शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

अन्नधान्य योजनेचा जिल्ह्यात शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2015 02:18 IST

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने प्रती व्यक्ती पाच किलो अन्नधान्याचा पुरवठा करण्याच्या महत्वपूर्ण योजनेचा शुभारंभ ...

पवनार येथे कार्यक्रम : जिल्ह्यातील ५१ हजार ५३७ शेतकऱ्यांना लाभवर्धा : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने प्रती व्यक्ती पाच किलो अन्नधान्याचा पुरवठा करण्याच्या महत्वपूर्ण योजनेचा शुभारंभ पवनार येथे शनिवारी झाला. मातोश्री बहुउद्देशिय सहकारी स्वसत धान्य दुकानातून पवनार येथील शेतकरी श्यामराव इखार यांना सवलतीच्या दरातील गहू दोन रुपये व तांदूळ तीन रुपये किलो दराने देण्यात आले. या योजनेच्या पहिल्या लाभार्थ्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले.पवनार येथील मातोश्री बहुउद्देशिय सहकारी स्वस्त धान्य दुकानाच्या परिसरात आयोजित शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्य वितरणाच्या योजनेचा शुभारंभ खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, सरपंच राजेश्वर गांडोळे, उपसरपंच जगदीश पेटकर, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई यांच्या उपस्थितीत झाला.केशरी, एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर ही योजना असून जिह्यातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या तालुका व स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध आहेत. या योजनेच्या लाभापासून जे शेतकरी अद्याप वंचित आहेत त्यांनी तत्काळ आपली नावे संबंधीत तहसीलदारांकडे द्यावीत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले. या योजनेपासून कुणीही लाभार्थी शेतकरी वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात.खासदार तडस म्हणाले की, शेतकऱ्यांनी आर्थिक सक्षम होण्यासाठी शेतीबरोबरच जोडधंदा करावा. शेतकऱ्यांसाठी शासन अनेक योजना राबवित आहेत. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. तसेच पर्यटन विकासासाठी सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून पवनार व सेवाग्रामचा विकास करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.आमदार डॉ. भोयर यांनी सततची नापिकी, अवेळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना शासनाने शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने प्रति व्यक्ती गहू व तांदुळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय उपलब्ध करून दिला आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व प्रत्येक गावापर्यंत पोहोचावी, अशी अपेक्षा व्यक्त करतात शेतकऱ्यांना जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून सरंक्षित सिंचन व विजेचा प्रश्नही सोडविण्यात आला आहे. पवनार येथील विकासासोबतच पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगिन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी लाभार्थी शेतकरी दिवाकर बोकडे, शंकर साटोने, अंबादास वाटमोडे, शंकर हिंगणकर, बापूराव बोरकर, विनोद बोरकर, कवडूजी बालपांडे यांना सवलतीच्या दरात गहू व तांदुळ वितरीत करण्यात आले.(प्रतिनिधी)