शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

जिल्ह्यात तीन अपघातात चार जणांचा मृत्यू

By admin | Updated: February 20, 2016 02:58 IST

जिल्ह्यात शुक्रवार अपघात वारच ठरला. यात हिंगणघाट तालुक्यात झालेल्या दोन अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर देवळी येथील ....

दोघे गंभीर : देवळीतील एक तर हिंगणघाट येथील दोन अपघात वर्धा : जिल्ह्यात शुक्रवार अपघात वारच ठरला. यात हिंगणघाट तालुक्यात झालेल्या दोन अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर देवळी येथील अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पती ठार, पत्नी व मुलगी गंभीरदेवळी : भरधाव ट्रॅव्हल्सने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकी चालक जागीच ठार झाला, तर मागे बसलेली त्याची पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास रत्नापूर शिवारात घडली. अमर हरिभाऊ खैरकार (४५) रा. सरपधरी ता. कळंब जि. यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे. शीला खैरकार (३५) आणि साची खैरकार (६) अशी जखमींची नावे आहे. पोलीस सुत्रानुसार, संतोष खैरकार हे एमएच २९ एबी ७६६५ या दुचाकीने पत्नी व मुलीसह वर्धा येथे लग्न कार्यासाठी येत होते. दरम्यान, रत्नापूर शिवारात वर्धेवरून यवतमाळकडे एमएच २९ एम ८१७८ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात अमर यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी शीला व मुलगी या दोघी जखमी झाल्या. त्यांना सावंगी रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालक संतोष मिश्रा याला ताब्यात घेतले आहे. कार अपघातात एक ठार हिंगणघाट - येथील राष्ट्रीय महामार्गावरील आजंती शिवारात चिचघाट फाट्याजवळ नागपूर कडून येणारी मारोती कार रस्ता विभाजकार आदळली. या अपघातात कारचालक लोभेश शैलेश पटेलिया (१७) रा. संत चोखोबा वॉर्ड याचा जागीच मृत्यू झाला.प्राप्त माहितीनुसार, घरी रात्री झोपून असलेला लोभेश घरून केव्हा कार धेवून गेला याची माहिती आई वडिलांना नाही. लोभेश हा अकराच्या वर्गाचा विद्यार्थी होता. या अपघाताची माहिती पोलिसांना पहाटे ५.३० वाजता माहिती मिळाली. या प्रकरणाची पोलिसांनी नोंद केली असून पोलीस जमादार हवालदार अन्ना दुर्गे व शिपाई अनिल नक्षीणे तपास करीत आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन ठारहिंगणघाट - राळेगाव येथून निधा टाकळीकडे जाणाऱ्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव अनोळखी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले. हा अपघात गुरूवारी रात्री कापसी ते सिरसगाव मार्गावर घडला. संजय रामदास तुळसकर (२७) रा निधा(टाकळी), निलेश विनोद मुते (३२) रा. इंझाळा अशी मृतकांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय तुळसकर आणि निलेश मुते हे दोघेही एम.एच. ४० सी ६९७१ या दुचाकीने राळेगाव येथून निधा (टाकळी)कडे जात होते. दरम्यान मागावून येणाऱ्या भरधाव वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले. अपघात इतका भीषण होता की, दुचाकी काही अंतरापर्यंत फरफटत गेली. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक काही वेळ ठप्प होती. याची माहिती अल्लीपूर पोलिसांना मिळताच ठाणेदार भानुदास पिदूरकर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत केली.