शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्तांसाठी चार कोटी

By admin | Updated: June 4, 2015 01:50 IST

यंदा फेब्रुवारी व मार्च महिन्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

आशुतोष सलील : खरिपातील बाधित शेतकऱ्यांना ८८ कोटींचे वाटप, वंचितांनाही मदतवर्धा : यंदा फेब्रुवारी व मार्च महिन्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून ४ कोटी ७ लाख ७७ हजार २५० रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. पैकी १ कोटी ६९ लाख २६ हजार रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे, उर्वरित निधीचे वाटप सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी पत्रकार परिषदेत दिली.खरीप हंगाम २०१४ मधील बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाकडून १०७ कोटी ५३ लाख रुपये अनुदानाच्या रूपात जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले होते. सदर अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करायचे होते. ज्यांचे खाते उपलब्ध झाले अशा शेतकऱ्यांना ८८ कोटी ५९ लाख ८६ हजार ७८१ रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले. मात्र काही शेतकऱ्यांचे बँक खाते प्राप्त न झाल्यामुळे १८ कोटी ४८ लाख ८३ हजार ४११ रुपयांचा निधी शासनाला समर्पित करण्यात आला. यात काही शेतकरी या मदतीपासून वंचित राहिल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली. वंचित शेतकऱ्यांची माहिती घेतली असता पुन्हा ७ कोटी ३८ लाख २४ हजार ५२४ रुपयांची गरज जिल्हा प्रशासनाला आहे. या निधीच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. हा निधी उपलब्ध होताच उर्वरित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी सलील यांनी यावेळी दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)प्रशासनात सुसूत्रता आणणारजिल्हाधिकारी पदाचा प्रभार घेऊन जेमतेम दोन दिवस झाल्यामुळे जिल्ह्याची संपूर्ण माहिती घेणे सुरू आहे. प्रशासनात सुसुत्रतता आणण्याचा पूरेपूर प्रयत्न असेल.‘जलयुक्त शिवार’वर स्वत: नियंत्रण ठेवणारजलयुक्त शिवार अभियानाची कामे ३० जूनपर्यंत पूर्णत्वास न्यावयाची आहे. या अनुषंगाने काही अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी देण्यात आली असून त्यावर नियंत्रण स्वत: ठेवणार आहे.शेतकऱ्यांना कर्ज वाटपाची गती वाढवणारचालू महिन्यापर्यंत जिल्ह्यातील ३० ते ३२ टक्केच शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप झालेले आहेत. ते ५० टक्क्यांवर असणे अपेक्षित होते. यापुढे पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यात येईल. तसेच कर्ज वाटपाची गती वाढविण्यात येईल, अशी ग्वाहीही जिल्हाधिकारी सलील यांनी यावेळी दिली.