शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

८ हजार ५६६ विद्यार्थ्यांना मिळाला मोफत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST

जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित (अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त शाळा वगळता) शाळांमध्ये नर्सरी व पहिलीत वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २५ टक्के कोट्यांतर्गत दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यामध्ये आठही तालुक्यातील शाळांची नोंदणी झाल्यानंतर त्या शाळेत प्रवेश मिळविण्याकरिता ऑनलाईन नोंदणी करुन सोडत पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या जातो.

ठळक मुद्देआरटीई प्रवेश प्रक्रियेचा लाभ। आठही तालुक्यांची आठ वर्षांतील परिस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रि येतून गेल्या आठ वर्षामध्ये ८ हजार ५६६ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे. यावर्षीही ऑनलाईन अर्ज नोंदणी झाली असून आता पालकांना सोडतीची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित (अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त शाळा वगळता) शाळांमध्ये नर्सरी व पहिलीत वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २५ टक्के कोट्यांतर्गत दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यामध्ये आठही तालुक्यातील शाळांची नोंदणी झाल्यानंतर त्या शाळेत प्रवेश मिळविण्याकरिता ऑनलाईन नोंदणी करुन सोडत पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या जातो. गेल्या आठ वर्षाचा आढावा घेतला असता आरटीईअंतर्गत ८ हजार ५६६ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे. पहिलीत प्रवेश मिळाल्यानंतर तो विद्यार्थी त्याच शाळेमध्ये आठवीपर्यंतचे शिक्षण घेत असल्याने आठ वर्षातील पहिली ते आठवी पर्यंतची विद्यार्थ्यांची संख्या बघित्ली असता आतापर्यं जवळपास आरटीईअंतर्गत ३० हजार ५१८ विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे.यावर्षीही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून १२४ शाळा सहभागी झाल्या आहे. या शाळांमध्ये नर्सरीकरिता ४८ तर पहिलीकरिता १२९९ जागा रिक्त असून जवळपास ३ हजार १६ अर्ज प्राप्त झाले असून कोणाला प्रवेश मिळते हे सोडतीनंतरच कळणार आहे.२०१८-२०१९ मध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांनी घेतला लाभआरटीई प्रवेशाकरिता दरवर्षी शाळांची नोेंदणी केली जातात. त्यांनतर त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सोडतीनुसार प्रवेश दिल्या जातो. २०१२-२०१३ पासून तर २०१९-२० या आठ वर्षातील शैक्षणिक सत्राचा विचार केल्यास सर्वाधिक प्रवेश २०१८-१९ या सत्रात देण्यात आला. जवळपास १ हजार ४६७ विद्यार्थ्यांना यावर्षी प्रवेश मिळाला आहे. तर इतर वर्षाची आकडेवारी बघितल्यास २०१२-२०१३ या शैक्षणिक वर्षात सर्वात कमी केवळ ५४१ विद्यार्थ्यांनाच मोफत प्रवेश देण्यात आला. त्यासोबतच २०१३-२०१४ मध्ये १ हजार ४, २०१४-२०१५ मध्ये १ हजार १९१, २०१६-२०१७ मध्ये ७३४, २०१७-२०१८ मध्ये १ हजार २०९, २०१८-२०१९ मध्ये १ हजार ४६७ तर २०१९-२०२० मध्ये १ हजार ३१४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलापालकांकडून प्रवेशाकरिता प्रयत्नआरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रि येंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येही गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या जात असून घरापासून जवळच असलेल्या आणि या प्रक्रियेत सहभागी असलेल्या शाळांची निवड करुन पालकांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही रिक्त जागेच्या दुप्पट अर्ज दाखल करण्यात आल्याने आपल्याच पाल्याला प्रवेश मिळावा, याकरिता पालकांनी आपले सर्वोतोपरी प्रयत्न चालविले आहे.

टॅग्स :examपरीक्षा