शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
3
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
4
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
5
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
6
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
7
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
8
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
9
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
10
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
11
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
12
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
13
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
14
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
15
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
16
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
17
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
18
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
19
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
20
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

वायफड परिसरात चार तास कोसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:00 IST

गुरुवारी वायफड परिसराला तब्बल चार तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले. नाल्यांना पूर आला. दरम्यान वायफड ते लोणसावळी मार्गावरील घोडमारे व चरडे यांच्या शेताजवळ पुलाशेजारी सिमेंट पायल्या टाकून रस्ता तयार करण्यात आला होता. मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आल्याने रस्ता पूर्णत: वाहून गेला.

ठळक मुद्देरस्ता गेला वाहून : परिसरातील दहा गावांचा संपर्क तुटला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वायफड परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता पूर्णत: वाहून गेला. परिणामी, शेतकऱ्यांची वहिवाट ठप्प झाली असून परिसरातील दहावर गावांचा संपर्क तुटला. अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.गुरुवारी वायफड परिसराला तब्बल चार तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले. नाल्यांना पूर आला. दरम्यान वायफड ते लोणसावळी मार्गावरील घोडमारे व चरडे यांच्या शेताजवळ पुलाशेजारी सिमेंट पायल्या टाकून रस्ता तयार करण्यात आला होता. मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आल्याने रस्ता पूर्णत: वाहून गेला. सध्या खरीप हंगाम सुरू आहे. बहुतांश शेतकऱ्यांची पेरणी कामे आटोपली असून सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिके बहरली आहेत. अनेक ठिकाणी निंदण आणि डवरणीही सुरू आहे. पावसामुळे रस्ताच वाहून गेल्याने वायफड ते लोणसावळी शिवारातील शंभरावर शेतकऱ्यांच्या शेतीकामात ऐन हंगामात अडथळा निर्माण झाला आहे. वायफड शिवारात शेती असलेल्या शेतकऱ्यांना डोरली, लोणसावळी असा १० किलोमीटरचा फेरी घेऊन शेतीकामे करावी लागत आहेत. यात शेतीसाहित्य नेताना तारेवरचीकसरत करावी लागत आहे. रस्त्याअभावी वायफड, लोणसावळी, शेकापूर, आंजी, मांडवा आदी गावांतील शेतकरी नागरिकांच्या आवागमनाचा प्रश्न निर्माण झाला असून संपर्क तुटला आहे. शासकीय यंत्रणेने रस्ता आणि पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.रस्त्याची मागणी धूळखातया रस्त्यासह पुलाचे बांधकाम करण्याबाबत मार्च महिन्यातच शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे मागणी केली होती. तसा प्रस्तावही तयार करून प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता. मात्र, याकडे शासकीय यंत्रणेकडून कानाडोळाच करण्यात आला. शासकीय दिरंगाईचा ऐन हंगामात रस्त्याअभावी शेतीकामांना फटका बसला आहे.शेतपिकांचे होतेय नुकसानवायफड-लोणसावळी मार्गाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत डांबरीकरण करण्यात आले. मात्र, बांधकामावेळी रस्त्याच्या दुतर्फा नाल्यांचे बांधकाम करण्यात आले नाही. यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्गच नसून पाणी थेट शेतात शिरत पिकांचे नुकसान होते, अशी माहिती शशांक घोडमारे यांनी दिली.

टॅग्स :Rainपाऊस