शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

चार अंध मित्रांंची: ही दोस्ती तुटायची नाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 23:55 IST

मित्र म्हटले की दुनियादारीच वेगळी असते. त्यातही चार मित्र एकत्र आल्यावर कोणतेही आवाहन पेलण्याचे बळ मिळते.असाच काहीसा प्रसंग वर्ध्यातील मुख्य मार्गावर अनेकांनी अनुभवला. या रहदारीच्या मार्गावरुन चार अंध मित्र एकामेंकाचा हात पकडून झपाझप पुढे चालत होते.

ठळक मुद्देहातात हात धरुन रस्त्याने मार्गक्रमण : अनेकांनी अनुभवली त्यांची डोळसांसारखी ‘वाट’चाल

गौरव देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मित्र म्हटले की दुनियादारीच वेगळी असते. त्यातही चार मित्र एकत्र आल्यावर कोणतेही आवाहन पेलण्याचे बळ मिळते.असाच काहीसा प्रसंग वर्ध्यातील मुख्य मार्गावर अनेकांनी अनुभवला. या रहदारीच्या मार्गावरुन चार अंध मित्र एकामेंकाचा हात पकडून झपाझप पुढे चालत होते. डोळसांनाही लाजवेल अशी त्यांनी ही ‘वाट’ चाल ‘ही दोस्ती तुटायची नाय’ या गाण्यांची आठवण करुन देणारी ठरली.मिलिंद मोतेवार (४२), प्रकाश बावरी (४२) व मोहन कुलकर्णी तिघेही राहणार आर्वी व प्रशांत देऊळकर (३२) रा.वर्धमनेरी असे हे चौघेही अंध मित्र काही कामानिमित्त वर्ध्यात आले. यातील मिलिंद हे सामाजिक संस्थेत कार्यरत आहे. प्रकाश बावरी व मोहन कुलकर्णी स्वत:चा व्यवसाय करतात. तर प्रशांत देऊळकर हे वर्ध्यातील अंध विद्यालयात शिक्षक आहे. शहरातील आरती चौकातून हे चौघेही झपाझप पाऊल टाकत बसस्थानकाकडे निघाले. तसा वर्दळीचा हा रस्ता असला तरिही ते चौघेही आपल्याच दुनियेत एकामेकांच्या हातात हात देऊन गोष्टीगप्पा करीत चालू लागले.विशेषत: वाहतुकीच्या नियमानुसार डाव्याबाजुनीच मार्गक्रमण करीत असतांना त्यांच्यातील डोळसपणाच जाणवला. परतु, त्यांच्या हातातल्या बंद स्टीक त्यांचे वास्तव सांगून गेल्या. या चौघानाही एकमेकांचा चेहरा माहिती नाही. मात्र, मनामध्ये असलेला मैत्रीचा धागा एकमेकांच्या हातातील स्पर्शाने इतका गुंतून गेला होता; की त्यांच्या मैत्रीचे अनेकांना कौतूक वाटलं. पण त्याच हेच वागणं नि:स्वार्थ मैत्रिची साक्ष देऊन गेलं, असं म्हटल्यास वावगे ठरू नये.