लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील लोअर वर्धा हे धरण या वर्षी १०० टक्के भरल्याने देऊरवाडा, इठलापूर व राजापूर गावातील शेतकऱ्यांची सुमारे १०० एकर शेती धरणाच्या वाढलेल्या पाणीपातळीने पडीत राहण्याची वेळ आली आहे. परिसरातील देऊरवाडा, इठलापूर व राजापूर या तीनही गावातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती ही देऊरवाडा मौजात येते त्याना शेतीच्या वहीवाटीसाठी इठलापूर पांधन रस्ता उपलब्ध होता पण धरण पूर्ण भरल्याने आलेल्या बँकवाटरमुळे या शेतकऱ्यांना शेतात जाण्यास मार्ग उरलेला नाही . त्यामुळे आतापर्यंत उभे केलेले पीक पडीक पडते की काय अशी भीती या शेतकऱ्यांना वाटत आहे. या रस्त्यावर खराडीचा नाला येत असून या नाल्यात धरणाचे बॅकवॉटर आल्याने तेथून काही शेतकरी जीव मुठीत घेवून शेताचा रस्ता ओलांडताना दिसून येतात. या भागात बॅक वाटर राहण्याची शक्यता असल्यामुळे या शेतकऱ्यांनी पर्यायी रस्त्याची मागणी ही प्रशासनाकडे केली होती पण प्रशासनाने यावर कोणतीच कार्यवाही केलेली नाही त्यामुळे अल्प भूधारक शेतकऱ्यांची जमीन पडीक राहिल्यास त्याच्यांवर आर्थिक संकट कोसळणार आहे. जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभाग लोअर वर्धा धरण यंत्रणेने पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून द्यावी ही मागणी बाधीत शेतकºयांकडून होत आहे. यंदा आर्वी तालुक्यातील अनेक धरण भरले आहेत.धरण हाऊसफुल्लआर्वी तालुक्यात असलेले सर्वच धरण यावर्षी हाऊसफुल्ल झाले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून कोरडे असणारे धरण भरल्याने शेतकरी आनंदी आहे. या पाण्याचा रब्बी हंगामासाठी उपयोग होणार असला तरी लोअर वर्धा धरणाच्या पाण्यामुळे तीन गावातील शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. यावर उपाययोजना न झाल्यास शेतकºयांना शेती सोडावी लागेल.माझी लोअर वर्धा धरणात ७ एकर शेती गेल्यामुळे माझी परिस्थिती ही फार हलाखीची आहे,माझ्याकडे फार थोडी शेती शिल्लक आहे. आणि आता त्या शेतीच्या वहिवाटीसाठी ही रस्ता नसल्याने ती शेती कशी कसावी असा प्रश्न मला व माझ्या कुटुंबाला पडलेला आहे. आमच्या उदरनिवार्हाचे साधन हे उर्वरित शेती हेच आहे. त्यामुळे शेतकºयांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा किंवा उर्वरित शेती ही शासनाने अधिग्रहित करून त्याचा मोबदला द्यावा.- अरविंद दे. कदम, धरणग्रस्त व रस्ताबाधीत शेतकरी.
लोअर वर्धा धरणाचा ३० शेतकऱ्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 06:00 IST
आर्वी तालुक्यात असलेले सर्वच धरण यावर्षी हाऊसफुल्ल झाले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून कोरडे असणारे धरण भरल्याने शेतकरी आनंदी आहे. या पाण्याचा रब्बी हंगामासाठी उपयोग होणार असला तरी लोअर वर्धा धरणाच्या पाण्यामुळे तीन गावातील शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.
लोअर वर्धा धरणाचा ३० शेतकऱ्यांना फटका
ठळक मुद्देतीन गावातील शेतकरी चिंतेत : १०० एकर शेती प्रभावित