शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

वर्धा जिल्ह्यात यंदा चारा टंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 15:07 IST

गेल्या पावसाळ्यात जिल्ह्यात केवळ ७७ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील पाचशेवर गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देजलस्तर आटला अनेक गावांना दहा दिवसांनंतरच पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गेल्या पावसाळ्यात जिल्ह्यात केवळ ७७ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील पाचशेवर गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक गावांतील जनावरे दुसऱ्या गावात स्थानांतरित करण्यात येत आहेत.जिल्ह्यात खरिपात प्रमुख पीक कापूस व सोयाबीन हेच आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने चाराटंचाईचा प्रश्न मार्च महिन्यानंतर भेडसावू लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या गुरांच्या बाजारात जनावरे विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. काही भागात सोयाबीनचे कुटार चारा म्हणून वापरले जाते. परंतु, यावर्षी सोयाबीनवरही रोग आला. उत्पादन घटले, त्यामुळे चाºयाची टंचाई जाणवत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले असले तरी भूगर्भातच पाणीसाठा कमी होत असल्याने ग्रामीण व शहरी भागात केला जाणारा पाणीपुरवठा कपात करण्यात आला आहे. वर्धा शहरासह ११ गावांना दरररोज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जात होता. धाम नदी, पवनार व येळाकेळी येथून पाणीपुरवठा कमी होत असल्याने शहरात आता दहा दिवसानंतर नळ येतात. मोठ्या गावांमध्येही ही परिस्थिती आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात शेतकरीही यावेळी अडचणीत आहे. प्रशासनाने आष्टी तालुक्यात चारा छावणी मंजूर केली आहे, मात्र अद्याप छावणी सुरू झाली नसल्याची माहिती आहे. तसेच जिल्ह्यातील या गावात पाणी कमी आहे. तेथे चारा टंचाईचा प्रश्न निर्माण झाल्याने जनावरे मोठ्या प्रमाणावर स्थानांतरित केली जात आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई