शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कारंजात पाण्याअभावी संत्राबागा कोमेजल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 22:07 IST

कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा बागा आहेत. या बागांवर तालुक्याचे आर्थिक गणितही जुळले आहे; पण दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने व विहिरींच्या पाणी पातळीने तळ गाठल्याने संत्र्याच्या बागा कशा वाचवायच्या, असा प्रश्न बागायतदार शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

ठळक मुद्देपाणीपातळी घटल्याचा परिणाम : बागायतदार चिंतित

लोकमत न्यूज नेटवर्कसेलगाव (लवणे) : कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा बागा आहेत. या बागांवर तालुक्याचे आर्थिक गणितही जुळले आहे; पण दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने व विहिरींच्या पाणी पातळीने तळ गाठल्याने संत्र्याच्या बागा कशा वाचवायच्या, असा प्रश्न बागायतदार शेतकऱ्यांना भेडसावत आहे. पाण्याअभावी या परिसरातील अनेक संत्राची झाडे अखेरची घटका मोजत असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.गेल्या पाच ते सहा दिवसांपासून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शेतातील विहिरींची पाणी पातळी घटली आहे. इतकेच नव्हे तर कुपनलिकाही कोरड्या झाल्या आहेत. अशात पाण्या अभावी संत्र्याचे डेरेदार झाड कोमेजत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील दोन वर्षांपासून अल्पपावसाचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. त्यातच उत्पादनात घट येईल, अशी भीती संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बोअरवेल व विहिरी तयार करून भू-गर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आल्याने यंदा मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच अनेक विहिरी कोरड्या झाल्या आहेत. शिवाय दिवसेंदिवस तापमानातही झपाट्याने वाढ होत असल्याने याचा विपरीत परिणाम संत्राच्या झाडांवर होत आहे.काही बागायतदार शेतकरी टँकरने पाणी आणून संत्राच्या बागा वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र बघावयास मिळते. परंतु, ज्या आर्थिक दृष्ट्या कमकुवत बागायतदार शेतकऱ्याला टँकरचा खर्च झेपावत नाही अशा शेतकऱ्याने काय करावे, असा सवाल हवालदिल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. संत्रा बागा वाचविण्यासाठी शासनाने बागायतदार शेतकऱ्यांसाठी तातडीने योग्य पाऊल उचलावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई