शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीत २४ तास वीज देण्याचा विसर

By admin | Updated: November 4, 2016 01:48 IST

गणपती व नवरात्रोत्सवात २४ तास विद्युत देण्यात आली. परंतु, ऐन दिवाळीतच वेळी अवेळी

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना फटकारोहणा : गणपती व नवरात्रोत्सवात २४ तास विद्युत देण्यात आली. परंतु, ऐन दिवाळीतच वेळी अवेळी विद्युत पुरवठा खंडीत केल्या जात असल्याने गावकऱ्यांसह शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागत आहे. सदर प्रकारामुळे महावितरण कंपनीबाबत शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होत आहे. याकडे संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत दिवाळीच्या दिवसात २४ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. सविस्तर वृत्त असे की, दरवर्षी विद्युत वितरण कंपनीच्या वतीने गणपती, नवरात्र व दिवाळी या उत्सवाच्यावेळी २४ तास विद्युत देऊन उत्सव भेटच दिली जात होती. सदर सुविधा रबी हंगामाची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत होती. वेळीच विद्युत पुरवठा सुरळीत राहत असल्याने शेतकऱ्यांनाही ओलीताची कामे पूर्ण करता येत होती. मात्र, सध्या कधी दिवसाला तर कधी रात्रीला विद्युत पुरवठा खंडीत केल्या जात आहे. त्यामुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणित वाढ झाली आहे. यावर्षीच्या दिवाळी पर्वावर नियमित विद्युत पुरवठा महावितरण कंपनी करेल ही शेतकऱ्यांना आशा होती. तूर व कपाशीच्या पिकाला पाण्याची गरज असतानाच विद्युत पुरवठा खंडित केल्या जात आहे. वेळीच पाणी न मिळाल्यास उत्पादनात घट येईल, असे शेतकरी सांगतात. यंदा सुरूवातीला निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागला. व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होत असलेल्याची ओरड असतानाच आता महाविरणही विद्युत पुरवठा खंडीत करून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. विद्युत पुरवठा नसल्याचा सर्वाधिक त्रास लहान मुलं व वृद्धांना सहन करावा लागत असून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)