शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

वायफड परिसरात चार तास कोसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:00 IST

गुरुवारी वायफड परिसराला तब्बल चार तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले. नाल्यांना पूर आला. दरम्यान वायफड ते लोणसावळी मार्गावरील घोडमारे व चरडे यांच्या शेताजवळ पुलाशेजारी सिमेंट पायल्या टाकून रस्ता तयार करण्यात आला होता. मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आल्याने रस्ता पूर्णत: वाहून गेला.

ठळक मुद्देरस्ता गेला वाहून : परिसरातील दहा गावांचा संपर्क तुटला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वायफड परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता पूर्णत: वाहून गेला. परिणामी, शेतकऱ्यांची वहिवाट ठप्प झाली असून परिसरातील दहावर गावांचा संपर्क तुटला. अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.गुरुवारी वायफड परिसराला तब्बल चार तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले. नाल्यांना पूर आला. दरम्यान वायफड ते लोणसावळी मार्गावरील घोडमारे व चरडे यांच्या शेताजवळ पुलाशेजारी सिमेंट पायल्या टाकून रस्ता तयार करण्यात आला होता. मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आल्याने रस्ता पूर्णत: वाहून गेला. सध्या खरीप हंगाम सुरू आहे. बहुतांश शेतकऱ्यांची पेरणी कामे आटोपली असून सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिके बहरली आहेत. अनेक ठिकाणी निंदण आणि डवरणीही सुरू आहे. पावसामुळे रस्ताच वाहून गेल्याने वायफड ते लोणसावळी शिवारातील शंभरावर शेतकऱ्यांच्या शेतीकामात ऐन हंगामात अडथळा निर्माण झाला आहे. वायफड शिवारात शेती असलेल्या शेतकऱ्यांना डोरली, लोणसावळी असा १० किलोमीटरचा फेरी घेऊन शेतीकामे करावी लागत आहेत. यात शेतीसाहित्य नेताना तारेवरचीकसरत करावी लागत आहे. रस्त्याअभावी वायफड, लोणसावळी, शेकापूर, आंजी, मांडवा आदी गावांतील शेतकरी नागरिकांच्या आवागमनाचा प्रश्न निर्माण झाला असून संपर्क तुटला आहे. शासकीय यंत्रणेने रस्ता आणि पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.रस्त्याची मागणी धूळखातया रस्त्यासह पुलाचे बांधकाम करण्याबाबत मार्च महिन्यातच शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे मागणी केली होती. तसा प्रस्तावही तयार करून प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता. मात्र, याकडे शासकीय यंत्रणेकडून कानाडोळाच करण्यात आला. शासकीय दिरंगाईचा ऐन हंगामात रस्त्याअभावी शेतीकामांना फटका बसला आहे.शेतपिकांचे होतेय नुकसानवायफड-लोणसावळी मार्गाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत डांबरीकरण करण्यात आले. मात्र, बांधकामावेळी रस्त्याच्या दुतर्फा नाल्यांचे बांधकाम करण्यात आले नाही. यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्गच नसून पाणी थेट शेतात शिरत पिकांचे नुकसान होते, अशी माहिती शशांक घोडमारे यांनी दिली.

टॅग्स :Rainपाऊस