शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा अर्धवटच

By admin | Updated: October 16, 2016 01:51 IST

धनोडी (बहाद्दरपूर) येथे वर्धा नदीवर निम्न वर्धा प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाच्या कालव्याचे काम निधी अभावी रखडले आहे.

निधीची चणचण : देखभाल, दुरूस्तीच्या कामांचाही खोळंबावर्धा : धनोडी (बहाद्दरपूर) येथे वर्धा नदीवर निम्न वर्धा प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाच्या कालव्याचे काम निधी अभावी रखडले आहे. ही कामे जलदगतीने पूर्ण करण्याची ग्वाही शासनाकडून देण्यात आली; पण अद्याप निधीच नसल्याने कामाला प्रारंभच झाला नाही. परिणामी, अद्याप कालवा अर्धवट असून पूर्ण झालेल्या कालव्याच्या देखभाल, दुरूस्तीकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचेच दिसून येत आहे. वर्धा, अमरावती व यवतमाळ या तीन जिल्ह्यांना वरदान ठरणारा निम्न वर्धा प्रकल्प पूर्णत्वास आला; पण अद्याप कालव्याचे काम पूर्ण न झाल्याने तो कुचकामी ठरत आहे. २५ वर्षांतही शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पाहोचत नसल्याने सिंचनाचे स्वप्न धूसर झाल्याचेच चित्र आहे. निम्न वर्धा प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी भेटी दिल्या. त्यावेळी निधी देत कामे पूर्ण करण्याची ग्वाहीही देण्यात आली; पण अद्याप कुठल्याच हालचाली झाल्या नाहीत. यामुळे कालवा पूर्ण होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. निम्न वर्धा कालवे विभागाने याकडे लक्ष देत निधीसाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)गेटवर चोरट्यांची वक्रदृष्टीगुंजखेडा परिसरात मुख्य डाव्या कालव्याला गेट बसविण्यात आले आहेत. या कालव्याची देखभाल, दुरूस्तीच केली जात नसल्याने दयनीय अवस्था आहे. शिवाय गेटवरही चोरट्यांची वक्रदृष्टी असल्याचे दिसते. यामुळे ते चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कालवे विभागाने याकडे लक्ष देत देखभाल, दुरूस्ती करणे गरजेचे झाले आहे.