शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्तांसाठी चार कोटी

By admin | Updated: June 4, 2015 01:50 IST

यंदा फेब्रुवारी व मार्च महिन्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

आशुतोष सलील : खरिपातील बाधित शेतकऱ्यांना ८८ कोटींचे वाटप, वंचितांनाही मदतवर्धा : यंदा फेब्रुवारी व मार्च महिन्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून ४ कोटी ७ लाख ७७ हजार २५० रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. पैकी १ कोटी ६९ लाख २६ हजार रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे, उर्वरित निधीचे वाटप सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी पत्रकार परिषदेत दिली.खरीप हंगाम २०१४ मधील बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाकडून १०७ कोटी ५३ लाख रुपये अनुदानाच्या रूपात जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले होते. सदर अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करायचे होते. ज्यांचे खाते उपलब्ध झाले अशा शेतकऱ्यांना ८८ कोटी ५९ लाख ८६ हजार ७८१ रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले. मात्र काही शेतकऱ्यांचे बँक खाते प्राप्त न झाल्यामुळे १८ कोटी ४८ लाख ८३ हजार ४११ रुपयांचा निधी शासनाला समर्पित करण्यात आला. यात काही शेतकरी या मदतीपासून वंचित राहिल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली. वंचित शेतकऱ्यांची माहिती घेतली असता पुन्हा ७ कोटी ३८ लाख २४ हजार ५२४ रुपयांची गरज जिल्हा प्रशासनाला आहे. या निधीच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. हा निधी उपलब्ध होताच उर्वरित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी सलील यांनी यावेळी दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)प्रशासनात सुसूत्रता आणणारजिल्हाधिकारी पदाचा प्रभार घेऊन जेमतेम दोन दिवस झाल्यामुळे जिल्ह्याची संपूर्ण माहिती घेणे सुरू आहे. प्रशासनात सुसुत्रतता आणण्याचा पूरेपूर प्रयत्न असेल.‘जलयुक्त शिवार’वर स्वत: नियंत्रण ठेवणारजलयुक्त शिवार अभियानाची कामे ३० जूनपर्यंत पूर्णत्वास न्यावयाची आहे. या अनुषंगाने काही अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी देण्यात आली असून त्यावर नियंत्रण स्वत: ठेवणार आहे.शेतकऱ्यांना कर्ज वाटपाची गती वाढवणारचालू महिन्यापर्यंत जिल्ह्यातील ३० ते ३२ टक्केच शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप झालेले आहेत. ते ५० टक्क्यांवर असणे अपेक्षित होते. यापुढे पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यात येईल. तसेच कर्ज वाटपाची गती वाढविण्यात येईल, अशी ग्वाहीही जिल्हाधिकारी सलील यांनी यावेळी दिली.