रवेश मिळाला आहे. तर इतर वर्षाची आकडेवारी बघितल्यास २०१२-२०१३ या शैक्षणिक वर्षात सर्वात कमी केवळ ५४१ विद्यार्थ्यांनाच मोफत प्रवेश देण्यात आला. त्यासोबतच २०१३-२०१४ मध्ये १ हजार ४, २०१४-२०१५ मध्ये १ हजार १९१, २०१६-२०१७ मध्ये ७३४, २०१७-२०१८ मध्ये १ हजार २०९, २०१८-२०१९ मध्ये १ हजार ४६७ तर २०१९-२०२० मध्ये १ हजार ३१४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलापालकांकडून प्रवेशाकरिता प्रयत्नआरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रि येंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येही गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या जात असून घरापासून जवळच असलेल्या आणि या प्रक्रियेत सहभागी असलेल्या शाळांची निवड करुन पालकांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही रिक्त जागेच्या दुप्पट अर्ज दाखल करण्यात आल्याने आपल्याच पाल्याला प्रवेश मिळावा, याकरिता पालकांनी आपले सर्वोतोपरी प्रयत्न चालविले आहे.

टॅग्स :examपरीक्षा