शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
4
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
5
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
6
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
7
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
8
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
9
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
10
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
11
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
12
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
13
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
14
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
15
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
16
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
17
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
18
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
19
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
20
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला

शेतकऱ्यांसह कष्टकऱ्यांच्या मागण्यांसाठी अन्नत्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:27 IST

शेतकरी, कष्टकरी तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारच्या पं.स. सदस्या अरुणा सावरकर, प्रहारचे देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख राजेश सावरकर व रसुलाबाद पं.स. सर्कलमधील काही सुजान नागरिकांनी सोमवार १९ नोव्हेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देप्रहारचे आंदोलन : आर्वी पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शेतकरी, कष्टकरी तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारच्या पं.स. सदस्या अरुणा सावरकर, प्रहारचे देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख राजेश सावरकर व रसुलाबाद पं.स. सर्कलमधील काही सुजान नागरिकांनी सोमवार १९ नोव्हेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सदर मागण्या निकाली निघाव्या यासाठी संबंधितांना वेळोवेळी निवेदन देऊनही दुर्लक्ष करण्यात आल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीच्या निषेधार्थ हे आंदोलन आर्वी पं.स. कार्यालयासमोर डेरा टाकून सुरू करण्यात आले आहे.आर्वी पं.स.तील रसुलाबाद सर्कल मधील चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून पं.स. सदस्य अरुणा सावरकर यांनी यापूर्वी पं.स. सभागृहात सदर विषय मांडले. इतकेच नव्हे तर संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून सदर समस्या निकाली काढण्याची विनंती केली. परंतु, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या निवेदनांना केराची टोपलीच दाखविल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांचा आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीत धोरणांचा निषेध करण्यासाठी तसेच तालुका प्रशासनाचे सदर मागण्यांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात पं.स. सदस्य अरुणा सावरकर, राजेश सावरकर यांच्या नेतृत्त्वात अजय भोयर, बिट्टू रावेकर व ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.आंदोलनकर्त्यांच्या मागण्यारोजगार हमी योजनेतील अनुदानाचे तात्काळ वाटप करण्यात यावे.रसुलाबाद येथील राजीव गांधी भवनचे काम मागील १० वर्षांपासून रखडले असून त्याला तात्काळ गती देण्यात यावी.घरकुल मधील सावळ्या गोंधळाचा त्रास गरजुंना होत असून तो दूर करण्यासाठी योग्य पाऊल उचलावेत.दिव्यांगांच्या वाट्याचा ३ टक्के निधी जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी खर्च केला नसून त्यांना तो खर्च करण्यासाठी लेखी सूचना देण्यात याव्या. दिव्यांगांना घरकुल योजनेचा लाभ प्राधान्य क्रमाने देण्यात यावा.कवठा मार्गाची दैनावस्था झाली असून या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात यावे. बाºहा हे गाव आदिवासी बहूल असून या गावात प्राथमिक सोयी-सूविधांचा अभाव आहे. या कावाचा विकास करण्यात यावा. कुठलाही गरजू शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून तालुक्यात सर्वेक्षण करण्यात यावे. मनमर्जीने काम करणाऱ्या टेंभरी येथील अंगणवाडी सेविकेवर चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी.