शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
3
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
4
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
5
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
6
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
7
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
8
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
9
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
10
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
11
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
12
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
13
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
14
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
15
'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला
16
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
17
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
18
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
19
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
20
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले

वायफड परिसरात चार तास कोसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:00 IST

गुरुवारी वायफड परिसराला तब्बल चार तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले. नाल्यांना पूर आला. दरम्यान वायफड ते लोणसावळी मार्गावरील घोडमारे व चरडे यांच्या शेताजवळ पुलाशेजारी सिमेंट पायल्या टाकून रस्ता तयार करण्यात आला होता. मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आल्याने रस्ता पूर्णत: वाहून गेला.

ठळक मुद्देरस्ता गेला वाहून : परिसरातील दहा गावांचा संपर्क तुटला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वायफड परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता पूर्णत: वाहून गेला. परिणामी, शेतकऱ्यांची वहिवाट ठप्प झाली असून परिसरातील दहावर गावांचा संपर्क तुटला. अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.गुरुवारी वायफड परिसराला तब्बल चार तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले. नाल्यांना पूर आला. दरम्यान वायफड ते लोणसावळी मार्गावरील घोडमारे व चरडे यांच्या शेताजवळ पुलाशेजारी सिमेंट पायल्या टाकून रस्ता तयार करण्यात आला होता. मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आल्याने रस्ता पूर्णत: वाहून गेला. सध्या खरीप हंगाम सुरू आहे. बहुतांश शेतकऱ्यांची पेरणी कामे आटोपली असून सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिके बहरली आहेत. अनेक ठिकाणी निंदण आणि डवरणीही सुरू आहे. पावसामुळे रस्ताच वाहून गेल्याने वायफड ते लोणसावळी शिवारातील शंभरावर शेतकऱ्यांच्या शेतीकामात ऐन हंगामात अडथळा निर्माण झाला आहे. वायफड शिवारात शेती असलेल्या शेतकऱ्यांना डोरली, लोणसावळी असा १० किलोमीटरचा फेरी घेऊन शेतीकामे करावी लागत आहेत. यात शेतीसाहित्य नेताना तारेवरचीकसरत करावी लागत आहे. रस्त्याअभावी वायफड, लोणसावळी, शेकापूर, आंजी, मांडवा आदी गावांतील शेतकरी नागरिकांच्या आवागमनाचा प्रश्न निर्माण झाला असून संपर्क तुटला आहे. शासकीय यंत्रणेने रस्ता आणि पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.रस्त्याची मागणी धूळखातया रस्त्यासह पुलाचे बांधकाम करण्याबाबत मार्च महिन्यातच शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे मागणी केली होती. तसा प्रस्तावही तयार करून प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता. मात्र, याकडे शासकीय यंत्रणेकडून कानाडोळाच करण्यात आला. शासकीय दिरंगाईचा ऐन हंगामात रस्त्याअभावी शेतीकामांना फटका बसला आहे.शेतपिकांचे होतेय नुकसानवायफड-लोणसावळी मार्गाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत डांबरीकरण करण्यात आले. मात्र, बांधकामावेळी रस्त्याच्या दुतर्फा नाल्यांचे बांधकाम करण्यात आले नाही. यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्गच नसून पाणी थेट शेतात शिरत पिकांचे नुकसान होते, अशी माहिती शशांक घोडमारे यांनी दिली.

टॅग्स :Rainपाऊस