शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

‘ईगल सिड्स बायोटेक’विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

हिंगणघाट पंचायत समितीतील कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून ईगल सिड्स बायोटेक लिमिटेडवर हिंगणघाट पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२० सह बियाणे कायदा १९६६ कलम ६ बी, ७ बी बियाणे नियम १९६८ चे कलम ३४ ए (२) अन्वये गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपनीविरुद्ध कृषी विभागाने केलेल्या फौजदारी कारवाईमुळे इतर बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देपं.स. कृषी अधिकाऱ्यांची तक्रार । सोयाबीनच्या बोगस बियाण्यांची विक्री भोवली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बोगस बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी हिंगणघाट पंचायत समितीतील कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून ईगल सिड्स बायोटेक लिमिटेडवर हिंगणघाट पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२० सह बियाणे कायदा १९६६ कलम ६ बी, ७ बी बियाणे नियम १९६८ चे कलम ३४ ए (२) अन्वये गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपनीविरुद्ध कृषी विभागाने केलेल्या फौजदारी कारवाईमुळे इतर बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.प्राप्त माहितीनुसार, हिंगणघाट तालुक्यातील शीतल विठ्ठल चौधरी, रा. गोविंदपूर या शेतकऱ्यासह इतर पाच शेतकऱ्यांनी एकूण २४.२० हे. क्षेत्रावर १० जून ते १३ जून या कालावधीत ईगल कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी केली. परंतु, ईगल इक्सलंट प्लस हे सोयाबीन बियाणे अंकुरले नाही. या प्र्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी बियाणे कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी १९ जूनला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून शेतकरी चौधरी यांनी केली.सदर तक्रार प्राप्त होताच २३ जूनला हिंगणघाटचे उपविभागीय कृषी अधिकारी एन. एन. घोडमारे, तालुका कृषी अधिकारी आर. बी. गायकवाड, पं.स.चे कृषी अधिकारी एम. एस. डेहनकर, मंडळ कृषी अधिकारी एस. डी. सुतार, आर. एस. गाडगे आदींनी तक्रारकर्त्या शेतकºयाचे शेत गाठून पाहणी केली. शिवाय बियाण्यांचे काही नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. प्रयोगशाळेचा अहवाल ईगल कंपनीच्या विरोधात आल्यावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे व प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी संजय बमनोटे यांच्या मार्गदर्शनात सदर कंपनीवर फौजदारी करवाई करण्यात आली आहे. असे असले तरी नुकसानग्रस्त शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.उगवण क्षमता केवळ १३ टक्केचकृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार ७० टक्क्यांपेक्षा जास्त उगवण क्षमता असल्यास एकरी २६ किलो सोयाबीन बियाणे पेरणीसाठी पुरेसे असते. मात्र, शेतकऱ्याने एकरी ३० किलो बियाणे पेरणी करून सुद्धा एका चौरस मध्ये सरासरी ३२ ते ३३ रोपे उगवणे आवश्यक असताना केवळ ४ रोपे एका चौरस मिटरमध्ये उगवल्याचे निदर्शनास आले म्हणजे कंपनीच्या सोयाबीन बियाणे वाणाची केवळ १३ टक्के उगवण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.मंत्र्याच्या दौऱ्यातून शेत वगळल्याचा आरोपहिंगणघाट तालुक्यात गोविंदपूर येथील शेतकरी शीतल विठ्ठल चौधरी यांच्या शेतातील ६० एकरातील ईगल कंपनीचे बियाणे उगवले नाही. कृषी मंत्र्यांनी सोमवारी दौरा आयोजित केला आहे. मात्र या दौऱ्यात गोविंदपूर वगळण्यात आल्याचा आरोप शेतकरी चौधरी व शिवसेनेचे नेते तुषार देवढे यांनी केला आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र