शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्तांसाठी चार कोटी

By admin | Updated: June 4, 2015 01:50 IST

यंदा फेब्रुवारी व मार्च महिन्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

आशुतोष सलील : खरिपातील बाधित शेतकऱ्यांना ८८ कोटींचे वाटप, वंचितांनाही मदतवर्धा : यंदा फेब्रुवारी व मार्च महिन्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून ४ कोटी ७ लाख ७७ हजार २५० रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. पैकी १ कोटी ६९ लाख २६ हजार रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे, उर्वरित निधीचे वाटप सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी पत्रकार परिषदेत दिली.खरीप हंगाम २०१४ मधील बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाकडून १०७ कोटी ५३ लाख रुपये अनुदानाच्या रूपात जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले होते. सदर अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करायचे होते. ज्यांचे खाते उपलब्ध झाले अशा शेतकऱ्यांना ८८ कोटी ५९ लाख ८६ हजार ७८१ रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले. मात्र काही शेतकऱ्यांचे बँक खाते प्राप्त न झाल्यामुळे १८ कोटी ४८ लाख ८३ हजार ४११ रुपयांचा निधी शासनाला समर्पित करण्यात आला. यात काही शेतकरी या मदतीपासून वंचित राहिल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली. वंचित शेतकऱ्यांची माहिती घेतली असता पुन्हा ७ कोटी ३८ लाख २४ हजार ५२४ रुपयांची गरज जिल्हा प्रशासनाला आहे. या निधीच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. हा निधी उपलब्ध होताच उर्वरित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी सलील यांनी यावेळी दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)प्रशासनात सुसूत्रता आणणारजिल्हाधिकारी पदाचा प्रभार घेऊन जेमतेम दोन दिवस झाल्यामुळे जिल्ह्याची संपूर्ण माहिती घेणे सुरू आहे. प्रशासनात सुसुत्रतता आणण्याचा पूरेपूर प्रयत्न असेल.‘जलयुक्त शिवार’वर स्वत: नियंत्रण ठेवणारजलयुक्त शिवार अभियानाची कामे ३० जूनपर्यंत पूर्णत्वास न्यावयाची आहे. या अनुषंगाने काही अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी देण्यात आली असून त्यावर नियंत्रण स्वत: ठेवणार आहे.शेतकऱ्यांना कर्ज वाटपाची गती वाढवणारचालू महिन्यापर्यंत जिल्ह्यातील ३० ते ३२ टक्केच शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप झालेले आहेत. ते ५० टक्क्यांवर असणे अपेक्षित होते. यापुढे पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यात येईल. तसेच कर्ज वाटपाची गती वाढविण्यात येईल, अशी ग्वाहीही जिल्हाधिकारी सलील यांनी यावेळी दिली.