शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
3
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
4
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
5
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
6
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
7
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
8
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
10
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
11
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
12
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
13
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
14
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
15
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
16
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
18
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
20
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...

वनविभागात नुकसान भरपाईची ३,१९९ प्रकरणे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

मागील पाच महिन्यांपासून नुकसान भरपाईपोटीचा निधीच उपलब्ध न करून दिल्याने शासकीय मदतीसाठी पात्र ठरलेली तब्बल ३,१९९ प्रकरणे सध्या रखडली आहेत. शासनाकडून निधी मिळावा म्हणून उपवनसंरक्षक कार्यालयाच्यावतीने आतापर्यंत दोन वेळा वरिष्ठांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. लवकरच शासकीय मदत मिळेल अशी आशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आहे.

ठळक मुद्देवरिष्ठांना पत्रव्यवहार : पाच महिन्यांपासून छदामही मिळाला नाही

महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वन्यप्राण्यांकडून उभ्या पिकांचे नुकसान व मनुष्याला जखमी अथवा ठार केल्यावर वनविभागाकडून नुकसानग्रस्तांसह त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत दिली जाते. परंतु, मागील पाच महिन्यांपासून नुकसान भरपाईपोटीचा निधीच उपलब्ध न करून दिल्याने शासकीय मदतीसाठी पात्र ठरलेली तब्बल ३,१९९ प्रकरणे सध्या रखडली आहेत. शासनाकडून निधी मिळावा म्हणून उपवनसंरक्षक कार्यालयाच्यावतीने आतापर्यंत दोन वेळा वरिष्ठांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. लवकरच शासकीय मदत मिळेल अशी आशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आहे.प्राप्त माहितीनुसार, जानेवारी २०२० ते मे अखेरपर्यंत वन्यप्राण्यांनी उभ्या पिकांचे नुकसान केल्याची एकूण ३ हजार ३४ प्रकरणे वनविभागाला प्राप्त झाले. चौकशीअंती ही संपूर्ण प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरली. ही प्रकरणे निकाली काढत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीपोटी आर्थिक मदत देण्यासाठी १ कोटी ५१ लाख १६ हजार १३३ रुपयांची गरज आहे. परंतु, मागील पाच महिन्यांपासून वर्धा उपवनसंरक्षक कार्यालयाला शासनाकडून निधीच न मिळाल्याने शासकीय मदत वितरीत करण्यासाठी वर्ध्याचा वनविभाग सध्या हतबल झाला आहे. तर मागील पाच महिन्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य जखमी झाल्याची १७ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. या जखमींना एकूण १० लाख ८९ हजार ८८९ रुपयांची शासकीय मदत देण्याचेही निश्चित करण्यात आले आहे. मात्र, निधीच न मिळाल्याने हेही काम रखडले आहे. लवकरच शासनाकडून नुकसान भरपाईपोटीचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त येईल, अशी अपेक्षा वनविभागाला आहे.पशुपालकांच्या अडचणीत भरवन्यप्राण्यांनी पाळीव जनावरांना ठार केल्याची १४८ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली आहे. या प्रकरणांचा अंतिम निपटारा करण्यासाठी सदर पशुपालकांच्या बँक खात्यात झालेल्या नुकसानीपोटी १३ लाख २३ हजार ५६४ रुपये वळते करणे क्रमप्राप्त आहे. परंतु, निधीच नसल्याने शासकीय मदत त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नसल्याने नुकसानग्रस्त पशुपालकांच्या अडचणीत भर पडली आहे.मागील पाच महिन्यांपासून निधी न मिळाल्याने शासकीय मदतीसाठी पात्र ठरलेल्या नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम वळती करण्यात आलेली नाही. निधी मिळावा म्हणून संबंधितांकडे दोन वेळा पत्रव्यवहार करण्यात आले आहे. शासनाकडून लवकरच निधी मिळेल, त्यानंतर नुकसानग्रस्तांना निधीचे वितरण करण्यात येईल.- तुषार दमडेरे, सहाय्यक वनसंरक्षक, वर्धा.

टॅग्स :forest departmentवनविभाग