शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तीन अपघातात चार जणांचा मृत्यू

By admin | Updated: February 20, 2016 02:58 IST

जिल्ह्यात शुक्रवार अपघात वारच ठरला. यात हिंगणघाट तालुक्यात झालेल्या दोन अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर देवळी येथील ....

दोघे गंभीर : देवळीतील एक तर हिंगणघाट येथील दोन अपघात वर्धा : जिल्ह्यात शुक्रवार अपघात वारच ठरला. यात हिंगणघाट तालुक्यात झालेल्या दोन अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर देवळी येथील अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पती ठार, पत्नी व मुलगी गंभीरदेवळी : भरधाव ट्रॅव्हल्सने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकी चालक जागीच ठार झाला, तर मागे बसलेली त्याची पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास रत्नापूर शिवारात घडली. अमर हरिभाऊ खैरकार (४५) रा. सरपधरी ता. कळंब जि. यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे. शीला खैरकार (३५) आणि साची खैरकार (६) अशी जखमींची नावे आहे. पोलीस सुत्रानुसार, संतोष खैरकार हे एमएच २९ एबी ७६६५ या दुचाकीने पत्नी व मुलीसह वर्धा येथे लग्न कार्यासाठी येत होते. दरम्यान, रत्नापूर शिवारात वर्धेवरून यवतमाळकडे एमएच २९ एम ८१७८ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात अमर यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी शीला व मुलगी या दोघी जखमी झाल्या. त्यांना सावंगी रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालक संतोष मिश्रा याला ताब्यात घेतले आहे. कार अपघातात एक ठार हिंगणघाट - येथील राष्ट्रीय महामार्गावरील आजंती शिवारात चिचघाट फाट्याजवळ नागपूर कडून येणारी मारोती कार रस्ता विभाजकार आदळली. या अपघातात कारचालक लोभेश शैलेश पटेलिया (१७) रा. संत चोखोबा वॉर्ड याचा जागीच मृत्यू झाला.प्राप्त माहितीनुसार, घरी रात्री झोपून असलेला लोभेश घरून केव्हा कार धेवून गेला याची माहिती आई वडिलांना नाही. लोभेश हा अकराच्या वर्गाचा विद्यार्थी होता. या अपघाताची माहिती पोलिसांना पहाटे ५.३० वाजता माहिती मिळाली. या प्रकरणाची पोलिसांनी नोंद केली असून पोलीस जमादार हवालदार अन्ना दुर्गे व शिपाई अनिल नक्षीणे तपास करीत आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन ठारहिंगणघाट - राळेगाव येथून निधा टाकळीकडे जाणाऱ्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव अनोळखी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले. हा अपघात गुरूवारी रात्री कापसी ते सिरसगाव मार्गावर घडला. संजय रामदास तुळसकर (२७) रा निधा(टाकळी), निलेश विनोद मुते (३२) रा. इंझाळा अशी मृतकांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय तुळसकर आणि निलेश मुते हे दोघेही एम.एच. ४० सी ६९७१ या दुचाकीने राळेगाव येथून निधा (टाकळी)कडे जात होते. दरम्यान मागावून येणाऱ्या भरधाव वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले. अपघात इतका भीषण होता की, दुचाकी काही अंतरापर्यंत फरफटत गेली. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक काही वेळ ठप्प होती. याची माहिती अल्लीपूर पोलिसांना मिळताच ठाणेदार भानुदास पिदूरकर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत केली.