शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

कारंजात पाण्याअभावी संत्राबागा कोमेजल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 22:07 IST

कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा बागा आहेत. या बागांवर तालुक्याचे आर्थिक गणितही जुळले आहे; पण दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने व विहिरींच्या पाणी पातळीने तळ गाठल्याने संत्र्याच्या बागा कशा वाचवायच्या, असा प्रश्न बागायतदार शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

ठळक मुद्देपाणीपातळी घटल्याचा परिणाम : बागायतदार चिंतित

लोकमत न्यूज नेटवर्कसेलगाव (लवणे) : कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा बागा आहेत. या बागांवर तालुक्याचे आर्थिक गणितही जुळले आहे; पण दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने व विहिरींच्या पाणी पातळीने तळ गाठल्याने संत्र्याच्या बागा कशा वाचवायच्या, असा प्रश्न बागायतदार शेतकऱ्यांना भेडसावत आहे. पाण्याअभावी या परिसरातील अनेक संत्राची झाडे अखेरची घटका मोजत असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.गेल्या पाच ते सहा दिवसांपासून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शेतातील विहिरींची पाणी पातळी घटली आहे. इतकेच नव्हे तर कुपनलिकाही कोरड्या झाल्या आहेत. अशात पाण्या अभावी संत्र्याचे डेरेदार झाड कोमेजत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील दोन वर्षांपासून अल्पपावसाचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. त्यातच उत्पादनात घट येईल, अशी भीती संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बोअरवेल व विहिरी तयार करून भू-गर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आल्याने यंदा मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच अनेक विहिरी कोरड्या झाल्या आहेत. शिवाय दिवसेंदिवस तापमानातही झपाट्याने वाढ होत असल्याने याचा विपरीत परिणाम संत्राच्या झाडांवर होत आहे.काही बागायतदार शेतकरी टँकरने पाणी आणून संत्राच्या बागा वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र बघावयास मिळते. परंतु, ज्या आर्थिक दृष्ट्या कमकुवत बागायतदार शेतकऱ्याला टँकरचा खर्च झेपावत नाही अशा शेतकऱ्याने काय करावे, असा सवाल हवालदिल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. संत्रा बागा वाचविण्यासाठी शासनाने बागायतदार शेतकऱ्यांसाठी तातडीने योग्य पाऊल उचलावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई