शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

निम्नवर्धा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2015 02:16 IST

निम्न वर्धा प्रकल्प पूर्ण करताना प्रत्यक्ष ६६ हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करणे हे मूळ उद्दिष्ट आहे. येत्या तीन वर्षात कालबद्ध कार्यक्रमानुसार हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल.

देवेंद्र फडणवीस : ६६ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणारवर्धा : निम्न वर्धा प्रकल्प पूर्ण करताना प्रत्यक्ष ६६ हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करणे हे मूळ उद्दिष्ट आहे. येत्या तीन वर्षात कालबद्ध कार्यक्रमानुसार हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. पुनर्वसनासह प्रकल्पाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा सिंचन प्रकल्पाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देवून प्रकल्पासंदर्भात संपूर्ण माहिती घेतली. या सिंचन प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावांचे पुनर्वसन व उपलब्ध करून देण्यात आलेल्या नागरी सुविधाबद्दलही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला.यावेळी उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, खासदार रामदास तडस, आमदार अमर काळे, डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, विरेंद्र जगताप, माजी खासदार विजय मुडे, माजी आमदार दादाराव केचे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई, मतद पुनर्र्वसन सचिव के. एच. गोविंदराज, जलसंपदा सचिव एस.एम. उपासे, उपसचिव जोशी, विभागीय आयुक्त अनुपकुमार, अमरावतीचे ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गिते, गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता आकाश सुर्वे, ढंगारे व इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.निम्न वर्धा सिंचन प्रकल्पाच्या प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पामुळे बाधित क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी मुख्य अभियंत्यांना या प्रकल्पाच्या बाधित क्षेत्राचा नव्याने अभ्यास करून दोन महिन्यात उपाय योजनाबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.प्रकल्प पूर्ण करताना प्रकल्पग्रस्तांच्या पूनर्वसनाला प्राधान्य देवून यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी. यापूर्वी पुनर्वसनाचे काम योग्य पद्धतीने न झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. प्रकल्पाग्रस्तांच्या १८ सुविधाबाबत सर्व कामे दर्जेदार व्हावीत यासाठी विकासाकडे येत्या पाच वर्षांत लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केली.