शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

बँकॉकमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील चार विद्यार्थी स्वगृही परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 16:53 IST

शासनाने ‘वंदे भारत मोहिमेत’ थायलंडचा समावेश करून तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांना स्वगृही पोहोचविले. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी लोकमतचे आभार मानले आहे.

ठळक मुद्देवर्ध्यातील एकाचा समावेशमहाराष्ट्र मंडळाने दिला आधारविद्यार्थ्यांनी मानले लोकमतचे आभार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेणारे विविध राज्यांतील १३ विद्यार्थी थायलंडमध्ये प्रशिक्षणाकरिता गेले असता लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. दरम्यान, शासनाने परदेशातील विद्यार्थ्यांना परत आणण्याकरिता ‘फ्लाईट प्लॅन’ तयार केला होता. पण, यात थायलंडचा समावेश नसल्याने याबाबत ‘विदेशातून परतीच्या फ्लाईट प्लॅनमधून थायलंड बाद’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. अखेर शासनाने ‘वंदे भारत मोहिमेत’ थायलंडचा समावेश करून तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांना स्वगृही पोहोचविले. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी लोकमतचे आभार मानले आहे.महाराष्ट्रासह राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, केरळ व दिल्ली या राज्यातील १३ विद्यार्थी जानेवारी महिन्यात थायलंडला प्रशिक्षणाकरिता गेले होते. मात्र, कोविड-१९ च्या लॉकडाऊनमुळे या सर्व विद्यार्थ्यांनी भारतात परतण्यासाठी १६ एप्रिलला तिकीट काढले होते. त्यानंतर ते बँकॉकच्या विमानतळावर आल्यावर त्यांना भारतातही लॉकडाऊन असल्याने विमानसेवा बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांची चांगलीच आबाळ झाली. विद्यार्थ्यांनी लगेच आपल्या नातेवाईकांसह लोकप्रतिनिधी व शासनाची संपर्क साधला. यातच त्यांना एक रात्र विमानतळावर काढावी लागली. त्यानंतर या विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांचा समोवश असून त्या चारही विद्यार्थ्यांना बँकॉकमधील महाराष्ट्र मंडळामध्ये आधार देण्यात आला. तब्बल दोन महिने महाराष्ट्र मंडळात काढल्यानंतर ५ जून रोजी महाराष्ट्रातील चारही विद्यार्थी विशेष विमानाने मुंबईत दाखल झाले व तेथून आपापल्या गावी पोहोचले. यामध्ये वर्ध्यातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.

दोन महिने घरच्यासारखा केला सांभाळबँकॉकमध्ये अडकून पडल्यानंतर एक रात्र विमानतळावर काढावी लागली. त्यानंतर बँकॉकमधील महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष अर्पिता कुलकर्णी यांच्यासह मंदार पारसनीस व सुदेशकुमार यांनी भारतीय दूतावासाकडून महाराष्ट्रातील ऋषिकेश भरत बच्छाव रा. सोयगाव ता. मालेगाव, संदीप भिकनसिंग निकुंभ रा. रायतेल ता. साक्री दीपक रमेश अहिरे रा. हाताने ता. मालेगाव व कुणाल संजय मानकर रा. वर्धा या चारही विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वीकारली. दोन महिने विद्यार्थ्यांची जेवण व राहण्याची व्यवस्था केली तसेच शेवटच्या दिवसापर्यंत सर्व मदतही केली. महाराष्ट्र मंडळाने अडचणीत मदत करून घरच्यासारखी वागणूक दिली, असे मत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

लॉकडाऊनमुळे भारतात येण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे एक रात्र बँकॉकच्या विमानतळावर काढावी लागली. त्यानंतर आम्ही इतरत्र संपर्क साधल्यानंतर तेथील महाराष्ट्र मंडळाने मोठा आधार दिला. तसेच लोकमतनेही आमची अडचण वृत्तांच्या माध्यमातून मांडून लक्ष वेधले. त्यामुळे आम्ही आता सुखरूप आमच्या घरी पोहोचलो. ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सहकार्य केले त्या सर्वांचे आभार.- कुणाल मानकर, विद्यार्थी, वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस