शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
3
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
4
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
5
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
6
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
7
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
8
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
9
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
10
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
12
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
13
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
14
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
16
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
17
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
18
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
19
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
20
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा

चार अंध मित्रांंची: ही दोस्ती तुटायची नाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 23:55 IST

मित्र म्हटले की दुनियादारीच वेगळी असते. त्यातही चार मित्र एकत्र आल्यावर कोणतेही आवाहन पेलण्याचे बळ मिळते.असाच काहीसा प्रसंग वर्ध्यातील मुख्य मार्गावर अनेकांनी अनुभवला. या रहदारीच्या मार्गावरुन चार अंध मित्र एकामेंकाचा हात पकडून झपाझप पुढे चालत होते.

ठळक मुद्देहातात हात धरुन रस्त्याने मार्गक्रमण : अनेकांनी अनुभवली त्यांची डोळसांसारखी ‘वाट’चाल

गौरव देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मित्र म्हटले की दुनियादारीच वेगळी असते. त्यातही चार मित्र एकत्र आल्यावर कोणतेही आवाहन पेलण्याचे बळ मिळते.असाच काहीसा प्रसंग वर्ध्यातील मुख्य मार्गावर अनेकांनी अनुभवला. या रहदारीच्या मार्गावरुन चार अंध मित्र एकामेंकाचा हात पकडून झपाझप पुढे चालत होते. डोळसांनाही लाजवेल अशी त्यांनी ही ‘वाट’ चाल ‘ही दोस्ती तुटायची नाय’ या गाण्यांची आठवण करुन देणारी ठरली.मिलिंद मोतेवार (४२), प्रकाश बावरी (४२) व मोहन कुलकर्णी तिघेही राहणार आर्वी व प्रशांत देऊळकर (३२) रा.वर्धमनेरी असे हे चौघेही अंध मित्र काही कामानिमित्त वर्ध्यात आले. यातील मिलिंद हे सामाजिक संस्थेत कार्यरत आहे. प्रकाश बावरी व मोहन कुलकर्णी स्वत:चा व्यवसाय करतात. तर प्रशांत देऊळकर हे वर्ध्यातील अंध विद्यालयात शिक्षक आहे. शहरातील आरती चौकातून हे चौघेही झपाझप पाऊल टाकत बसस्थानकाकडे निघाले. तसा वर्दळीचा हा रस्ता असला तरिही ते चौघेही आपल्याच दुनियेत एकामेकांच्या हातात हात देऊन गोष्टीगप्पा करीत चालू लागले.विशेषत: वाहतुकीच्या नियमानुसार डाव्याबाजुनीच मार्गक्रमण करीत असतांना त्यांच्यातील डोळसपणाच जाणवला. परतु, त्यांच्या हातातल्या बंद स्टीक त्यांचे वास्तव सांगून गेल्या. या चौघानाही एकमेकांचा चेहरा माहिती नाही. मात्र, मनामध्ये असलेला मैत्रीचा धागा एकमेकांच्या हातातील स्पर्शाने इतका गुंतून गेला होता; की त्यांच्या मैत्रीचे अनेकांना कौतूक वाटलं. पण त्याच हेच वागणं नि:स्वार्थ मैत्रिची साक्ष देऊन गेलं, असं म्हटल्यास वावगे ठरू नये.