शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
2
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
3
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
6
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
7
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
8
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
9
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
10
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
11
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
12
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
13
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
14
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
15
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
16
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
17
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
18
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
19
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
20
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू

कारंजात पाण्याअभावी संत्राबागा कोमेजल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 22:07 IST

कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा बागा आहेत. या बागांवर तालुक्याचे आर्थिक गणितही जुळले आहे; पण दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने व विहिरींच्या पाणी पातळीने तळ गाठल्याने संत्र्याच्या बागा कशा वाचवायच्या, असा प्रश्न बागायतदार शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

ठळक मुद्देपाणीपातळी घटल्याचा परिणाम : बागायतदार चिंतित

लोकमत न्यूज नेटवर्कसेलगाव (लवणे) : कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा बागा आहेत. या बागांवर तालुक्याचे आर्थिक गणितही जुळले आहे; पण दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने व विहिरींच्या पाणी पातळीने तळ गाठल्याने संत्र्याच्या बागा कशा वाचवायच्या, असा प्रश्न बागायतदार शेतकऱ्यांना भेडसावत आहे. पाण्याअभावी या परिसरातील अनेक संत्राची झाडे अखेरची घटका मोजत असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.गेल्या पाच ते सहा दिवसांपासून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शेतातील विहिरींची पाणी पातळी घटली आहे. इतकेच नव्हे तर कुपनलिकाही कोरड्या झाल्या आहेत. अशात पाण्या अभावी संत्र्याचे डेरेदार झाड कोमेजत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील दोन वर्षांपासून अल्पपावसाचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. त्यातच उत्पादनात घट येईल, अशी भीती संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बोअरवेल व विहिरी तयार करून भू-गर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आल्याने यंदा मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच अनेक विहिरी कोरड्या झाल्या आहेत. शिवाय दिवसेंदिवस तापमानातही झपाट्याने वाढ होत असल्याने याचा विपरीत परिणाम संत्राच्या झाडांवर होत आहे.काही बागायतदार शेतकरी टँकरने पाणी आणून संत्राच्या बागा वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र बघावयास मिळते. परंतु, ज्या आर्थिक दृष्ट्या कमकुवत बागायतदार शेतकऱ्याला टँकरचा खर्च झेपावत नाही अशा शेतकऱ्याने काय करावे, असा सवाल हवालदिल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. संत्रा बागा वाचविण्यासाठी शासनाने बागायतदार शेतकऱ्यांसाठी तातडीने योग्य पाऊल उचलावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई